शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
6
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
7
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
8
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
9
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
10
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
12
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
13
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
14
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
15
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
16
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
17
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
18
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
19
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
20
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?

रुची घेऊन संशोधन केल्यास मिळते भरीव यश

By admin | Updated: January 2, 2015 00:58 IST

सुभाष खोत : शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

कोल्हापूर : विषय अध्ययनात आणि संशोधनात रुची असेल तरच संशोधन क्षेत्रात भरीव यश संपादन करता येते. मला गणिताची सुरुवातीपासून आवड होती आणि म्हणूनच मी त्या संदर्भातील संशोधनाकडे वळलो, असे भारताचे युवा गणिततज्ज्ञ डॉ. सुभाष खोत यांनी आज, गुरुवारी येथे सांगितले. गणितातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा आंतरराष्ट्रीय रॉल्फ नॅवेलिना पुरस्कार पटकाविणाऱ्या डॉ. खोत यांच्यासोबत चर्चेने आज शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी नववर्षाचा प्रारंभ झाला. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, तर बी.सी.यू.डी. संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, डॉ. खोत यांच्या मातोश्री डॉ. जयश्री खोत प्रमुख उपस्थित होत्या.डॉ. खोत यांनी स्वत:च्या संशोधनाविषयी सोप्या शब्दांत तपशीलवार माहिती दिली. कोणतीही गणितीय व संगणकीय समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारे पद्धतशीर अल्गॉरिदम तयार करणे; ती समस्या सोडविण्यासाठी लघुतम मार्ग शोधणे हा आपल्या संशोधनाचा मूलभूत पाया आहे. संशोधन अधिक प्रभावी होण्यासाठी संशोधकांवरील अध्यापन व प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे प्रमाण कमी करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे संशोधनासाठी आवश्यक स्वातंत्र्य, स्वायत्तता देण्याबरोबरच आवश्यक निधीची तरतूद तसेच पुरस्कारांची योजना करण्याची आवश्यकता आहे. संशोधक आणि शिक्षक यांच्यामध्ये स्पर्धेऐवजी सामंजस्य व परस्पर विश्वासाची भावना वृद्धिंगत होण्याला खूप महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.कुलगुरू डॉ. पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी डॉ. खोत यांच्यापासून प्रेरणा घेऊन संशोधनाच्या विविध क्षेत्रांत करिअर करण्यासाठी पुढे यावे.यावेळी विद्यापीठातर्फे डॉ. खोत आणि त्यांच्या मातोश्रींचा स्मृतिचिन्ह व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)शंकांचे समाधान...सध्या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या कोरंट इन्स्टिट्यूट आॅफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमध्ये संगणकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. खोत हे मूळचे इचलकरंजीचे आहेत. नव्या वर्षाची प्रेरणादायी सुरुवात करण्याचे ठरवून शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांचा संवाद घडवून आणण्याचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी ठरविले होते. त्यानुसार आज सकाळच्या सत्रात डॉ. खोत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपल्या एकूण कारकिर्दीविषयी आणि संशोधनाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मनमोकळेपणे माहिती दिली आणि त्यांच्या शंकांचे समाधानही केले.