शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

काँग्रेससारखा भामटेपणा कराल तर संघष

By admin | Updated: November 5, 2014 00:49 IST

रघुनाथदादांचा सरकारला इशारा : राजू शेट्टी कारखानदारांचे बाहुले असल्याची टीर्का

कोल्हापूर : भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर द्यावा. कॉँग्रेस सरकारसारखेच तुम्हीही भामटेपणा करणार असाल तर रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सरकारला दिला. गेले वर्षभरात कोणत्या वस्तूची महागाई कमी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी तीन हजारांची मागणी २७०० रुपयांवर आणली? यावरून शेट्टी हे कारखानदारांच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात उत्पादन खर्च व एकूण नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अशी अपेक्षा आहे. किमान या सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या सरकारने निवडणुकीतील आश्वासने पाळली पाहिजेत. कॉँग्रेस सरकारसारखाच भामटेपणा केला तर संघर्ष अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आश्वासने पाळावीत, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्या पाच-सहा वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा उत्पादकांचे आंदोलन केले आणि त्यावेळी दोन-चार जागा पदरात पाडून घेतल्या. आताही तसेच आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी धडपड सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. राजकीय स्वार्थापोटी चळवळ चालविण्याचे काम शेट्टी यांनी सुरू केल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. ३५०० वरून मागे हटणार नाहीउसाचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी १२ नोव्हेंबरला सातारा येथे ऊस परिषद होत असून ३५०० रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.