शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कनेक्शन तोडण्याची सक्ती कराल तर कायदा हातात घेऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:22 IST

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिलांच्या वाढलेल्या थकबाकीस सरकारची धरसोड वृत्तीच कारणीभूत असताना आता सर्वसामान्य ग्राहकांना कनेक्शन तोडून वेठीस धरले ...

कोल्हापूर : लॉकडाऊन काळातील वीजबिलांच्या वाढलेल्या थकबाकीस सरकारची धरसोड वृत्तीच कारणीभूत असताना आता सर्वसामान्य ग्राहकांना कनेक्शन तोडून वेठीस धरले जात आहे. ही सक्ती थांबवली नाही तर कायदा हातात घेऊ, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला. लॉकडाऊन काळातील सहा महिन्यांची बिले अजिबात भरणार नाही याचा पुनरुच्चारही केला.

महावितरणकडून कनेक्शन तोडले जात असल्याच्या विरोधात कोल्हापुरात शुक्रवारी दुपारी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप वगळता इतर सर्वपक्षीयांनी राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. पंचगंगा पुलावर दर्ग्यासमोर तासभर पुणे-बंगळूर महामार्ग दोन्ही बाजूंकडून रोखून धरल्याने वाहनांच्या २५ किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागल्या. वाहने रस्त्यावर थांबून राहिल्याने बऱ्याच वर्षांनी केवळ आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग तासाभरासाठी पूर्णपणे ठप्प झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह वीजबिल विरोधी कृती समिती, राज्य इरिगेशन फेडरेशन, माकप, जनता दल, किसान सभा, आप, जनसुराज्य, शिवसेना, राष्ट्रवादी, निवृत्त वीज कर्मचारी संघटना यांनी या चक्का जाम आंदोलनात सहभाग घेतला. उन्हाच्या कडक झळांची पर्वा न करता आंदोेलकांनी तापलेल्या महामार्गावरच ठिय्या मारला. भरणार नाही, भरणार नाही, वीजबिल भरणार नाही, अशा जोरदार घोषणा देत लढ्याचा निर्धार अधिक पक्का केला.

आंदोलनात विक्रांत पाटील-किणीकर, प्रताप होगाडे, उदय नारकर, संजयबाबा घाटगे, प्रा. जालंदर पाटील, जनार्दन पाटील, बाबा पार्टे, बाबासो देवकर, जयकुमार शिंदे, प्रा. सुभाष जाधव, राजेंद्र पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, समीर पाटील, रवी जाधव, वसंतराव पाटील, वैभव कांबळे, सचिन जमदाडे, रमेश मोरे, स्वस्तिक पाटील, मारुती पाटील, अशोक पोवार यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

चौकट ०१

पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा पूर्वेतिहास माहीत असल्याने पोलिसांनी अधिक दक्षता घेतली होती. पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५० पोलीस, सात व्हॅन, अग्निशमक सेवा महामार्गावर सकाळी अकरा वाजल्यापासून तैनात ठेवण्यात आली होते. महामार्ग रोखल्यानंतर कसबा बावडा, शिये मार्गे शहरातील वाहतूक वळवण्यात आली, तरी लांब रांगा लागल्या होत्या.

चौकट ०२

साधारण एकच्या सुमारास आंदोलक महामार्गावर येऊन बसले. पंधरा मिनिटांनंतर पोलीस शेट्टी यांना ताब्यात घेण्यास पुढे सरसावल्यावर आंदोलक अक्षरश: पोलिसांवर तुटून पडले. शेतकऱ्यांनी शेट्टींच्या भोवती कडे केल्याने एकच गोंधळ उडाला. अखेर पोलीस मागे हटल्यानंतर पुढे तासभर आंदोलन शांततेत सुरू राहिले.