शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

अभ्यासात पंचसूत्रीचा अवलंब केल्यास यश तुमचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:17 IST

कोल्हापूर : बारावीतील टक्केवारी घसरू नये म्हणून आत्मविश्वास, एकाग्रता, वेळेचे नियोजन, लिहिण्याचे कौशल्य, मनाची ताकद या पंचसूत्रीचा अवलंब ...

कोल्हापूर : बारावीतील टक्केवारी घसरू नये म्हणून आत्मविश्वास, एकाग्रता, वेळेचे नियोजन, लिहिण्याचे कौशल्य, मनाची ताकद या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास यश तुमचेच असते, असा यशाचा मंत्र प्रा. शशिकांत कापसे यांनी सांगितला. दृष्टिकोन बदलला तर कोणताही विषय अवघड नसतो, सकारात्मक विचाराने परीक्षेला सामोरे जा, असेही अनुभव सांगितले.

लोकमत बालविकास मंच आणि ओम सायन्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने केशवराव भोसले नाट्यगृहात ‘विज्ञान शाखेतील करिअर’ या विषयावर विद्यार्थी व पालक सुसंवाद करिअर विषय मार्गदर्शन आणि समुपदेशन या कार्यक्रमात ते बोलत होते. इचलकरंजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादनाने झाली. कोल्हापूर पब्लिक स्कूलच्या संस्थापक शोभा तावडे, शशिकांत कापसे, सविता कापसे, इव्हेन्ट मॅनेजर दीपक मनाठकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यानंतर दहावीत ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला. कोल्हापुरातील गिर्यारोहक कस्तुरी सावेकर हिचा सत्कार ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाला.

प्रा. कापसे यांनी सविस्तर विवेचन करताना दहावी, बारावी हे जीवनातील टर्निंग पॉईट असतात. हाच टप्पा जीवन घडविणार की बिघडविणार ते ठरवत असल्यामुळे याला हलक्यात घेऊन चालत नाही. बारावीचा अभ्यास हा दहावीपेक्षा पाचपट अधिक असतो. स्पर्धा वाढली असल्याने तेथे तुमचे अस्तित्व दाखविण्यासाठी तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात, असे समजून तयारी करावी लागते. मनात ध्येय निश्चित केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, फक्त योग्य ट्रॅक पकडायला लागतो हे लक्षात घ्या असे सांगितले.

कोल्हापुरातील वरणगे पाडळीसारख्या छोट्या गावातून शेतकरी कुटुंबातून येऊनदेखील आलेल्या प्रत्येक अडचणीचा धीराचा सामना करीत पोलीस अधिकारी बनलेल्या इचलकरंजीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बालपण ते आयपीएस होण्यापर्यंतचा प्रवास मांडताना स्वत:मध्ये कष्ट करण्याची तयारी असेल आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल तर जीवनातील कोणत्याही टप्प्यावर तुम्हाला अपयश येत नाही असे सांगितले. संकटे आली, अपयश आले म्हणून आत्महत्येचा मार्ग स्विकारु नका, अडचण असेल तर थेट माझ्याशी येऊन बोला असे सांगत गायकवाड यांनी पालकांनीही मुलांचे खच्चीकरण करण्यापेक्षा त्यांचे मनोधैर्य उंचवावे अशी विनंती केली.

चौकट ०१

दक्षता घेऊनच कार्यक्रम

कोरोनामुळे जाहीर कार्यक्रमावर मर्यादा आहेत; पण ‘लोकमत’ने कोरोनाविषयक उपाययोजनांची पुरेपूर काळजी घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम घेतला. कार्यक्रमापूर्वी पूर्ण सभागृह सॅनिटराईज करून घेतले गेले. बैठक व्यवस्थाही एक आड अशी ठेवण्यात आली होती. मास्क घालून व सॅनिटायझर लावूनच आत प्रवेश दिला जात होता.

चौकट ०२

फेसबुकवरून ऑनलाईन

काेरोनामुळे भव्य कार्यक्रमावर मर्यादा असल्याने ‘लोकमत’च्या फेसबुक पेजवरून या कार्यक़्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

चौकट ०३

मुलासह पालकांनाही मोलाचा सल्ला

मला हे जमेल का, हे मिळाले नाही, ते मिळाले नाही ही कारणे देत बसण्यापेक्षा उठा, ध्येय निश्चित करा, त्याचे मायक्रो प्लॅनिंग करा आणि कामाला लागा. मनात प्रबळ इच्छा असेल तर तुमचे ध्येय गाठण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही, अशा आश्वासक शब्दांत यशाचा कानमंत्र देत इचलकरंजीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बारावी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे मनोधैर्य उंचावले. आई-वडिलांनी मुलांना वेळ दिला आणि मुलांनीही त्यांचे कष्ट समजून घेतले तर यशस्वी पिढी घडण्यास वेळ लागत नाही, असे अनुभवाचे बोलही त्यांनी सांगितले.