शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सकारात्मकता, अथक परिश्रमाने विजयीवीर असा ठसा उमटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:25 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ साध्या आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. त्यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी, तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहातून या समारंभाचे थेट प्रेक्षपण करण्यात आले. कोरोनाबाबतच्या निर्बंधामुळे यंदा प्रत्यक्षात कोणतीही पदवी या समारंभामध्ये प्रदान करण्यात आली नाही. त्याऐवजी राष्ट्रपती सुवर्णपदक विजेता सौरभ पाटील, कुलपती सुवर्णपदक विजेती महेश्वरी गोळे आणि पीएच.डी.धारक बसवराज माळी, अमोल माने, मृणालिनी अहिरे, बलगोंडा पाटील यांची प्रातिनिधिक स्वरूपात नावे जाहीर करण्यात आली.

नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थिकेंद्रित आहे. त्यात कला, संशोधन, कौशल्य, मानवी मूल्ये, सामाजिक समस्या सोडविण्याचा दृष्टिकोनाचा समावेश आहे. या धोरणामुळे शिक्षणातून उच्च दर्जाचे कौशल्य असणारे मनुष्यबळ विकसित होईल. आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य गाठण्याच्या योग्यवेळी हे धोरण आले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी रोडमॅप ठरवून विद्यापीठ, शैक्षणिक संस्थांनी कार्यरत होणे आवश्यक असल्याचे डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. पदवी मिळणे ही शिक्षणाची सुरुवात असून शेवट नाही. पदवीधरांनी आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करावा. नोकरी मागणारे होण्याऐवजी रोजगार संधी निर्माण करणारे कसे होता येईल, यादृष्टीने पदवीधरांनी कार्यरत राहावे. प्रांतवाद, जातीभेद करू नये. आत्मनिर्भरतेची सुरुवात स्वत:पासून करावी, असे ‌आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. ‘नॅक’चे ए-प्लस प्लस मानांकन मिळविणाऱ्या शिवाजी विद्यापीठाला नवीन उपक्रमांसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, पी. आर. शेवाळे, मेघा गुळवणी, एस. एस. महाजन, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, कोल्हापूर विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी विद्यापीठाच्या वार्षिक कामगिरीचा आढावा सादर केला. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी पदवीधरांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्ययशील यादव, नंदिनी पाटील, तृप्ती करेकट्टी यांनी सूत्रसंचालन केले.