शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

By admin | Updated: January 5, 2017 23:50 IST

सदाभाऊ मोठे झाले तर मला का वाईट वाटावे, ते पक्ष सोडणार नाहीत : शेट्टी

कोल्हापूर : राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रवाहातून बाजूला जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी सुतराम शक्यता नाही. त्यांना राज्य मंत्रिमंडळात महत्त्व दिले गेले तर त्याचे मला वाईट वाटण्याचे कारणच नाही कारण संघटनेतून त्यांना मंत्री करा असे मीच सरकारला सुचविले होते असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शेट्टी यांच्यात दरी निर्माण झाली असून, सदाभाऊ भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या दोन-तीन दिवस प्रसिध्दी माध्यमांतून चर्चेत आहेत. त्या अनुषंगाने ते बोलत होते. खासदार शेट्टी म्हणाले, ‘आम्ही दोघेही गेली पंचवीस वर्षे एकत्र चळवळीत काम करीत आहे. सदाभाऊंना मंत्री करावे असे संघटनेतून एकमेव नांव आम्ही सुचविले होते. त्यावेळीही कोणताच वाद नव्हता. मंत्री झाल्यावर सरकारच्या कामाबद्दल जसे चळवळीत आक्रमकपणे बोलता येते तसे बोलता येत नाही त्यामुळे त्यांची भाषा थोडी नरम झाली आहे ही वस्तुस्थिती आहे. मंत्रिमंडळात त्यांचे महत्त्व वाढले तर त्याचे मला वाईट वाटायचे कारण नाही. कारण माझा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. मला चळवळीचा आधार घेऊन सत्तेत जायचे असते तर यापूर्वीच ते करता आले असते. शेतकरी चळवळीचे उत्तरदायित्व माझ्यावर आहे आणि सरकार चुकत असेल तर त्याविरोधात आक्रमकपणे बोलून सरकारला जाग्यावर आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. हीच भूमिका मी सध्या पार पाडत आहे. सरकारवर दबाव टाकण्याचे तेवढे एकच अस्त्र आमच्याकडे आहे. कारण आमचा एकही आमदार नाही.’ (प्रतिनिधी)