शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सुधारित- अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची नाक्यावर तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून त्याअंतर्गत ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर व मृत्यूदर कमी होण्यासाठी जिल्ह्यात १५ दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार असून त्याअंतर्गत अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची नाक्यांवरच थर्मल स्क्रिनिंग, पल्स व ऑक्सिजन अशी आरोग्य तपासणी व लक्षणे असल्यास अँटिजन तपासणी करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साखळी तोडण्यासाठी (ब्रेक द चेन) प्रभावी उपाययोजना राबविण्याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी आ. चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपायुक्त निखिल मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सध्या जिल्हा बंदी लागू असल्याने अन्य जिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांनी पास घेऊन येणे अपेक्षित आहे. नाक्यांवर पासची तपासणी व आवश्यकतेप्रमाणे थर्मल स्क्रिनिंग, पल्स ऑक्सिमीटरद्वारे नागरिकांची तपासणी केली जाईल. लक्षणे आढळली तर अँटिजन तपासणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

तपासणीस विरोध केल्यास साहित्य विक्रीवर बंदी

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, घर लहान असेल तर रुग्णामुळे कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत आहेत. त्यामुळे रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करा. फिरते विक्रेते, अत्यावश्यक सेवेतील दुकानदार व कामगार, औद्योगिक कामगार, मजूर यांची अँटिजन तपासणी करून घ्या. तपासणीसाठी नकार देणाऱ्यांच्या साहित्य विक्रीला बंदी घाला.

रुग्णसंख्या अधिक असलेल्या शिरोळ, हातकणंगले व करवीर या तीन तालुक्यांतील प्रतिबंधित क्षेत्रांत प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. ग्रामीण भागातील रुग्ण व मृत्यूदर कमी होण्यासाठी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

आ. चंद्रकांत जाधव म्हणाले, तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांचा धोका लक्षात घेऊन लहान बालकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करायला हव्यात. हेल्पलाइनद्वारे नागरिकांना उपलब्ध बेडची माहिती तसेच व्हेंटिलेटरचे बेड वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले, कोविड सेंटरमधील रुग्णांना आवश्यक त्या सेवा-सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास जिल्ह्याचा रुग्णदर कमी होईल.

---

-रुग्णांचे संस्थात्मक अलगीकरण करा

नेमून दिलेल्या वेळेशिवाय दुकान सुरू ठेवल्यास दंडात्मक कारवाई

--

फोटो नं ०१०५२०२१-कोल-कलेक्टर बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक झाली. यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, आ. चंद्रकांत जाधव, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, आ. ऋतुराज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण उपस्थित होते.

--