शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नोंदणी विवाह केल्यास दहा हजार रुपये

By admin | Updated: October 28, 2015 00:46 IST

सुधारित योजना : लाभ घेण्याचे आवाहन; खर्चात बचत करण्यासाठी उपक्रम

कोल्हापूर : सामूहिक विवाह योजनेत सहभागी न होता थेट विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह केल्यास दहा हजार रुपये भेट म्हणून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पूर्वीची सामूहिक विवाह योजना सुधारित केली असून, त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे.राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने सामूहिक शुभमंगल, नोंदणीकृत विवाह योजना सुरू केली. विदर्भातील शेतकऱ्यांबरोबरच इतर सर्व जिल्ह्यांतील शेतकरी, शेतमजुरांच्या मुलीच्या लग्नाच्या खर्चात बचत होईल. गरीब शेतकरी व शेतमजूर यांच्यावर विवाह सोहळ्याचा आर्थिक बोजा पडू नये आणि त्यासाठी त्यांनी कर्ज घेऊ नये, या दृष्टीने ‘नोंदणीकृत विवाह’ या सर्वोत्तम उपाय आहे. विवाहेच्छुक जोडप्यांना कोणत्याही स्वयंसेवी संस्थेवर अवलंबून राहण्याची व सामुदायिक विवाह सोहळ्याच्या तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. त्यांना स्वत:हून केव्हाही नोंदणी कार्यालयात जाऊन लग्न करता येईल. मुलींचा सामूहिक विवाह आयोजित केल्यास सामूहिक विवाहात सामील होणाऱ्या प्रतिजोडप्यास दहा हजार आणि सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा स्वयंसेवी संस्थेला प्रतिजोडप्यास दोन हजार इतके अनुदान शासनामार्फत देण्यात येईल, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस. डी. मोहिते यांनी सांगितले. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील दाम्पत्ये पात्र राहणार नाहीत. त्यांच्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग तसेच आदिवासी विभागामार्फत स्वतंत्र योजना राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यकसामूहिक विवाह हे शक्यतो तालुकापातळीवर आयोजित करावेत आणि त्यांमध्ये तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. अर्थसाहाय्याकरिता सहभागी जोडप्यांनी व संबंधित स्वयंसेवी संस्थेने विवाहाची माहिती विशिष्ट नमुन्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.