शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

सत्तेसाठी कथित करणीने यमगे वेठीस

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

गावकऱ्यांना जागरण : नागरिक भीतीच्या सावटात

मुरगूड : यमगे (ता. कागल) येथे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत गुरुवारी रात्रभर करणी आणि भानामतीचे प्रकार घडल्याने अख्खा गाव रात्रभर जागा होता. मतदान केंद्राबाहेर, गावच्या हद्दीवर, सर्व गल्ली-बोळांमध्ये करणी-भानामतीचे प्रकार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे दिवसभर भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सत्ता हस्तगत करण्यासाठी पुढाऱ्यांनी केलेल्या कुरापतीची चर्चा मात्र मुरगूड पंचक्रोशीत सुरू होती.ग्रामपंचायतीच्या सत्तेसाठी मंडलिक, मुश्रीफ, राजे व पाटील गटाची महाआघाडी व संजय घाटगे आणि स्वाभिमानी संघटनेची आघाडी यांच्यामध्ये दुरंगी सामना रंगला आहे. वरवर शांत दिसणाऱ्या या निवडणुकीत शेवटच्या काही दिवसांत चांगलाच रंग भरला आहे; पण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे न जाता भानामतीचा आधार घेतला जात आहे. ही गोष्ट पुरोगामी विचारांना मुठमाती देणारीच आहे.गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास गावामधून मोटारसायकलवरून काही व्यक्ती संशयितरीत्या फिरताना काही तरुणांना दिसल्या. त्या मोटारसायकलाच पाठलाग केला असता पाठीमागील व्यक्ती संपूर्ण गल्लीतून रंगीत तांदूळ फेकत असल्याचे निदर्शनास आले. ही घटना बघता बघता सर्वत्र पोहोचली आणि मग दोन्ही गटांचे लोक जागे होऊन गावामधून कथित करणी, भानामतीचे प्रकार शोधू लागले. त्यावेळी धक्कादायक घटना समोर आल्या.गावातील प्रमुख चौकामध्ये रंगीत तांदळाची विशिष्ट पद्धतीने मांडणी करून त्यांच्यावर टाचण्या मारलेला लिंबू ठेवला होता. नवीन शाळेच्या इमारतीजवळ हळदीमध्ये भिजविलेल्या पिवळ्या कापडामध्ये हाताचे व कवटीचे हाड, त्याला काड्या, तारेने बांधून ठेवलेले आढळले. या करणीचा आपल्या मतदानावर काही परिणाम होऊ नये म्हणून एका गटाच्या प्रमुखांनी त्या साहित्याची विधिवत पूजा करून, नैवेद्य दाखवून पहाटे-पहाटे ते साहित्य वेदगंगा नदीपात्रामध्ये सोडून दिले. गावच्या बाहेर हद्दीवरती असणाऱ्या पपईच्या झाडावर दुपारी लिंबू खिळ्यांच्या सहायाने ठोकलेले आढळले. (वार्ताहर)ग्रामपंचायतीची सत्ता ही केलेल्या विकासकामांच्या लेखाजोख्यावर जिंकायची असते, असे असताना ज्या गावामध्ये घरात एक व्यक्ती पदवीधारक आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेत मुरगूड केंद्रामध्ये नेहमी याच गावचे विद्यार्थी चमकत असतात. नोकरीच्या निमित्ताने अनेक तरुण आज परदेशामध्ये मोठमोठ्या पदावर काम करीत आहेत. भजनातून प्रवचनातून मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करणारा वर्ग असताना, अशा यमगे गावामध्ये करणी आणि भानामतीचा प्रकार होणे ही बाब प्रगत समाजाला चिंतनीय आहे हे नक्की.