शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाची बैठक निष्फळ झाल्यास घळभरणी बंद पाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:21 IST

उत्तूर : ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा असताना आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणाच्या घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात ...

उत्तूर : ‘आधी पुनर्वसन मग धरण’ हा कायदा असताना आंबेओहळ प्रकल्प (ता. आजरा) येथील धरणाच्या घळभरणीचे काम पोलीस बंदोबस्तात सुरू आहे. याचा विरोध करण्यासाठी जमलेल्या धरणग्रस्तांना प्रशासनाने बैठकीचे आश्वासन दिले. आज होणाऱ्या पुनर्वसनाच्या बैठकीत योग्य मार्ग न निघाल्यास प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा इशारा आर्दाळ (ता. आजरा) येथील बैठकीत धरणग्रस्तांनी दिला. कॉ. संपत देसाई म्हणाले, कायदा धरणग्रस्तांनी मोडला नाही. निवेदने देऊनही बैठक घेण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. धरणाचे काम ८५ टक्के असताना पुनर्वसनाचे काम कासवगतीने सुरू आहे. धरणग्रस्तांच्या मागण्या मान्य न झाल्यास धरणाचे काम बंद पाडल्याशिवाय शासन जागे होणार नाही. म्हणून आपण एकत्र आलो आहोत.

सागर सरोळकर म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे समाधानकारक पुनर्वसन झाले नाही. संकलन दुरुस्ती अद्यापही झाले नाही. बेकनाळ, लिंगनूर, गडहिंग्लज येथील जमिनी जाणीवपूर्वक दाखवल्या जात नाहीत. नाकारलेल्या जमिनी पुन्हा पुन्हा दाखवल्या जात आहेत.

राजू देशपांडे म्हणाले, १२४५ धरणग्रस्त असताना ८२२ धरणग्रस्त कसे झाले. नागरी सुविधांसह एकाही धरणग्रस्ताचे १०० पुनर्वसन झाले नाही. कॉ. संजय तर्डेकर, पं. स. सदस्य बाळेश नाईक, सदानंद व्हनबट्टे, शिवाजी गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सचिन पावले, अमोल बांबरे, महादेव खाडे, मधुकर पोटे आदींसह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, प्रकल्पाकडे जाणाऱ्या धरणग्रस्तांना आर्दाळ येथे अडवले व धरणाकडे जाऊ नका, अशी विनंती पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, तहसीलदार विकास अहिर यांनी केली. यावर धरणग्रस्तांनी पुनर्वसनाबाबत लेखी बैठकीची मागणी केली.

तहसीलदार विकास अहिर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगितले. पुनर्वसनाची चर्चा निष्फळ ठरल्यास काम बंद पाडण्याचा इशाराही धरणग्रस्तांनी दिला.

- आर्दाळला पोलीस छावणीचे स्वरूप

आर्दाळ येथे परिसरातील गावातील धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे गावात मोठा पोलीस बंदोबस्त होता. पुन्हा अटकाव होईल या भीतीने काही धरणग्रस्त फिरकलेच नाहीत. धरण परिसर व आर्दाळ गावात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

-----------------------

* माझ्यांनी विश्वासघात करू नये. भाषणात प्रत्येक चळवळींतील नेत्यांनी बेकायदेशीर काम ग्रामविकासमंत्र्यांनी सुरू करण्यास सांगितल्याचा आरोप केला. आपण १० वर्षे सत्तेत असताना प्रश्न का सुटला नाही. कायदा का मोडला ? असा प्रश्न विचारून मंत्री महोदयांनी धरणग्रस्तांना दिलासा द्यावा विश्वासघात करू नये, अशी मागणी धरणग्रस्तांनी केली.

---------------------------

फोटो ओळी : आर्दाळ (ता. आजरा) येथे तहसीलदार विकास अहिर, पोलीस निरीक्षक बालाजी भांगे धरणग्रस्तांना पुनर्वसनाची बैठक होत असल्याची माहिती धरणग्रस्तांना देत असताना.

क्रमांक : १८०३२०२१-गड-०१

फोटो ओळी : आंबेओहोळ प्रकल्प (ता. आजरा) येथे कायदा बाजूला सारून घळभरणीचे काम सुरू आहे. कायदा असताना घळभरणी कशी केली जाते ? कायद्याची प्रतच डिजिटल करून मेळाव्याच्या ठिकाणी आर्दाळ (ता. आजरा) येथे लावण्यात आली होती. (ऋतुजा फोटो)

क्रमांक : १८०३२०२१-गड-०४

---------------------------