शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘आयजीएम’चा कारभार सरकारकडे

By admin | Updated: February 10, 2017 00:49 IST

उच्च न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र : फेब्रुवारीअखेर बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी

मुंबई/इचलकरंजी : इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाचा (आयजीएम) कारभार फेब्रुवारी अखेरपासून नगरपंचायतीऐवजी राज्य सरकार पाहणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात गुरुवारी सरकारनेच ही माहिती दिली.नगरपालिकेचा आयजीएम रुग्णालय शासनाने हस्तांतरित करून घेण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी हिरवा कंदील दाखविला. त्यामुळे रुग्णालय शासनाकडे वर्ग होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, शासनातर्फे रुग्णालयाकडे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लूर व न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांनी या रुग्णालयाची याचिका निकाली काढली. कर्जामध्ये बुडालेल्या नगरपंचायतीला आयजीएम रुग्णालयाचे कामकाज पाहणे अशक्य झाले. रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधाही नगरपंचायतीला पुरविणे अशक्य झाले. त्याशिवाय पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. विविध उपकरणेही रुग्णालयात उपलब्ध नाहीत. परिणामी गरीब रुग्णांना महागड्या रुग्णालयात जाऊन सर्व चाचण्या कराव्या लागतात. नगरपंचायत रुग्णालय चालविण्यास सक्षम नसल्याने राज्य सरकारला हे रुग्णालय चालविण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका इचलकरंजीचे सामाजिक कार्यकर्ते उमेश खांडेकर व दत्ता पाटील यांनी यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केली. या याचिकेवर १२ जानेवारीला झालेल्या सुनावणीत राज्य शासन आणि नगरपालिका यांनी पुढील सुनावणी (९ फेब्रुवारी)पर्यंत नव्याने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यावर राज्य सरकारने गुरुवारच्या सुनावणीत आयजीएम रुग्णालय चालविण्याचा निर्णय घेतल्याचे खंडपीठाला सांगितले. यासंबंधी नगरविकास विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले. इचलकरंजी नगरपंचायतीवर ९५ कोटी रुपयांचे कर्ज आहे आणि उत्पन्न अवघे ४० कोटी रुपये आहे. नगरपंचायतीची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने राज्य सरकारने आयजीएमचा कारभार ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने रुग्णालयाचा कारभार ताब्यात घेण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले. (प्रतिनिधी)न्यायालयाने याचिका काढली निकालीशासनातर्फे फेब्रुवारीअखेर रुग्णालयाकडील बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याची हमी दिली. त्यावर न्यायालयाने रुग्णालय टप्प्याटप्प्याने ताब्यात घेऊन सुरू करण्याचे आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.