शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

सोडा वापरून घरच्या घरी करा गणेशमूर्तींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:27 IST

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यावरील रंग आरोग्याला हानिकारक असतात यााबाबत नेहमीच चर्चा होते. राज्य शासनाने या ...

प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे पाण्याचे प्रदूषण होते. त्यावरील रंग आरोग्याला हानिकारक असतात यााबाबत नेहमीच चर्चा होते. राज्य शासनाने या मूर्तींवर बंदी आणली आहे. पण प्रत्यक्षात लाखोंच्या संख्येत शाडूच्या मूर्ती बनवणे अशक्य आहे. तेवढ्या प्रमाणात शाडू उपलब्ध होत नाही, ते बनवण्यास वेळ लागतो, शिवाय या मूर्ती नाजूक असल्याने दुखावण्याचा धोका असतो. शिवाय त्यांचा दरही खूप जास्त असतो. तुलनेने सर्वच बाजूंनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेणे सोयीस्कर असतात. पण या मूर्ती लवकर विरघळत नाहीत. त्यामुळे त्यांचा अवमान होण्याचेच प्रमाण अधिक असते. मोठ्या श्रद्धेने पुजलेल्या या देवाचे विसर्जनही तितक्याच सन्मानाने व्हावे यासाठी संशोधकांनी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करून मूर्ती विरघळण्याचा प्रयोग यशस्वी केला आहे.

हे संशोधन नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने केले असून त्याला कमिन्स इंडियाच्यावतीने सीएसआरमधून निधी देण्यात आला होता. कोल्हापुरात २०१५ साली पंचगंगा नदी घाटावर पंचगंगा घाट संवर्धन समितीच्यावतीने प्रमोद पुगावकर यांनी पहिल्यांचा हा प्रयोग सगळ्यांसमोर आणलाय

----

पीओपीच्या मूर्तींचीच अधिक विक्री

कोल्हापुर शहरात वर्षाला १ ते दीड लाखांवर गणेशमूर्ती लागतात. त्यापैकी ८० ते ९० टक्के गणेशमूर्ती या प्लॅस्टरपासून बनवलेल्या आहेत. एक लाखामागे २० हजार या प्रमाणे शाडूच्या मूर्ती बनवल्या जातात. शाडूच्या मूर्ती नाजूक असल्याने त्या दुखावण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांकडून तसेच मंडळांकडून सर्रास प्लॅस्टरच्या मूर्तीची मागणी केली जाते.

----

असे असावे सोड्याचे प्रमाण

सोड्याचे प्रमाण मूर्तीच्या वजनावरून ठरवले जाते. मूर्तीचे वजन जितके किलो असेल तेवढे किलो अमोनियम बायकार्बोनेट पाण्यात घालायचे. भल्यामोठ्या टबमध्ये खूप पाणी घातले आणि अमोनिअम बायकार्बोनेट कमी पडले की मूर्ती विरघळत नाही. त्यामुळे केवळ मूर्ती पूर्णत: पाण्यात बुडेल आणि भोवतीने थोडे पाणी राहील एवढेच पाण्याचे प्रमाण असायला हवे.

---

४८ तासांत विरघळते मूर्ती

मूर्ती विरघळवण्याच्या दोन पद्धती आहे. पहिल्या पद्धतीत शॉवरप्रमाणे मूर्तीवर संततधार हे पाणी पडत राहिले तर, ४८ तासांत मूर्ती विरघळते. आणि टबमध्ये ठेवून दर चार तासांनी पाणी ढवळले तर, मूर्ती विरघळायला ३ ते ६ दिवस लागतात.

----

खत म्हणून करा पाण्याचा वापर

हे विरघळलेले पाणी तुम्ही झाडाला वापरू शकता व खाली राहिलेले प्लॅस्टर खत म्हणून किंवा सिमेंटच्या विटा बनवणे, प्लॅस्टरच्या भिंती अशा कारणासाठी वापरता येतात. विदर्भात पाऊस कमी पडतो, ऊन जास्त असते, त्यामुळे शेतातील मातीवर प्लॅस्टर मारले जाते. त्यामुळे माती पाणी शोषून घेते.

---

खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट, अमोनियम बायकार्बोनेट हा पदार्थ वेगळा असते. तो देखील बेकरी पदार्थ बनवण्यासाठी वापरला जातो; पण घराघरांत वापरला जात असलेल्या खाण्याच्या सोड्याने मूर्ती विरघळत नाही. त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचा वापर करणे गरजेचे आहे.

प्रमोद पुगावकर (उपाध्यक्ष पंचगंगा घाट संवर्धन समिती)

--

लाखोंच्या संख्येने शाडूच्या गणेशमूर्ती बनवणे अशक्य आहे. शिवाय प्लॅस्टरने प्रदूषण होत नाही. आम्ही कायम प्लॅस्टरमध्ये हात घालून काम करतो. आमच्यावर कोणतेही दुष्परिणाम झालेले नाहीत. रंग विषारी असू शकतात. ही मूर्ती लवकर विरघळत नाही, एवढाच प्रश्न असतो. त्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत.

उदय कुंभार (मूर्तिकार)

---