शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
2
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
3
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
4
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
5
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
8
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
9
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
10
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
11
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
12
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
13
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
14
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
15
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
16
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
17
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
18
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
19
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
20
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!

अन्नसुरक्षेसाठी शेतीव्यवस्था सुधारावी

By admin | Updated: January 6, 2015 00:50 IST

यशवंतराव थोरात : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न सोडविण्यासाठी अन्नसुरक्षेशिवाय पर्याय नाही. अन्नसुरक्षेची अंमलबजावणी करावयाची असेल, तर शेतीव्यवस्था पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज, सोमवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘अन्नसुरक्षेतील समस्या : उपभोग किंवा नाश होणे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, तर स्कूलचे संचालक डॉ. वसंत जुगळे प्रमुख उपस्थित होते.डॉ. थोरात म्हणाले, अन्नसुरक्षेची अंमलबजावणी केल्यास देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न निश्चितपणे सोडविता येतील. अन्नाला शेतीशिवाय पर्याय नसल्याने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. शिवाय नागरिकांनी शाकाहार घेणे, पाण्याचा मर्यादित आणि गरजेनुसार वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरडधान्याचे उत्पादन म्हणजे शेती नव्हे. जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्यांचे उत्पादन म्हणजे खऱ्या अर्थाने शेती आहे. बदलती ‘फूड हॅबिट’ हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे. फळे आणि मांसाहाराकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून प्रदूषणवाढीला हातभार लागत आहे. प्रदूषण टाळण्यासह अन्नसुरक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निसर्गास अनुकूल शेती करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सध्याच्या युवकांनी कार्यरत व्हावे.डॉ. भोईटे म्हणाले, गेल्या काही वर्षांतील हवामानाची स्थिती पाहता दुष्काळाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. वर्षागणिक त्यात भर पडत आहे. यापुढे दुष्काळाची परिस्थिती अधिक गडद होईल असे वाटते. अशा स्थितीत टिकून राहणे, तिला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी, आदींचा योग्य पद्धतीने वापर करणे उपयुक्त ठरणारे आहे. कार्यक्रमात वैशाली भोसले यांनी स्वागत केले. कविता वडाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)