शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

अन्नसुरक्षेसाठी शेतीव्यवस्था सुधारावी

By admin | Updated: January 6, 2015 00:50 IST

यशवंतराव थोरात : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे व्याख्यान

कोल्हापूर : देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न सोडविण्यासाठी अन्नसुरक्षेशिवाय पर्याय नाही. अन्नसुरक्षेची अंमलबजावणी करावयाची असेल, तर शेतीव्यवस्था पहिल्यांदा सुधारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात यांनी आज, सोमवारी येथे केले.शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ रुरल डेव्हलपमेंटतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. ‘अन्नसुरक्षेतील समस्या : उपभोग किंवा नाश होणे’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, तर स्कूलचे संचालक डॉ. वसंत जुगळे प्रमुख उपस्थित होते.डॉ. थोरात म्हणाले, अन्नसुरक्षेची अंमलबजावणी केल्यास देशातील दारिद्र्य, भूकबळी असे प्रश्न निश्चितपणे सोडविता येतील. अन्नाला शेतीशिवाय पर्याय नसल्याने उत्पादन वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतीव्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. शिवाय नागरिकांनी शाकाहार घेणे, पाण्याचा मर्यादित आणि गरजेनुसार वापर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. भरडधान्याचे उत्पादन म्हणजे शेती नव्हे. जीवनसत्त्वयुक्त अन्नधान्यांचे उत्पादन म्हणजे खऱ्या अर्थाने शेती आहे. बदलती ‘फूड हॅबिट’ हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे. फळे आणि मांसाहाराकडे लोक मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. त्यातून प्रदूषणवाढीला हातभार लागत आहे. प्रदूषण टाळण्यासह अन्नसुरक्षेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निसर्गास अनुकूल शेती करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने सध्याच्या युवकांनी कार्यरत व्हावे.डॉ. भोईटे म्हणाले, गेल्या काही वर्षांतील हवामानाची स्थिती पाहता दुष्काळाच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. वर्षागणिक त्यात भर पडत आहे. यापुढे दुष्काळाची परिस्थिती अधिक गडद होईल असे वाटते. अशा स्थितीत टिकून राहणे, तिला सामोरे जाण्यासाठी उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्ती, पाणी, आदींचा योग्य पद्धतीने वापर करणे उपयुक्त ठरणारे आहे. कार्यक्रमात वैशाली भोसले यांनी स्वागत केले. कविता वडाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)