शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

विश्वशांतीसाठी इज्तेमा

By admin | Updated: March 31, 2016 00:31 IST

मौलाना मुबीन : उदगाव येथे दोन लाख मुस्लिम बांधवांची हजेरी

जयसिंगपूर : सध्याच्या धकाधकीच्या युगात माणसांतील माणुसकी, प्रेम, बंधुभाव लोप पावत आहे. प्रत्येकाने प्रेम व माणुसकी जोपासण्याची आवश्यकता असून, विश्वशांतीची गरज आहे. यासाठी इज्तेमाचे आयोजन केले जाते, असे प्रतिपादन मौलाना मुबीन (पुणे) यांनी केले.उदगाव (ता. शिरोळ) येथे बुधवारी इज्तेमाचा पहिला दिवस उत्साहात पार पडला. सकाळी साडेसहा वाजता दिलावर मुल्लाणी (कोल्हापूर), दुपारी मौलाना उस्मान (पुणे), सायंकाळी पाच वाजता मौलाना साद (औरंगाबाद), तर रात्री आठ वाजता मौलाना मुबीन यांनी उपस्थितांना संदेश दिला.दरम्यान, बुधवारी कोल्हापूर, सांगली, कर्नाटक, सीमाभागातील सुमारे दोन लाख मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली. या इज्तेमासाठी विविध सोयीसुविधा पुरवल्या आहेत. यामध्ये डॉक्टर, रुग्णवाहिका अशा अत्यावश्यक सेवेचीही सोय करण्यात आली आहे. आज, गुरुवारी इज्तेमाचा शेवटचा दिवस असून, सुमारे पाच लाखांहून अधिक मुस्लिम बांधव उपस्थित राहणार आहेत. रात्री नऊ वाजता दुवापठण हाजीज मन्सूर यांच्या उपस्थितीत होणार आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी सुमारे ४० एकर परिसरात शिरोळ रोड, कुंजवनलगत, गावठाण तळ, स्टेशन रोळ या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. मुख्य मंडप १२० एकरांमध्ये उभारण्यात आला आहे. यामध्ये विविध गावांच्या भागासाठी भोजन, पिंडालाची सोय करण्यात आली आहे.बुधवारी आमदार उल्हास पाटील, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी इज्तेमाला भेट दिली. सुरक्षेसाठी जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके, शिरोळचे वसंत बागल यांच्यासह ७० पोलिस कर्मचारी उपस्थित आहेत. ( वार्ताहर )व्यवस्था : महामार्गावरील वाहतुकीत बदलपोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या आदेशाने महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. इज्तेमासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेत ही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये उदगाव ते जयसिंगपूरला जाणाऱ्या वाहनांना बायपासमार्गे सोडण्यात येणार आहे, तर कोल्हापूरहून सांगलीला जाणाऱ्या वाहनांना तमदलगे बायपासवरून जयसिंगपूर रेल्वे स्टेशनमार्गे सोडण्यात येणार आहे.