शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

हंगाम लांबल्यास ऊस उत्पादकांना भुर्दंड

By admin | Updated: October 13, 2016 02:09 IST

पीककर्ज व्याज वाढणार : महिन्याला दहा कोटींचा फटका बसणार; रब्बीतील पिकावरही परिणाम होणार

प्रकाश पाटील --कोपार्डे --यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्र दुष्काळसदृश परिस्थितीने घटल्याने ऊस उत्पादन कमी होणार आहे. हा मुद्दा पकडत मंत्री समितीच्या बैठकीत तब्बल एक महिना गाळप हंगाम पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. मात्र, हाच निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरणार आहे. शेतकऱ्यांवर प्रत्येक महिन्याला पीक कर्जावर १० कोटींचे व्याज बसणार आहे. याचा रब्बी हंगामावरही परिणाम होणार असल्याचे या उद्योगातील तज्ज्ञ व ऊस उत्पादक शेकऱ्यांकडून मत व्यक्त करण्यात येत आहे.ऊस उत्पादकांना प्रतिएकर पीककर्ज ३५ हजार रुपयांप्रमाणे दिले जाते. या कर्जाची वसुली उसाच्या तोडणीनंतर कारखाने देत असलेल्या ऊस बिलातून होते. या पीक कर्ज वसुलीची जूनअखेर परतफेडीची मुदत असते. मात्र, गाळप हंगाम एक महिना लांबल्यास तोड होणाऱ्या उसाचे बिल एक महिना उशिरा येणार आहे. यामुळे संपूर्ण हंगामात जरी उसाची एक-एक महिना उशिरा तोड झाल्यास पीककर्ज भरण्याची प्रक्रिया शेतकऱ्यांना हातात पैसा न आल्याने वेळेत करता येणार नाही. जोपर्यंत या पीककर्जाचा परतावा शेतकऱ्यांकडून होणार नाही, तोपर्यंत बॅँका व्याज आकारणी करणार आहेत. त्यामुळे १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला हंगाम सुरू करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दर महिन्याला १० कोटींचा केवळ व्याजातून फटका बसणार आहे.जिल्ह्यात हंगाम २०१५-१६ मध्ये जिल्हा बॅँक, खासगी व राष्ट्रीयीकृत बॅँकांच्या माध्यमातून २१६९ कोटींचे पीककर्ज वाटप केले आहे. यावर सर्व बॅँका १२ टक्के व्याज आकारणी करतात. यातून पंजाबराव देशमुख व्याज परताव्यातून शेतकऱ्यांना सूट देऊन सरासरी ६ टक्के व्याजाची आकारणी केली जाते. जिल्ह्यातील सर्व बॅँकांनी पीककर्जाच्या माध्यमातून वाटलेल्या रकमेवर ६ टक्केप्रमाणे जरी व्याज पकडले, तरी २१६९ कोटी पीककर्जाचे महिन्याचे व्याज १३ कोटी रुपये होणार आहे.जर कारखाने १ नोव्हेंबरऐवजी १ डिसेंबरला सुरू झाले, तर उसाची तोडणीही महिन्याच्या अंतराने लांबणार आहे. याचा तोटा शेतकऱ्यांना होणार असून खते, मशागत यामध्ये झालेल्या उत्पादन वाढीने आधीच मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना उसाचे क्षेत्र सांभाळताना कसरत करावी लागणार आहे.एकरी उतारा घटणारआडसाली व पूर्वहंगामी उसाचे आजचे वय पाहिल्यास १५ महिन्यांचे आहे. हंगाम एक महिना पुढे गेल्यास हा ऊस तुटण्यासाठी किमान १७ ते १८ महिने पूर्ण होणार आहेत. यामुळे उसाच्या एकरी उत्पादनात मोठी घट होणार असून, याचा परिणाम साखर कारखान्यांच्या गाळप उद्दिष्टावरही होणार आहे.रब्बी हंगामावर परिणाम होणार उसाचे क्षेत्र तुटण्यास यावर्षी १ डिसेंबरला सुरुवात झाल्यास मोठी घट होणार आहे. सर्वसाधारण रब्बी हंगामाला डिसेंबरमध्ये सुरुवात होते. उसाचे क्षेत्र तुटल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी भुईमूग, गहू, सूर्यफूल, सोयाबीन यासारखी पिके रब्बी हंगामात घेतात. मात्र, एक महिना हंगाम उशिरा सुरू झाल्यास उसाखालील क्षेत्र न तुटल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेताना अडचणी येणार असून, यामध्ये मोठी घट होण्याचा अंदाज कृषितज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.पाण्याचा अतिरिक्त वापर अटळ मागीलवर्षी पाण्याच्या टंचाईमुळे शेतकऱ्यांना ऊस पीक सांभाळताना कसरत करावी लागली. परिणामी, हंगाम एक महिना लांबल्यास ऊस पीक सांभाळण्यासाठी पाण्याचा अतिरिक्त वापर होणार असून, पाणी बचतीला ठेंगा बसणार आहे.हंगाम लांबल्यास शेतकरी उसाची विल्हेवाट लावण्यासाठी इतरत्र प्रयत्न करणार. यामुळे कारखान्यांना गाळप उद्दिष्ट गाठण्यास अडचणी येईल. त्याशिवाय पीककर्जाच्या व्याजाचा बोजा पडण्याबरोबर रब्बी हंगामही अडचणीत येणार आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर ही हंगाम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्याची परिस्थिती आहे.- चंद्रदीप नरके, अध्यक्ष कुंभी-कासारी साखर कारखानामागीलवर्षी पाण्याच्या कमतरतेने शेतकरी हैराण झाला होता. त्यातच खते, मशागत यांच्या दरांमध्ये मोठी वाढ झाल्याने व एफआरपीत एक रुपयाही वाढ झाली नसल्याने शेतकरी अगोदरच अडचणीत आहे. पुन्हा हंगाम लांबल्यास याचा दूध व्यवसायावरही अप्रत्यक्ष परिणाम होणार आहे. रब्बी पिके घेताना उसाचे क्षेत्र तुटले तरच शक्य आहे. असे अनेक परिणाम होणार असून, हंगाम १ नोव्हेंबरला सुरू होणेच योग्य आहे.- अविनाश शिपुगडे, शेतकरी, शिंगणापूर, ता. करवीर.