शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

कृषीपंपाना तत्काळ जोडणीचे आदेश

By admin | Updated: May 26, 2015 00:48 IST

चंद्रकांतदादा पाटील : विद्युत वितरण नियंत्रण समितीची पहिली बैठक संपन्न

कोल्हापूर : कृषी पंपांच्या जोडणीतील दिरंगाई निकालात काढण्यासाठी (झिरो पेंडन्सीसाठी) आवश्यक बाबी प्राधान्याने करून वर्षभरात जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज पंपांची जोडणी द्यावी, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी महावितरण व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ग्राहक व वीजवितरण कंपनी यांच्यात संवाद व समन्वय नसल्यास अडचणीच्या प्रसंगी ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये तसेच महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी व ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुका स्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सत्यजित पाटील, उल्हास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आयुक्त पी. शिवशंकर, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता डी. ए. कुमठेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन आटोळे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरेश मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पाटील यांनी जिल्ह्यातील विद्युत वितरणासंदर्भातील सद्य:स्थिती तसेच, समितीच्या सदस्यांच्या सूचना जाणून घेतल्या. कोल्हापूरमधील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौरऊर्जा वापरण्यात येईल का, याबाबत विचार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. सत्यजित पाटील म्हणाले, संपूर्ण जिल्ह्यात मार्च २०१२ पासून वीज पंपांची जोडणी प्रलंबित आहे. आतापर्यंत ७४५१ वीज जोडण्या प्रलंबित असून, त्यापैकी ५४७० वीज जोडण्या इन्फ्रा २ प्रकल्पांतर्गत करण्यात येत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना ‘महावितरण’च्या कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांनी या कामाची गती कमी आहे. त्यामुळे तालुकानिहाय शेती पंपांच्या निविदा काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.काही ग्राहक प्रतिनिधींनी विजेचे गंजलेले खांब व पथदिवे दुरुस्तीची मागणी केली. त्यावर अधीक्षक अभियंता दीपक कुमठेकर यांनी ही बाब ‘अपग्रेडेशन अँड मॉडर्नायझेशन’ तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून होत आहेत. जादा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण कामे करण्यात येतील, असे सांगितले. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, संभाजी पाटील, नाथाजी पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)