शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारीत...) जिल्ह्यातील घाट भागात अतिवृष्टीचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील घाट भागात आज, बुधवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस ...

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यातील घाट भागात आज, बुधवारी अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळणार असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाट भागासह नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली, धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगेची पातळी १५.७ फुटांपर्यंत पोहोचली आहे.

कोल्हापुरात चार-पाच दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली, तरी त्यात सातत्य नव्हते. पडेल तिथे पडेल असा पाऊस होतो. सोमवारी सायंकाळ पाऊस वातावरणात बदल झाला. मंगळवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. सकाळी अकरानंतर त्यात वाढ होत जाऊन एकसारखी रिपरिप सुरू राहिली. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस खरीप पिकाला पोषक आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांची वाढ जोमदार होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर शहरातही दिवसभर रिपरिप राहिली. पाऊस व गार वारे वाहत असल्याने वातावरणात कमालीचा गारठा जाणवत होता. बऱ्याच दिवसांनंतर एकसारखा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना घराबाहेर पडू वाटत नव्हते. धरणक्षेत्रातही जाेरदार पाऊस सुरू आहे. ‘कुंभी’ धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल ११७ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरीसह इतर धरणांतून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद १४०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असून पंचगंगेची पातळी मंगळवारी पाच वाजता १५.७ फुटांवर होती.

जिरवण्याची पाऊस...

एकदम धो धो कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान होते. बांधफुटीसह पिकांच्या वाढीस असा पाऊस उपयुक्त नसतो. त्यापेक्षा आता ज्या पद्धतीने पाऊस सुरू आहे, तसा जिरवण्याची पाऊस अधिक उपयुक्त आहे.

१०७७ टोल फ्री क्रमांक

अतिवृष्टीची शक्यता असली, तरी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास मदतीसाठी जिल्हा नियंत्रण पक्षाच्या १०७७ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले आहे.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. राधानगरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. (फाेटो-०७०९२०२१-कोल-रेन) (छाया- आदित्य वेल्हाळ)नियंत्रण कक्षाचा