शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

इफकोचा शेतकऱ्यांना दरवाढीचा करंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:24 IST

कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमुळे इतर कंपन्यापेक्षा ५० रुपयांनी दर कमी करून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपणाऱ्या इफको या कंपनीने आता आजवरच्या ...

कोल्हापूर : गतवर्षी लॉकडाऊनमुळे इतर कंपन्यापेक्षा ५० रुपयांनी दर कमी करून शेतकऱ्यांप्रती बांधिलकी जपणाऱ्या इफको या कंपनीने आता आजवरच्या इतिहासातील उच्चांकी दरवाढ करून शेतकऱ्यांना जोरदार दणका दिला आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या डीएपी, १०:२६:२६ या खतांच्या किमती तर पाेत्यामागे ६०० ते ७०० रुपयांनी वाढवल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात इफको कंपनीने ही कमाल दरवाढ असून यात काही प्रमाणात सूट देण्याबाबतचे धोरण चार दिवसांत निश्चित होईल असे म्हटले आहे.

केंद्र सरकारने युरिया वगळता सर्व खतांच्या किंमतीवरील नियंत्रण उठवले आहे, त्यामुळे कंपन्यांना वाटेल तेव्हा आणि परवडेल तसे दर लावण्याची मुभा मिळाली आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे या किमतीत फारशी वाढ झाली नव्हती; पण यावर्षी मात्र ही सर्व कसर भरून काढण्याचे कंपन्यांनी ठरवले आहे. लॉकडाऊनमुळे झालेले नुकसान, बंद पडलेले उत्पादनाचे प्रकल्प, कच्च्या मालाच्या आयातीवर लागलेले निर्बंध, वाढवलेला आयात कर व जीएसटी यामुळे आधीच खत निर्मिती उद्योग अडचणीत आला आहे. त्यात इंधन दरवाढ आणि त्यामुळे झालेल्या मालवाहतुकीच्या व कार्गोच्या भाड्यात झालेल्या वाढीची भर पडली आहे. त्यामुळे कंपन्यांनी तोटा भरून काढण्यासाठी भरमसाठ दरवाढीचे अस्त्र बाहेर काढले आहे. एकाच वेळी पोत्यामागे ४२५ ते ७०० रुपयांची वाढ ही पहिल्यांदाच झाली आहे.

चौकट ०१

शेतकऱ्याचे गणित विस्कटणार

लहरी हवामान आणि सरकारच्या धरसोड वृत्तीच्या धोरणामुळे पूर्णवेळ शेती कसणेच अवघड बनले आहे. खतांचे दर सातत्याने वाढत आहेत, बियाण्यांचेही दर वाढले आहेत, कीटकनाशके आणि टॉनिक फवारणीचा अतिरिक्त खर्चाचीही भर पडत आहे. मशागतीचे दर वाढले आहेत. या सर्वांतून पीक काढले तर त्याला योग्य दर मिळेल याची शाश्वती नाही. जमिनींना खतांची सवय झाल्याने ती कितीही महाग झाली तरी घ्यावीच लागतात. या दरवाढीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार असून पूर्ण गणितच विस्कटून जाणार आहे.

चौकट ०२

खत जुना दर नवीन दर वाढ

डीएपी १२०० १९०० ७००

१०:२६:२६ ११७५ १७७५ ६००

१२:३२:१६ ११४५ १८०० ६४५

२०:२०:०:१३ ९२५ १३५० ४२५

चौकट ०३

जुना साठा जुन्याच दराने विक्री

कंपनीने आतापर्यंत पुरवठा केलेला माल जुन्याच दराने विक्री करावयाचा आहे, हे इफको कंपनीने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. टनामागे ४८० रुपयांचे मार्जिन वितरकांना कायम ठेवण्यात आल्याचेही म्हटले आहे.

चौकट ०४

प्रतिक्रिया

नवीन दर छापलेला माल येईपर्यंत जुन्या दराने खतांची विक्री करावी याबाबत कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. दोन दिवसांपासून साठा तपासणीही सुरू केली. वाढीव दराने विक्री केल्याचे आढळल्यास कारवाई होणार आहे.

-ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर