शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
2
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
3
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
4
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
5
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
6
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
7
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!
8
Radhika Yadav : "भावाला बाहेर पाठवलं, पिटबुलला बांधलं अन् राधिकाला मारलं"; हिमांशिकाचा धक्कादायक खुलासा
9
पती-पत्नी वादात कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून ग्राह्य धरणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
11
“प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला, कडक कारवाई करावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
12
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
13
'या' कंपनीला मिळाली मुंबई मेट्रोची 'मेगा' ऑर्डर! झुनझुनवालांचा 'हा' शेअर बनला रॉकेट! तुमचेही पैसे वाढणार?
14
शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंगची थिअरी आणि समर्थ रामदास यांच्या स्तोत्रात आहे एक साम्य!
15
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
16
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
17
२६ व्या वर्षी प्रसिद्ध मॉडेलची आत्महत्या, पोलिसांना सापडली सुसाईड नोट, समोर आलं मोठं कारण
18
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
19
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
20
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!

दुष्काळावर उपाययोजना राबवाव्यात

By admin | Updated: April 18, 2016 01:10 IST

के. पी. विश्वनाथ : माजी विद्यार्थ्यांचा ‘कृषी संगम’ उत्साहात; शेती, शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान द्या

कोल्हापूर : राज्यातील दुष्काळी परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून कृषी विद्यापीठे कार्यरत आहेत; पण त्याबरोबर कृषी पदवीधर, निवृत्त अधिकाऱ्यांनी दुष्काळावर उपाययोजनांवर आधारित विशेष कार्यक्रम हाती घ्यावेत. हवामान, पाऊस यानुसार शेती उत्पादन घेण्याचे व शेती उत्पादनाला बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर माजी विद्यार्थी संघटनेने भर द्यावा, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. के. पी. विश्वनाथ यांनी रविवारी येथे केले.कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘कृषी संगम २०१६’ या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बँकॉकमधील एशिया पॅसिफिक असोसिएशन अ‍ॅग़्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशनचे कार्यकारी सचिव डॉ. रघुनाथ घोडके, तर माजी प्राचार्य एम. डी. जांभळे, प्राचार्य गजानन खोत, प्राचार्य अरुण मराठे प्रमुख उपस्थित होते.डॉ. विश्वनाथ म्हणाले, कृषी महाविद्यालयाचे मूळ उद्दिष्ट शेतकऱ्यांचे हिताचे रक्षण करणे असल्याने कृषी पदवीधर व निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सक्रिय योगदान द्यावे. कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर भर द्या. शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरणाऱ्या कार्यक्रमांच्या योजना तयार करा. त्यांना प्रोत्साहन द्यावे. शिवाय संघटनेने स्वत:चा एनजीओ अथवा फोरम निर्माण करून महाविद्यालयास शेतकऱ्यांना मदत करावी. डॉ. घोडके म्हणाले, शेतकऱ्यांसाठी माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय योगदान द्यावे. याअंतर्गत त्यांनी विविध योजना कार्यान्वित कराव्यात. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांनी माजी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या मेळाव्यात १९६३ ते २०१२ पर्यंतच्या प्रत्येक बॅचमधील दोन विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अजित पवार, आदींसह राज्यभरातील सुमारे दीड हजार माजी विद्यार्थी उपस्थित होते. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष एम. डी. जांभळे यांनी प्रास्ताविकात ‘व्हिजन २०३०’चे नियोजन करण्याची सूचना केली. उपजिल्हाधिकारी संजय शिंदे व कॅप्टन उत्तम पाटील यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. 'आत्मा'च्या येथील प्रकल्प उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)दोन वर्षांनी होणार ‘कृषी संगम’दर दोन वर्षांनी ‘कृषी संगम’ घेण्याचे मेळाव्यात निश्चित झाले. संघटनेतर्फे महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना मदत करणे. महाविद्यालयाचा स्थापना दिन साजरा करणे. संघटनेने कृषी क्षेत्रासह महाविद्यालयाच्या विकासासाठी ‘थिंक टँक’ म्हणून काम करणे. कृषी मेळावा घेणे. कृषी विषयक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, आदी ठराव मेळाव्यात एकमताने हात उंचावून मंजूर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त व्हामेळाव्यात पुण्याच्या क्रीडा विभागाचे संचालक राजाराम माने यांनी दुष्काळग्रस्तांसाठी दहा हजार रुपयांचा निधी दिला; शिवाय माजी विद्यार्थ्यांनी आपल्यापरीने आर्थिक योगदान देऊन शेतकऱ्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचे आवाहन केले.