शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

काँग्रेससारखा भामटेपणा कराल तर संघष

By admin | Updated: November 5, 2014 00:49 IST

रघुनाथदादांचा सरकारला इशारा : राजू शेट्टी कारखानदारांचे बाहुले असल्याची टीर्का

कोल्हापूर : भाजप सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांप्रमाणे उत्पादन खर्चावर आधारित उसाचा दर द्यावा. कॉँग्रेस सरकारसारखेच तुम्हीही भामटेपणा करणार असाल तर रस्त्यावरील संघर्ष अटळ आहे, असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सरकारला दिला. गेले वर्षभरात कोणत्या वस्तूची महागाई कमी झाली म्हणून राजू शेट्टी यांनी तीन हजारांची मागणी २७०० रुपयांवर आणली? यावरून शेट्टी हे कारखानदारांच्या हातातील बाहुले असल्याचे स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली. नरेंद्र मोदी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात उत्पादन खर्च व एकूण नफ्यातील ५० टक्के हिस्सा शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सरकारने शेतकऱ्यांना उसाचा दर द्यावा, अशी अपेक्षा आहे. किमान या सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आहे. या सरकारने निवडणुकीतील आश्वासने पाळली पाहिजेत. कॉँग्रेस सरकारसारखाच भामटेपणा केला तर संघर्ष अटळ असल्याचे पाटील यांनी सांगितले. नवीन सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे माझे मित्र आहेत. त्यांनी ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. आता त्यांनी आश्वासने पाळावीत, एवढीच अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्या पाच-सहा वर्षांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. कांदा उत्पादकांचे आंदोलन केले आणि त्यावेळी दोन-चार जागा पदरात पाडून घेतल्या. आताही तसेच आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी राजू शेट्टी यांनी धडपड सुरू केली आहे. म्हणूनच त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत सरकारला डेडलाईन दिली आहे. राजकीय स्वार्थापोटी चळवळ चालविण्याचे काम शेट्टी यांनी सुरू केल्याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्याचेही पाटील यांनी सांगितले. ३५०० वरून मागे हटणार नाहीउसाचा उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना किमान प्रतिटन ३५०० रुपये दर मिळाला पाहिजे. यासाठी १२ नोव्हेंबरला सातारा येथे ऊस परिषद होत असून ३५०० रुपये घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.