शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
3
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
4
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
5
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
6
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
7
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
8
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
9
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
10
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
11
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
12
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
13
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
14
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
15
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
16
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
17
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
18
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
19
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
20
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!

विकास आराखड्याकडे दुर्लक्ष--कोल्हापूर महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:52 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस पत्र पाठवूनही प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.फक्त ‘मलई’ मिळविणाºया बांधकाम विभागाच्या परवाना देण्यात व्यस्त ...

ठळक मुद्देशासकीय पत्राचा नगररचना विभागास विसर पहिला विकास आराखडा : सन १९७७ ला मंजूर दुसरा विकास आराखडा : सन १९९९ ला मंजूर (सन १९८७ ला मंजूर होणे आवश्यक होते) तिसरा विकास आराखडा : सन २०१९ ला मंजूर आवश्यक

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस पत्र पाठवूनही प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.फक्त ‘मलई’ मिळविणाºया बांधकाम विभागाच्या परवाना देण्यात व्यस्त असणाºया महापालिकेच्या नगररचना विभागाला जणू या पत्राचा विसरच पडला आहे. शहराचा तिसरा विकास आराखडा २०१९ पर्यंत मंजूर करणे आवश्यक असताना याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा विकास आराखडा मागील आराखड्याप्रमाणे पुन्हा प्रदीर्घ काळ रेंगाळणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ एक इंचभरही झालेली नाही, पण लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुमारे सात लाख लोकसंख्या विचारात घेऊन त्याबाबत सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करण्यात यावे यासाठी तिसºया आराखड्याची आवश्यकता आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच उद्यान, क्रीडांगणे, शाळा, रुग्णालये, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, रस्ते आदींसाठी जागा आरक्षित करणे गरजेचे असते. त्यासह प्रदूषण, वाहने पार्किंग, कचरा निर्मूलन व व्यवस्थापन आदींबाबत आराखडा करणे गरजेचे असते. कोल्हापूरचा शहराचा दुसरा आराखडा हा सन १९९९ मध्ये झाला. त्यानंतर वीस वर्षांनी तिसरा विकास आराखडा सन २०१९ मध्ये मंजूर होणे आवश्यक आहे; पण त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सात महिन्यांपूर्वी तिसरा विकास आराखडा तयार करण्याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाला पत्र पाठवून प्रक्रिया सुरू करण्याबाबत सूचना केल्या; पण अवघ्या बांधकाम विभागाच्या ‘मलई’दार परवानग्या देण्यात गर्क असणाºया महापालिकेच्या नगरविकास विभागाला या पत्राचा जणू विसरच पडला आहे. हे शासनाचे पत्र आल्यानंतर तातडीने महापालिकेच्या नगरविकास विभागाने यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणे आवश्यक होते. तातडीने एक समिती स्थापन करून त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक होती. पण याबाबत कोणतीही कार्यवाही नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे तो पुन्हा रखडणार, हे आता निश्चित झाले आहे.आराखडा आणि प्राधिकरणाची सांगडशहराची हद्दवाढ किंचितही झालेली नाही, त्यातच नवे प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. प्राधिकरणाशी सुसंगत नियोजन तिसºया विकास आराखड्यात असणे आवश्यक आहे. त्यासाठी शहराचा विकास आराखडा आणि प्राधिकरण यांची सांगड घालून दोन्हीही अधिकाºयांनी एकत्रित काम करणे आवश्यक होणार आहे. त्यानंतरच तो नवीन विकास आराखडा परिपूर्ण होईल.तिसरा विकास आराखडा तयार करण्याबाबत शासनाच्या नगरविकास खात्याचे सात महिन्यांपूर्वी पत्र मिळाले आहे. त्याबाबत विद्यमान वापर नकाशा आणि प्रस्तावित वापर नकाशा तयार करण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे निविदा प्रसिद्धीकरणाच्या मंजुरीसाठी येत्या चार दिवसांत आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेला प्रारंभ होईल.- धनंजय खोत,सहाय्यक संचालक, नगररचना