शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

काँग्रेससारखा भामटेपणा कराल तर संघष

By admin | Updated: November 5, 2014 00:49 IST

रघुनाथदादांचा सरकारला इशारा : राजू शेट्टी कारखानदारांचे बाहुले असल्याची टीर्का

कोल्हापूर : भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर द्यावा. कॉँग्रेस सरकारसारखेच तुम्हीही भामटेपणा करणार असाल तर रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सरकारला दिला. गेले वर्षभरात कोणत्या वस्तूची महागाई कमी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी तीन हजारांची मागणी २७०० रुपयांवर आणली? यावरून शेट्टी हे कारखानदारांच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात उत्पादन खर्च व एकूण नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अशी अपेक्षा आहे. किमान या सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या सरकारने निवडणुकीतील आश्वासने पाळली पाहिजेत. कॉँग्रेस सरकारसारखाच भामटेपणा केला तर संघर्ष अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आश्वासने पाळावीत, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्या पाच-सहा वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा उत्पादकांचे आंदोलन केले आणि त्यावेळी दोन-चार जागा पदरात पाडून घेतल्या. आताही तसेच आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी धडपड सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. राजकीय स्वार्थापोटी चळवळ चालविण्याचे काम शेट्टी यांनी सुरू केल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. ३५०० वरून मागे हटणार नाहीउसाचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी १२ नोव्हेंबरला सातारा येथे ऊस परिषद होत असून ३५०० रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.