शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

वीस कोटींच्या थकबाकीकडे दुर्लक्ष : मनपा इस्टेट विभागाचा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:06 IST

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी ...

ठळक मुद्देठोस भूमिका घेण्यास असमर्थ; विविध कारणांनी वसुलीत विघ्ने

भारत चव्हाण ।कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाची आर्थिक बाजू कमकुवत असली तरी उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून शंभर टक्के वसुली झाली तर काही प्रमाणात आर्थिक परिस्थिती सुधारण्यास वाव आहे; परंतु दैनंदिन कामाची व्याप्ती, अपुरे मनुष्यबळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयाचा अभाव, घेतलेल्या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात होत असलेली टाळाटाळ, अशा विविध कारणांनी शंभर टक्के वसुलीत विघ्ने निर्माण झाली आहेत.गेल्या तीन वर्षांपासून मनपा मालकीच्या १५७५ दुकानांचे मासिक भाडेच जमा होत नाही.

मात्र, त्यांच्या वसुलीकरिता ठोस प्रयत्न होत नसल्याने या दुकानदारांकडे १८ ते २० कोटींची थकबाकी अडकून पडली आहे. जमा-खर्चाचा ताळमेळ घालण्याकरिता प्रशासन यावर्षी घरफाळा वाढविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे; पण अशा थकबाकीकडे मात्र सोईस्कर दुर्लक्ष केले गेले आहे. दुकानदारांना कधी ना कधी ही थकबाकीची रक्कम व्याजासह भरावी लागणार असली तरीही ती भरण्याकडे ते दुर्लक्ष करीत आहेत. ‘दुकानदार जातात कुठं’ असे म्हणत प्रशासनही गप्प आहे. दोन्ही बाजूंच्या निष्काळजीपणामुळे आणि अशा छोट्या थकबाकीमुळे महापालिकेचा हिशोब चुकत राहिला आहे.

राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार महापालिकेच्या दुकानगाळ्यांच्या भाड्यासाठी सध्याच्या रेडिरेकनरचा दर आधारभूत ठरविला आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५पासून सुरू झाली आहे. त्यामुळे जेथे ६०० ते ८०० रुपये भाडे भरायला लागत होते तेथे आता नव्या नियमानुसार भाडे काही महत्त्वाच्या ठिकाणी ६५०० रुपयांपर्यंत पोहोचले. त्याला दुकानदारांनी विरोध केला. नवीन भाडे भरण्यास त्यांनी ठाम नकार दिला. मनपा प्रशासनानेही भाडेवाढीला विरोध करणाºयांचे भाडे करार वाढवून देण्यास नकार दिला. त्यामुळे करार संपूनही तीन वर्षे होत आली तरी भाडेवाढ आणि भाडे कराराचा प्रश्न सुटलेला नाही. परिणामी, वार्षिक साधारणपणे ६ ते ७ कोटी रुपयांचे हक्काचे उत्पन्न मनपाला मिळत नाही.

जनता बझार, महालक्ष्मी अन्नछत्र यांसह शाहूपुरीतील तुळजाभवानी मार्केटमधील १२ गाळेधारकांनी नवीन भाडेपद्धत स्वीकारून कराराची मुदत वाढवून घेतली.न्यायालयाने याचिका फेटाळलीमनपा प्रशासनाने रेडिरेकनरवर भाडे आकारणीची पद्धत सुरू केल्यामुळे विशेषत: शिवाजी व शाहू मार्केटमधील गाळेधारकांचे धाबे दणाणले आहेत. तेथील रेडिरेकनरचे दर इतर ठिकाणांपेक्षा जास्त असल्याने भाडेवाढीचा सर्वांत जास्त फटका त्यांना बसला आहे. त्यामुळे या मार्केटमधील सुमारे १०० हून अधिक गाळेधारक न्यायालयात गेले. त्यातील २५ गाळेधारकांची याचिका फेटाळली. त्यामुळे नवीन भाडे पद्धतीनुसार भाडे भरणे बंधनकारक आहे. मनपा प्रशासन ज्यांचे निकाल लागले अशांच्या दुकानगाळ्यांना नवीन भाडे आकारणी करणे आवश्यक असताना त्याकडे डोळेझाक करताना दिसत आहे.

नुसतीच कागदोपत्री कार्यवाहीनवीन भाडेवाढीसंदर्भात प्रशासनाने सर्व गाळेधारकांना वैयक्तिक नोटिसा देऊन भाडे भरण्यास बजावले. गाळेधारकांनी नोटीस घेतली; पण भाडे भरले नाही. तरीही प्रशासनाने त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही. जे गाळेधारक भाडे तसेच थकबाकी भरणार नाहीत, अशांवर कारवाई म्हणून कायद्यातील तरतूद ८१ ब प्रमाणे दुकानगाळे ताब्यात घेण्याचे अधिकार आयुक्तांना आहेत; पण आयुक्तांनीही या अधिकाराचा वापर केलेला नाही.सवलत मिळणे अशक्यराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार महापालिकेने नवीन भाडे आकारणी सुरू केली आहे. त्यामुळे त्यामध्ये सवलत मिळणे अशक्य आहे. जरी भविष्यात नवीन करार झाले तरी त्याची आकारणी ही १ एप्रिल २०१५ पासूनच होणार आहे. काही गाळेधारकांनी परवडत नाही म्हणून गाळा सोडला तरीही त्यांच्याकडील थकबाकी वसुली ही अन्य पर्यायी मार्गाने होणार आहे. त्यामुळे यातून कोणाची सुटका होणार नाही.- सचिन जाधव, इस्टेट विभागमहापालिकेचे एकूण दुकानगाळे - २३००कराराची मुदत संपलेल्या दुकानगाळ्यांची संख्या - १५७५१ एप्रिल २०१५ पासून रेडिरेकनरवर भाड्याची आकारणी सुरूदुकानदारांचा नवीन भाडे भरण्यास स्पष्ट नकारगेल्या तीन वर्षांत १८ ते २० कोटींची थकबाकी