शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वीस कोटींच्या थकबाकीकडे दुर्लक्ष : मनपा इस्टेट विभागाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:06 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी ...

ठळक मुद्देठोस भूमिका घेण्यास असमर्थ; विविध कारणांनी वसुलीत विघ्ने

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी शंभर टक्के वसुलीत विघ्ने निर्माण झाली आहेत.गेल्या तीन वर्षांपासून मनपा मालकीच्या १५७५ दुकानांचे मासिक भाडेच जमा होत नाही.

मात्र, त्यांच्या वसुलीकरिता ठोस प्रयत्न होत नसल्याने या दुकानदारांकडे १८ ते २० कोटींची थकबाकी अडकून पडली आहे. जमा-खर्चाचा ताळमेळ घालण्याकरिता प्रशासन यावर्षी घरफाळा वाढविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे; पण अशा थकबाकीकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले गेले आहे. दुकानदारांना कधी ना कधी ही थकबाकीची रक्कम व्याजासह भरावी लागणार असली तरीही ती भरण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. ‘दुकानदार जातात कुठं’ असे म्हणत प्रशासनही गप्प आहे. दोन्ही बाजूंच्या निष्काळजीपणामुळे आणि अशा छोट्या थकबाकीमुळे महापालिकेचा हिशोब चुकत राहिला आहे.

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार महापालिकेच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरचा दर आधारभूत ठरविला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५पासून सुरू झाली आहे. त्यामुळे जेथे ६०० ते ८०० रुपये भाडे भरायला लागत होते तेथे आता नव्या नियमानुसार भाडे काही महत्त्वाच्या ठिकाणी ६५०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्याला दुकानदारांनी विरोध केला. नवीन भाडे भरण्यास त्यांनी ठाम नकार दिला. मनपा प्रशासनानेही भाडेवाढीला विरोध करणाºयांचे भाडे करार वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे करार संपूनही तीन वर्षे होत आली तरी भाडेवाढ आणि भाडे कराराचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, वार्षिक साधारणपणे ६ ते ७ कोटी रुपयांचे हक्काचे उत्पन्न मनपाला मिळत नाही.

जनता बझार, महालक्ष्मी अन्नछत्र यांसह शाहूपुरीतील तुळजाभवानी मार्केटमधील १२ गाळेधारकांनी नवीन भाडेपद्धत स्वीकारून कराराची मुदत वाढवून घेतली.न्यायालयाने याचिका फेटाळलीमनपा प्रशासनाने रेडिरेकनरवर भाडे आकारणीची पद्धत सुरू केल्यामुळे विशेषत: शिवाजी व शाहू मार्केटमधील गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. तेथील रेडिरेकनरचे दर इतर ठिकाणांपेक्षा जास्त असल्याने भाडेवाढीचा सर्वांत जास्त फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे या मार्केटमधील सुमारे १०० हून अधिक गाळेधारक न्यायालयात गेले. त्यातील २५ गाळेधारकांची याचिका फेटाळली. त्यामुळे नवीन भाडे पद्धतीनुसार भाडे भरणे बंधनकारक आहे. मनपा प्रशासन ज्यांचे निकाल लागले अशांच्या दुकानगाळ्यांना नवीन भाडे आकारणी करणे आवश्यक असताना त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे.

नुसतीच कागदोपत्री कार्यवाहीनवीन भाडेवाढीसंदर्भात प्रशासनाने सर्व गाळेधारकांना वैयक्तिक नोटिसा देऊन भाडे भरण्यास बजावले. गाळेधारकांनी नोटीस घेतली; पण भाडे भरले नाही. तरीही प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. जे गाळेधारक भाडे तसेच थकबाकी भरणार नाहीत, अशांवर कारवाई म्हणून कायद्यातील तरतूद ८१ ब प्रमाणे दुकानगाळे ताब्यात घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत; पण आयुक्तांनीही या अधिकाराचा वापर केलेला नाही.सवलत मिळणे अशक्यराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने नवीन भाडे आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यामध्ये सवलत मिळणे अशक्य आहे. जरी भविष्यात नवीन करार झाले तरी त्याची आकारणी ही १ एप्रिल २०१५ पासूनच होणार आहे. काही गाळेधारकांनी परवडत नाही म्हणून गाळा सोडला तरीही त्यांच्याकडील थकबाकी वसुली ही अन्य पर्यायी मार्गाने होणार आहे. त्यामुळे यातून कोणाची सुटका होणार नाही.- सचिन जाधव, इस्टेट विभागमहापालिकेचे एकूण दुकानगाळे - २३००कराराची मुदत संपलेल्या दुकानगाळ्यांची संख्या - १५७५१ एप्रिल २०१५ पासून रेडिरेकनरवर भाड्याची आकारणी सुरूदुकानदारांचा नवीन भाडे भरण्यास स्पष्ट नकारगेल्या तीन वर्षांत १८ ते २० कोटींची थकबाकी