शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

अवैध वाळूउपशामुळे महापुराचा धोका वाढला, सुपीक जमिनींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून ...

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून अवैध वाळू उपशाने बहुतेक नद्यांचे पात्र उथळ बनले आहे. प्रामुख्याने वारणा, ताम्रपर्णी आणि कृष्णा नदीकाठच्या सुपीक जमिनींचे मोठे नुकसान झालेले आहे. थोड्याशा पावसानेही महापुराला सामोरे जावे लागण्यामागे हेही एक कारण आहे.

जिल्ह्यात उत्खननाचे परवाने मिळालेले एकूण ३६ गट असून प्रत्यक्षात ३० ठिकाणी उत्खनन होते. त्यातील सर्वाधिक २२ गट हे केवळ शिरोळ तालुक्यातीलच आहेत. उपसाबंदीविरोधात खनिकर्म विभागाचे नियंत्रण नसल्याचे चार वर्षांत अवघ्या ५० लाखांच्याच नाममात्र दंडवसुलीमुळे लक्षात येते.

हे झाले नुकसान

नदीकाठावर खड्डे मारल्यामुळे नदीचे पात्रही काही ठिकाणी बदलले आहेत.

उपशासाठी वापरणाऱ्या बोटीतील डिझेल पाण्यात सांडून प्रदूषण

झाडे तोडल्याने मातीची झीज, पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट

नदीपात्रातून माती वाहून गेल्याने पात्र उथळ व रुंद.

कोट

कर्नाटकात वाळूचोरीला आळा घालण्यासाठी जकात नाके आहेत. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारचे कोणतेही नियंत्रण नाही. पर्यावरणाला वाळूउपशामुळे मोठा धोका पोहोचलेला आहे.

- डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ