शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जिल्ह्यात महाआवास अभियानाची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:39 IST

कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांना गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये ...

कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य शासनाच्या विविध आवास योजनांना गती देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाआवास अभियान राबवण्यास सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत गतवर्षी राज्यात ३३ व्या क्रमांकावर असलेला कोल्हापूर जिल्हा केवळ एका वर्षात चौथ्या क्रमांकावर आला आहे.

शासनाच्या विविध योजना एकत्रित करून त्यांचा लाभ देण्याचा उद्देश या महाअभियानातून साध्य करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजनेमधून रोजगार व स्वच्छ भारत मिशनमधून शौचालय देणे, जलजीवन मिशनमधून विद्युत जोडणी देणे, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून उपजीविकेचे साधन देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

नावीन्यपूर्ण उपक्रम

१ पुरेशी जागा नसल्यास बहुमजली इमारती बांधणे.

२ पुरेशी जागा असल्यास गृहसंकुल उभारून त्यांची सहकारी संस्था स्थापणे.

३ घरकुल बांधकामासाठी बँकेचे ७० लाख रुपये कर्जस्वरूपात मिळवून देणे.

४ घरकुलांचे बांधकाम साहित्य उपलब्ध करण्यासाठी घरकुल मार्ट सुरू करून त्यात महिला बचत गटांचा सहभाग घेणे.

५ पंचायत राज संस्था, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था, कॉर्पोरेट संस्था, लाभार्थी व लोक सहभाग यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करणे.

चौकट

शुक्रवारी जिल्हास्तरीय कार्यशाळा

या महाअभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शुक्रवारी ( दि. १८) सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी, अन्य पदाधिकारी यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह आमदारांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

चौकट

कोरोना काळातही प्रगतिपथावर

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांनी कोरोनाच्या काळात उत्तम नियोजन करून कोल्हापूर जिल्हा राज्यात थेट चौथ्या क्रमांकावर आणला. शिवदास यांच्याकडे एकीकडे शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेतील समन्वयाची जबाबदारी असतानाही त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी विशेष नियोजन केल्यामुळे जिल्ह्याचा राज्यात वरचा क्रमांक लागला आहे.