शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
3
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
4
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
5
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
6
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
8
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
9
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
10
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
11
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
12
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
13
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
14
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
15
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
16
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
17
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
18
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
19
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?

अवैध वाळूउपशामुळे महापुराचा धोका वाढला, सुपीक जमिनींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:48 IST

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून ...

कोल्हापूर : हरित लवादाने बंदी घातली असली तरीही वाळूचा खुलेआम उपसा व विक्री होत आहे. बारमाही वाहणाऱ्या जिल्ह्यातील नद्यांमधून अवैध वाळू उपशाने बहुतेक नद्यांचे पात्र उथळ बनले आहे. प्रामुख्याने वारणा, ताम्रपर्णी आणि कृष्णा नदीकाठच्या सुपीक जमिनींचे मोठे नुकसान झालेले आहे. थोड्याशा पावसानेही महापुराला सामोरे जावे लागण्यामागे हेही एक कारण आहे.

जिल्ह्यात उत्खननाचे परवाने मिळालेले एकूण ३६ गट असून प्रत्यक्षात ३० ठिकाणी उत्खनन होते. त्यातील सर्वाधिक २२ गट हे केवळ शिरोळ तालुक्यातीलच आहेत. उपसाबंदीविरोधात खनिकर्म विभागाचे नियंत्रण नसल्याचे चार वर्षांत अवघ्या ५० लाखांच्याच नाममात्र दंडवसुलीमुळे लक्षात येते.

हे झाले नुकसान

नदीकाठावर खड्डे मारल्यामुळे नदीचे पात्रही काही ठिकाणी बदलले आहेत.

उपशासाठी वापरणाऱ्या बोटीतील डिझेल पाण्यात सांडून प्रदूषण

झाडे तोडल्याने मातीची झीज, पाणी धरून ठेवण्याची क्षमता नष्ट

नदीपात्रातून माती वाहून गेल्याने पात्र उथळ व रुंद.

कोट

कर्नाटकात वाळूचोरीला आळा घालण्यासाठी जकात नाके आहेत. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारचे कोणतेही नियंत्रण नाही. पर्यावरणाला वाळूउपशामुळे मोठा धोका पोहोचलेला आहे.

- डॉ. मधुकर बाचूळकर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ