शहरं
Join us  
Trending Stories
1
हा राजकीय पक्षाचा नाही, मराठीचा जल्लोष मेळावा; सेना-मनसे नेत्यांकडून वरळी डोम इथं पाहणी
2
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
3
झटक्यात २६ हजार फूट खाली आलं बोईंग विमान; घाबरलेल्या प्रवाशांनी थेट मृत्यूपत्रच लिहायला घेतलं!
4
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...
5
बापरे! प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर तब्बल ४.८ लाख रुपयांचे कर्ज, २ वर्षांत वाढला ९० हजारांचा बोजा
6
Sonajharia Minz : ५ वर्षांची असताना इंग्लिश मीडियमने नाकारला प्रवेश; आव्हानांना तोंड देत झाली युनेस्कोची को-चेअर
7
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
8
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
9
"म्हणून पुणेकर १ ते ४ झोपतात...", नेहा शितोळेने केला खुलासा, म्हणाली - "कारण ४नंतर ते..."
10
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
11
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
12
"काही जण मध्येच सोडून गेले पण...", 'प्रेमाची गोष्ट' मालिका संपल्यानंतर सावनीची पोस्ट, तेजश्रीला टोला?
13
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
14
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
15
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
16
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
17
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
18
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
19
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
20
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

अडचण होत असेल तर खुशाल बाजूला करा

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

राजू शेट्टींचे ‘भाजप’ला आव्हान : मंत्रिपद द्या, न द्या, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारच

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आंदोलन करणारच. आदोलन करतोय म्हणून मंत्रिपद देणार नसाल तर देऊ नका असे सांगतानाच आमच्या जिवावरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या आमची अडचण होत असेल तर भाजपने खुशाल आम्हाला बाजूला करावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.‘रासप’चे नेते महादेव जानकर यांनी मंत्रिपद न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहात? अशी विचारणा केली असता, आम्ही सरकारमधून का बाहेर पडावे? त्यांना अडचण वाटत असेल तर आम्हाला काढून टाकावे. मुळात आम्ही सत्तेसाठी सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकरीविरोधी धोरण घेतल्याने आम्ही महायुतीत सहभागी झालो. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शरद पवार यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल विचारले असता शेट्टी म्हणाले, पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटे करतात. सत्तेत असताना शेतकऱ्यांना कितीवेळा कर्जमाफी द्यायची, असा सवाल आम्हाला ते करत होते. आता विरोधात बसल्यानंतर कर्जमाफीची मागणी करत आहेत. त्यांच्या दुटप्पी भूमिकेची जनतेला सवय झाल्याचा टोलाही हाणला. चळवळीत काम करत असताना आपण मतदारसंघातील विकासकामेही केली आहेत. केवळ प्रसिद्धी न केल्याने मी काहीच करत नसल्याची टीका काही मंडळी करत आहेत. वर्षभरात तीन कोटी ८९ लाखांची विकासकामे केली असून, ७१ लाखांची कामे प्रस्तावित असल्याचेही शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)भाषणे करून ठिबक होणार का ?राज्यातील सर्व उसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्याशिवाय कारखान्यांना परवाना सरकार देणार नाही. सरकारचा प्रयत्न चांगला आहे; पण केवळ भाषणे करून चालणार नाही. पूर्वी केलेल्या ठिबकचे अजून अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मग पाणी कसे वाचणार ? असा टोला शेट्टी यांनी राज्य सरकारला हाणला. चौकशी थांबविण्यासाठीच पवारांची उठाठेव शरद पवार यांनी सरकारला अल्टीमेटम दिल्याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, सरकार स्थापन करताना त्यांनी न मागताच पाठिंबा दिला. केंद्र सरकारसोबत बसून त्यांनी साखर उद्योगाचा रोडमॅप केला. त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही, अशी खिल्ली उडवत त्यांच्या सरकारच्या काळातील चौकशी थांबविण्यासाठीच अशी उठाठेव ते करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.