शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळावर उपाययोजना राबवाव्यात

By admin | Updated: April 18, 2016 01:10 IST

के. पी. विश्वनाथ : माजी विद्यार्थ्यांचा ‘कृषी संगम’ उत्साहात; शेती, शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान द्या

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत; पण त्याबरोबर कृषी पदवीधर, निवृत्त अधिकाऱ्यांनी दुष्काळावर उपाययोजनांवर आधारित विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. हवामान, पाऊस यानुसार शेती उत्पादन घेण्याचे व शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर माजी विद्यार्थी संघटनेने भर द्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. के. पी. विश्वनाथ यांनी रविवारी येथे केले.कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘कृषी संगम २०१६’ या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकॉकमधील एशिया पॅसिफिक असोसिएशन अ‍ॅग़्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी सचिव डॉ. रघुनाथ घोडके, तर माजी प्राचार्य एम. डी. जांभळे, प्राचार्य गजानन खोत, प्राचार्य अरुण मराठे प्रमुख उपस्थित होते.डॉ. विश्वनाथ म्हणाले, कृषी महाविद्यालयाचे मूळ उद्दिष्ट शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करणे असल्याने कृषी पदवीधर व निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे. कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर द्या. शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या कार्यक्रमांच्या योजना तयार करा. त्यांना प्रोत्साहन द्यावे. शिवाय संघटनेने स्वत:चा एनजीओ अथवा फोरम निर्माण करून महाविद्यालयास शेतकऱ्यांना मदत करावी. डॉ. घोडके म्हणाले, शेतकऱ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. याअंतर्गत त्यांनी विविध योजना कार्यान्वित कराव्यात. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात १९६३ ते २०१२ पर्यंतच्या प्रत्येक बॅचमधील दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, आदींसह राज्यभरातील सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एम. डी. जांभळे यांनी प्रास्ताविकात ‘व्हिजन २०३०’चे नियोजन करण्याची सूचना केली. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कॅप्टन उत्तम पाटील यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'आत्मा'च्या येथील प्रकल्प उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)दोन वर्षांनी होणार ‘कृषी संगम’दर दोन वर्षांनी ‘कृषी संगम’ घेण्याचे मेळाव्यात निश्चित झाले. संघटनेतर्फे महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे. महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा करणे. संघटनेने कृषी क्षेत्रासह महाविद्यालयाच्या विकासासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणे. कृषी मेळावा घेणे. कृषी विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आदी ठराव मेळाव्यात एकमताने हात उंचावून मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त व्हामेळाव्यात पुण्याच्या क्रीडा विभागाचे संचालक राजाराम माने यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला; शिवाय माजी विद्यार्थ्यांनी आपल्यापरीने आर्थिक योगदान देऊन शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचे आवाहन केले.