शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

ग्राम विकासाचा पंचवार्षिक आराखडा राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : मतदारांनी विश्वासाने निवडून दिले आहे. हा विश्वास जपत असताना विकासाची कामे करा. पुढील पाच वर्षात गावचा विकास ...

कोल्हापूर : मतदारांनी विश्वासाने निवडून दिले आहे. हा विश्वास जपत असताना विकासाची कामे करा. पुढील पाच वर्षात गावचा विकास कशा पध्दतीने कारायचा, याचा पंचवार्षिक आराखडा तयार करा. भविष्यात त्यासाठी लागेल तेवढी मदत करण्याची आपली भूमिका राहील, अशी ग्वाही जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी येथे बोलताना दिले.

काेल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा जिल्हा कॉंग्रेसतर्फे पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या सत्कार सोहळ्यास ९९८ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्षास चांगले यश मिळाल्याने कार्यकर्त्यात उत्साह संचारला असल्याचे या समारंभातून जाणवले.

लोकशाहीत चांगले यश मिळत असते, पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी असावी लागते. निवडून आल्यानंतर आता जबाबदारीत वाढ झाली आहे. गावाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करावे. ज्यांनी मते दिली नाहीत त्यांच्याबद्दल कटुता न ठेवता त्यांचीही कामे करा, असे आवाहन पाटील यांनी केले.

ग्रामपंचायत हा लोकशाहीची पहिली पायरी आहे. तुम्ही निर्णय घेतलाच आहे, त्यामुळे गावच्या विकासाची, लोकांची कामे करण्याची जबाबदारी तुम्हाला टाळता येणार नाही. गावच्या विकासासह वैद्यकीय सुविधा, उपचार याबाबत काहीही गरज लागली तरी आम्ही मदत करायला तयार आहोत. लोकांची कोणतीही कामे असतील तर घेऊन या, असा विश्वासही त्यांनी सदस्यांना दिला.

-हरित गाव योजना राबवा -

हरित गाव योजना राबविण्यात सदस्यांनी पुढाकार घ्यावा. माहिती तंत्रज्ञानाचा वापर अधिकाधिक चांगल्या कामासाठी करुन घ्यावा. शासनाच्या योजना गावांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी नवनिर्वाचित सदस्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.

-कार्यक्रम होऊ देऊ नका

मासिक सभा असो अथवा शासकीय योजना, सर्वच कामांची नीट माहिती घ्या. अभ्यास करा. प्रोसिडिंग वाचून सह्या करा. अन्यथा ग्रामसेवक सही, शिक्के मारून तुमचा कार्यक्रम करील. ग्रामसेवक प्रोसिडिंग घराकडे घेऊन जाणार नाही याची खात्री करा. तुमचा कार्यक्रम करून देऊ नका, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

- आता गोकूळ, केडीसीसी -

जिल्ह्यातील कॉंग्रेसच्या बाजूने लागत असलेले निकाल पाहता यापुढील गोकूळ दूध संघ, केडीसीसी बँक निवडणुकीतही ही घोडदौड कोणाला रोखता येणे शक्य नाही, असे आमदार जयंत आसगावकर म्हणाले.

यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, आमदार राजू आवळे यांच्यासह ज्योत्स्ना युवराज पाटील, तेजस्विनी अभिजित पाटील यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील संग्रामसिंह नलवडे उपस्थित होते.