शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

लोढणे झालो असेन तर तसे सांगा..!-- लुटारूंना महायुतीत घेऊ नये

By admin | Updated: July 30, 2014 00:30 IST

शेट्टी यांनी युतीला ठणकावले : दलबदलूंना कडाडून विरोधच

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह राष्ट्रीय समाज पक्ष व रिपब्लिकन पक्ष आठवले गटाची विधानसभा निवडणुकीत गरज आहे की आमचे लोढणे झाले आहे, हे तरी एकदा त्यांनी स्पष्टपणे सांगावे, अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल, सोमवारी मुंबईत झालेल्या महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकीत केली. आम्ही लोढणे झालो असू, तर आमचा आम्हाला मार्ग मोकळा आहे. नंतर जागावाटपात पुढे जाऊन ऐनवेळी जमत नाही असे सांगू नका, असेही शेट्टी यांनी मुख्यत: शिवसेना व भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांना ठणकावले.मुंबईत झालेल्या या बैठकीस ‘स्वाभिमानी’तर्फे शेट्टी यांच्यासह सदाभाऊ खोत, प्रा. जालंदर पाटील उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत महायुती घडविण्यात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा पुढाकार होता. त्यांच्याशी शेट्टी यांचे चांगले संबंध होते. शेट्टी यांची ताकद त्यांना माहीत होती; परंतु लोकसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीकडून इतर घटकपक्षांबद्दल कुरघोडीचे राजकारण सुरू झाले आहे. या घटकपक्षांना सगळ्या मिळून १५च जागा दिल्या जातील, अशा बातम्याही युतीच्या नेत्यांकडून पेरल्या जात आहेत. त्याबद्दलही शेट्टी यांनी सुरुवातीलाच विचारणा केली. तुमची १५ जागा देण्याची भूमिका असेल, तर आजच्या बैठकीत पुढे चर्चा करायलाच नको, असे त्यांनी म्हटल्यावर युतीच्या नेत्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेला १५ हा आकडा खोटा असून, अजून किती जागा द्यायच्या, हा निर्णय कोणत्याच पातळीवर झाला नसल्याचे स्पष्ट केले. पहिलीच बैठक असल्याने त्यामध्ये जागावाटपाबाबत फारशी चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले.लोकसभा निवडणुकीत जे लोक महायुतीच्या थेट विरोधात काम करीत होते, त्यांना आता शिवसेना-भाजपने उमेदवारी देऊ नये, असा आग्रह बैठकीत शेट्टी यांनी धरला. आमची ताकद किती व काय आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे. त्यामुळे कुठपर्यंत थांबायचे हेदेखील आमचे ठरलेले आहे; परंतु महायुतीतील महत्त्वाच्या दोन पक्षांची भूमिका जर आम्हाला सन्मान देण्याची नसेल, तर विधानसभेला महायुती आकारास येण्यात अडचणी येतील, असे शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी) 

लुटारूंना महायुतीत घेऊ नयेगेल्या पंधरा वर्षांत दोन्ही काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी सत्तेचा गैरवापर करून सरकारला लुटले. त्यांची जनमानसातील प्रतिमा अत्यंत वाईट आहे. असेच काही नेते आता महायुतीचे सरकार येणार म्हटल्यावर उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. अशा लोकांना सामान्य जनतेचा तीव्र विरोध आहे. झेंडा बदलून येणाऱ्या अशा भ्रष्ट नेत्यांना प्रमुख दोन्ही पक्षांनी महायुतीत घेऊ नये, अशी भूमिकाही शेट्टी यांनी बैठकीत मांडली.