शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

वीज नाही तर आम्हाला फास द्या

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

शिवसेनेचे आंदोलन : मुख्य अभियंता धारेवर; कनेक्शन न दिल्यास आकडा टाकणार

कोल्हापूर : वीज नाही तर गळफासासाठी दोरी (फास) द्या, असे म्हणत शिवसेनेने येथील ताराबाई पार्कातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. अर्ज करूनही वेळेत विजेचे कनेक्शन न दिल्यास शेतकरी आकडा टाकून वीज घेतील, अशा इशारा देत विविध मागण्यांसंबंधी मुख्य अभियंता शंकर शिंदे यांना धारेवर धरून निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, पाऊस कमी झाल्याने भूजल पातळी घटली आहे. परिणामी विंधन विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. पाणी असलेल्या ठिकाणी ते उपसण्यासाठी नियमित वीज मिळत नाही. मागणी करूनही अनेक वर्षांपासून वीज कंपनीने संबंधित शेतकऱ्यांना नियमानुसार वीज कनेक्शन दिलेले नाही.काँग्रेस, राष्ट्रवादीच्या काही पुढाऱ्यांच्या मर्जीतील ठेकेदारांना नवीन खांब व ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे काम दिले आहे. मात्र, ते ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहेत. तांत्रिक कारणे पुढे करीत वेळेत काम न केल्याने गरजू शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. त्यामुळे निकृष्ट आणि कामात दिरंगाई केलेल्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. वेळेत वीज कनेक्शन न दिल्याने पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, पंधरा दिवसांत नवीन वीज कनेक्शन शेतकऱ्यांना द्यावे. जप्त केलेले विद्युत पंप परत करावेत, दंडात्मक कारवाई मागे घ्यावी. निवेदन घेतल्यानंतर शिंदे म्हणाले, वेळेत काम न केलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकले आहे. दुसऱ्या ठेकेदारास काम दिले आहे. जप्त केलेले विद्युत पंप परत करण्याची सूचना दिली जाईल. सर्वच मागण्यांचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवू.जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, वीज कनेक्शन न दिल्याने पिके वाळली म्हणून जर शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, तर त्यास वीज कंपनीचे अधिकारी जबाबदार असतील. अशी घटना घडल्यास वीज कंपनीचे कार्यालय शिवसेना फोडेल. यावेळी शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रज, शहरप्रमुख शिवाजी जाधव, दिलीप जाधव, भगवान कदम, युवराज पाटील, शुभांगी साळोखे, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते. टेबलावर फाससाठीची दोरी..निवेदन देण्यासाठी आंदोलकांचे शिष्टमंडळ शिंदे यांच्या कक्षात गेले. त्यावेळी फास लावून आत्महत्या करण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी काही शेतकऱ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आणली होती. ती दोरी शिंदे यांच्या टेबलवर ठेवली. वीज नाही दिली तर या दोरीनेच गळफास घेऊ, असा इशाराही यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी दिला.