शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

अडचण होत असेल तर खुशाल बाजूला करा

By admin | Updated: June 3, 2015 00:59 IST

राजू शेट्टींचे ‘भाजप’ला आव्हान : मंत्रिपद द्या, न द्या, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणारच

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सत्तेत सहभागी झालो आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आंदोलन करणारच. आदोलन करतोय म्हणून मंत्रिपद देणार नसाल तर देऊ नका असे सांगतानाच आमच्या जिवावरच केंद्र आणि राज्यात सत्तेवर आलेल्या आमची अडचण होत असेल तर भाजपने खुशाल आम्हाला बाजूला करावे, असे आव्हान खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले.‘रासप’चे नेते महादेव जानकर यांनी मंत्रिपद न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. तुम्ही काय भूमिका घेणार आहात? अशी विचारणा केली असता, आम्ही सरकारमधून का बाहेर पडावे? त्यांना अडचण वाटत असेल तर आम्हाला काढून टाकावे. मुळात आम्ही सत्तेसाठी सरकारमध्ये सहभागी झालेलो नाही. काँग्रेस आघाडी सरकारने शेतकरीविरोधी धोरण घेतल्याने आम्ही महायुतीत सहभागी झालो. आमच्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. शरद पवार यांनी कर्जमाफीची मागणी केल्याबद्दल विचारले असता शेट्टी म्हणाले, पवारसाहेब जे बोलतात, त्याच्या उलटे करतात. सत्तेत असताना शेतकऱ्यांना कितीवेळा कर्जमाफी द्यायची, असा सवाल आम्हाला ते करत होते. आता विरोधात बसल्यानंतर कर्जमाफीची मागणी करत आहेत. त्यांच्या दुटप्पी भूमिकेची जनतेला सवय झाल्याचा टोलाही हाणला. चळवळीत काम करत असताना आपण मतदारसंघातील विकासकामेही केली आहेत. केवळ प्रसिद्धी न केल्याने मी काहीच करत नसल्याची टीका काही मंडळी करत आहेत. वर्षभरात तीन कोटी ८९ लाखांची विकासकामे केली असून, ७१ लाखांची कामे प्रस्तावित असल्याचेही शेट्टी म्हणाले. (प्रतिनिधी)भाषणे करून ठिबक होणार का ?राज्यातील सर्व उसाचे क्षेत्र ठिबकखाली आणण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. त्याशिवाय कारखान्यांना परवाना सरकार देणार नाही. सरकारचा प्रयत्न चांगला आहे; पण केवळ भाषणे करून चालणार नाही. पूर्वी केलेल्या ठिबकचे अजून अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. मग पाणी कसे वाचणार ? असा टोला शेट्टी यांनी राज्य सरकारला हाणला. चौकशी थांबविण्यासाठीच पवारांची उठाठेव शरद पवार यांनी सरकारला अल्टीमेटम दिल्याबाबत विचारले असता शेट्टी म्हणाले, सरकार स्थापन करताना त्यांनी न मागताच पाठिंबा दिला. केंद्र सरकारसोबत बसून त्यांनी साखर उद्योगाचा रोडमॅप केला. त्याचे पुढे काय झाले हे माहीत नाही, अशी खिल्ली उडवत त्यांच्या सरकारच्या काळातील चौकशी थांबविण्यासाठीच अशी उठाठेव ते करत असल्याची टीका शेट्टी यांनी केली.