शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

संप न मिटल्यास गुरुवारी आंदोलन

By admin | Updated: August 11, 2015 00:52 IST

यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात घोषणा : प्रांताधिकारी कार्यालयात आज संयुक्त बैठक

इचलकरंजी : वीस दिवसांपासून सुरू असलेला सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप उद्या, बुधवारपर्यंत मिटला नाही, तर गुरुवारी सायंकाळी यंत्रमागधारकांचा मेळावा घेऊन टोकाचे आंदोलन सुरू करण्याचा इशारा सागर चाळके यांनी दिला. सोमवारी झालेल्या यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.सायझिंग कामगारांचा सुरू असलेला संप हा कामगार नेत्यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे चिघळत आहे. यामुळे शहरातील संपूर्ण वस्त्रोद्योग वेठीस धरला जात आहे. परिणामी येथील औद्योगिक शांतताही बिघडत आहे. त्यामुळे याबाबतचा जाब कामगार नेत्यांना सोमवारी काढण्यात येणाऱ्या मोर्चावेळी विचारण्यात येईल, असा इशारा रविवारी चाळके यांनी यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात दिला होता. मात्र, यामुळे वातावरण चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे व अप्पर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. विनापरवाना असा कोणत्याही प्रकारे प्रतिमोर्चा काढू नये, तसेच तुमच्या प्रश्नाबाबत कामगार प्रतिनिधी व मालक प्रतिनिधी यांची आज, मंगळवारी संयुक्त बैठक प्रांत कार्यालयात घेऊ, त्यावेळी आपण आपले म्हणणे मांडावे, असे सांगितले. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी रात्री उशीर झाल्याने सर्व यंत्रमागधारकांपर्यंत हा संदेश पोहोचला नाही. परिणामी सोमवारी सकाळी साडेदहा वाजल्यापासूनच शिवाजी पुतळ्याजवळ यंत्रमागधारक गोळा होऊ लागले. त्यावेळी यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी सर्वांना पुन्हा तांबे माळमधील मराठा भवनात जमण्यास सांगितले. त्यानंतर तेथे झालेल्या मेळाव्यात चाळके यांनी आंदोलनाची पार्श्वभूमी सर्व यंत्रमागधारकांना सांगितली आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करून गुरुवारपर्यंत मुदत देण्याचे ठरविले. प्रशासनाने उद्यापर्यंत तोडगा काढावा; अन्यथा गुरुवारी टोकाची भूमिका जाहीर करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. मेळाव्यात यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन, पॉपलीन संघटनेचे सचिन हुक्किरे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)संप काळात ४०७ रुपयांप्रमाणे पगार द्याकृती समितीची मागणी : सहायक कामगार आयुक्तांना निवेदन इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपास आमचा पाठिंबा असून, संप काळात बंद पडलेल्या यंत्रमाग कारखान्यांतील कामगारांना दररोज ४०७ रुपयांप्रमाणे पगार मिळाला पाहिजे, अशी मागणी यंत्रमाग कामगार संघटनांच्या कृती समितीने सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे केली.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने सुधारित किमान वेतन जाहीर केले आहे. त्याची अंमलबजावणी शासनाने करावी, या मागणीसाठी यंत्रमाग कामगारांच्या संयुक्त कृती समितीने राज्यव्यापी आंदोलन हाती घेतले आहे. त्यापैकी सोमवारी यंत्रमाग कामगारांचा लाक्षणिक संप होता. कृती समितीने केलेल्या आवाहनाप्रमाणे यंत्रमाग कामगार शाहू पुतळा चौकातून मोर्चाने सहा. कामगार आयुक्त कार्यालयावर आले. समितीचे एक शिष्टमंडळ सहायक कामगार आयुक्त गुरव यांना भेटले. यंत्रमाग कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेले १०,५७३ रुपये किमान वेतन त्वरित मिळावे. वाढत्या महागाईने १५,००० रुपये किमान वेतन मिळाले पाहिजे. संपामुळे बंद कारखान्यांतील कामगारांना प्रतिदिवशी ४०७ रुपये पगार मिळावा. घरकुलांसाठी पाच लाख रुपये अनुदान द्यावे, अशा मागण्या केल्या. त्यावर सहायक कामगार आयुक्तांनी किमान वेतनासाठी क्लेम अ‍ॅप्लिकेशन दाखल करण्याचे सांगितले. त्यानंतर मोर्चासमोर शामराव कुलकर्णी, दत्तात्रय माने, भरमा कांबळे, हणमंत लोहार, राजेंद्र निकम, आनंदा गुरव, आदींची भाषणे झाली. (प्रतिनिधी)