शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

By admin | Updated: August 11, 2015 00:52 IST

यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घोषणा : प्रांताधिकारी कार्यालयात आज संयुक्त बैठक

इचलकरंजी : वीस दिवसांपासून सुरू असलेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप उद्या, बुधवारपर्यंत मिटला नाही, तर गुरुवारी सायंकाळी यंत्रमागधारकांचा मेळावा घेऊन टोकाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा सागर चाळके यांनी दिला. सोमवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.सायझिंग कामगारांचा सुरू असलेला संप हा कामगार नेत्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे चिघळत आहे. यामुळे शहरातील संपूर्ण वस्त्रोद्योग वेठीस धरला जात आहे. परिणामी येथील औद्योगिक शांतताही बिघडत आहे. त्यामुळे याबाबतचा जाब कामगार नेत्यांना सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चावेळी विचारण्यात येईल, असा इशारा रविवारी चाळके यांनी यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, यामुळे वातावरण चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विनापरवाना असा कोणत्याही प्रकारे प्रतिमोर्चा काढू नये, तसेच तुमच्या प्रश्नाबाबत कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची आज, मंगळवारी संयुक्त बैठक प्रांत कार्यालयात घेऊ, त्यावेळी आपण आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी रात्री उशीर झाल्याने सर्व यंत्रमागधारकांपर्यंत हा संदेश पोहोचला नाही. परिणामी सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच शिवाजी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक गोळा होऊ लागले. त्यावेळी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी सर्वांना पुन्हा तांबे माळमधील मराठा भवनात जमण्यास सांगितले. त्यानंतर तेथे झालेल्या मेळाव्यात चाळके यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सर्व यंत्रमागधारकांना सांगितली आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करून गुरुवारपर्यंत मुदत देण्याचे ठरविले. प्रशासनाने उद्यापर्यंत तोडगा काढावा; अन्यथा गुरुवारी टोकाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मेळाव्यात यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन संघटनेचे सचिन हुक्किरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संप काळात ४०७ रुपयांप्रमाणे पगार द्याकृती समितीची मागणी : सहायक कामगार आयुक्तांना निवेदन इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपास आमचा पाठिंबा असून, संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांतील कामगारांना दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. त्यापैकी सोमवारी यंत्रमाग कामगारांचा लाक्षणिक संप होता. कृती समितीने केलेल्या आवाहनाप्रमाणे यंत्रमाग कामगार शाहू पुतळा चौकातून मोर्चाने सहा. कामगार आयुक्त कार्यालयावर आले. समितीचे एक शिष्टमंडळ सहायक कामगार आयुक्त गुरव यांना भेटले. यंत्रमाग कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेले १०,५७३ रुपये किमान वेतन त्वरित मिळावे. वाढत्या महागाईने १५,००० रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. संपामुळे बंद कारखान्यांतील कामगारांना प्रतिदिवशी ४०७ रुपये पगार मिळावा. घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या. त्यावर सहायक कामगार आयुक्तांनी किमान वेतनासाठी क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मोर्चासमोर शामराव कुलकर्णी, दत्तात्रय माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)