शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळूउपशामुळे महापुराचा धोका वाढला, सुपीक जमिनींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून ...

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून अवैध वाळू उपशाने बहुतेक नद्यांचे पात्र उथळ बनले आहे. प्रामुख्याने वारणा, ताम्रपर्णी आणि कृष्णा नदीकाठच्या सुपीक जमिनींचे मोठे नुकसान झालेले आहे. थोड्याशा पावसानेही महापुराला सामोरे जावे लागण्यामागे हेही एक कारण आहे.

जिल्ह्यात उत्खननाचे परवाने मिळालेले एकूण ३६ गट असून प्रत्यक्षात ३० ठिकाणी उत्खनन होते. त्यातील सर्वाधिक २२ गट हे केवळ शिरोळ तालुक्यातीलच आहेत. उपसाबंदीविरोधात खनिकर्म विभागाचे नियंत्रण नसल्याचे चार वर्षांत अवघ्या ५० लाखांच्याच नाममात्र दंडवसुलीमुळे लक्षात येते.

हे झाले नुकसान

नदीकाठावर खड्डे मारल्यामुळे नदीचे पात्रही काही ठिकाणी बदलले आहेत.

उपशासाठी वापरणाऱ्या बोटीतील डिझेल पाण्यात सांडून प्रदूषण

झाडे तोडल्याने मातीची झीज, पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट

नदीपात्रातून माती वाहून गेल्याने पात्र उथळ व रुंद.

कोट

कर्नाटकात वाळूचोरीला आळा घालण्यासाठी जकात नाके आहेत. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारचे कोणतेही नियंत्रण नाही. पर्यावरणाला वाळूउपशामुळे मोठा धोका पोहोचलेला आहे.

- डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ