शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

विकास आराखड्याकडे दुर्लक्ष--कोल्हापूर महापालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:52 IST

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस पत्र पाठवूनही प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.फक्त ‘मलई’ मिळविणाºया बांधकाम विभागाच्या परवाना देण्यात व्यस्त ...

ठळक मुद्देशासकीय पत्राचा नगररचना विभागास विसर पहिला विकास आराखडा : सन १९७७ ला मंजूर दुसरा विकास आराखडा : सन १९९९ ला मंजूर (सन १९८७ ला मंजूर होणे आवश्यक होते) तिसरा विकास आराखडा : सन २०१९ ला मंजूर आवश्यक

तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर शहराची वाढती लोकसंख्या, शहराची सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करावे यासाठी कोल्हापूर शहराचा तिसरा विकास आराखडा तयार करावा याबाबत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने कोल्हापूर महानगरपालिकेस पत्र पाठवूनही प्रशासनाने गेल्या सात महिन्यांत त्यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही.फक्त ‘मलई’ मिळविणाºया बांधकाम विभागाच्या परवाना देण्यात व्यस्त असणाºया महापालिकेच्या नगररचना विभागाला जणू या पत्राचा विसरच पडला आहे. शहराचा तिसरा विकास आराखडा २०१९ पर्यंत मंजूर करणे आवश्यक असताना याबाबत कोणत्याही हालचाली अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे हा विकास आराखडा मागील आराखड्याप्रमाणे पुन्हा प्रदीर्घ काळ रेंगाळणार असे स्पष्ट चित्र दिसत आहे.कोल्हापूर शहराची हद्दवाढ एक इंचभरही झालेली नाही, पण लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सुमारे सात लाख लोकसंख्या विचारात घेऊन त्याबाबत सुयोग्य दिशेने वाढ करण्याबाबत नियोजन करण्यात यावे यासाठी तिसºया आराखड्याची आवश्यकता आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याबरोबरच उद्यान, क्रीडांगणे, शाळा, रुग्णालये, पोलीस स्टेशन, अग्निशमन दल, रस्ते आदींसाठी जागा आरक्षित करणे गरजेचे असते. त्यासह प्रदूषण, वाहने पार्किंग, कचरा निर्मूलन व व्यवस्थापन आदींबाबत आराखडा करणे गरजेचे असते. कोल्हापूरचा शहराचा दुसरा आराखडा हा सन १९९९ मध्ये झाला. त्यानंतर वीस वर्षांनी तिसरा विकास आराखडा सन २०१९ मध्ये मंजूर होणे आवश्यक आहे; पण त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने सात महिन्यांपूर्वी तिसरा विकास आराखडा तयार करण्याबाबत महापालिकेच्या नगररचना विभागाला पत्र पाठवून प्रक्रिया सुरू करण्याबाबत सूचना केल्या; पण अवघ्या बांधकाम विभागाच्या ‘मलई’दार परवानग्या देण्यात गर्क असणाºया महापालिकेच्या नगरविकास विभागाला या पत्राचा जणू विसरच पडला आहे. हे शासनाचे पत्र आल्यानंतर तातडीने महापालिकेच्या नगरविकास विभागाने यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणे आवश्यक होते. तातडीने एक समिती स्थापन करून त्याबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी आवश्यक होती. पण याबाबत कोणतीही कार्यवाही नगररचना विभागाच्यावतीने करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे तो पुन्हा रखडणार, हे आता निश्चित झाले आहे.आराखडा आणि प्राधिकरणाची सांगडशहराची हद्दवाढ किंचितही झालेली नाही, त्यातच नवे प्राधिकरण निर्माण करण्यात आले आहे. प्राधिकरणाशी सुसंगत नियोजन तिसºया विकास आराखड्यात असणे आवश्यक आहे. त्यासाठी शहराचा विकास आराखडा आणि प्राधिकरण यांची सांगड घालून दोन्हीही अधिकाºयांनी एकत्रित काम करणे आवश्यक होणार आहे. त्यानंतरच तो नवीन विकास आराखडा परिपूर्ण होईल.तिसरा विकास आराखडा तयार करण्याबाबत शासनाच्या नगरविकास खात्याचे सात महिन्यांपूर्वी पत्र मिळाले आहे. त्याबाबत विद्यमान वापर नकाशा आणि प्रस्तावित वापर नकाशा तयार करण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हे निविदा प्रसिद्धीकरणाच्या मंजुरीसाठी येत्या चार दिवसांत आयुक्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रक्रियेला प्रारंभ होईल.- धनंजय खोत,सहाय्यक संचालक, नगररचना