शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

पक्षाने आदेश दिल्यास ‘उत्तर’मधून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:25 IST

कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे; पण आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. आपण कोरे पाकीट आहे. त्याने कुठे ...

कोल्हापूर : ‘उत्तर’मधून महेश जाधव, सत्यजित कदम यांच्यापैकी कोणी लढायचे हे ठरलेले नाही, सुहास लटोरे यांचेही नाव येऊ शकते. त्यामुळे सगळ्यांनीच ताकदीने काम करायचे. माझ्यासह मधुरिमाराजे व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याही नावांची चर्चा आहे; पण आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नाही. आपण कोरे पाकीट आहे. त्याने कुठे जायचे हे त्यावर लिहिणाऱ्यांच्या हातात असते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कदाचित मलाही लढावे लागेल, असे संकेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.भाजपच्या ‘उत्तर’ विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा रविवारी आयर्विन ख्रिश्चन हॉलमध्ये झाला. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेसह ‘हुपरी’ व ‘आजरा’ नगरपंचायतीही भाजपने जिंकल्याने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. विचारपूर्वक सांगतो, ‘भाजप ठरवेल ते खासदार आणि म्हणेल तोच आमदार होईल,’ असेही त्यांनी सांगितले.पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शहरात केलेल्या कामांची माहिती घरोघरी पोहोचवून पक्ष बळकटीसाठी कामाला लागा. महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, राहुल चिकोडे, सुभाष रामुगडे, आदी उपस्थित होते.उत्तर प्रदेश, कर्नाटक यशाचे गमकएका बुथामध्ये मृत, स्थलांतरित वजा जाता साधारणत: दोनशे घरांमधील आठशे मतदान होते. दहा कार्यकर्त्यांना प्रत्येकी २० घरे येणार आहेत. त्यांनी महिन्याला प्रत्येकाच्या घरी जाऊन भेटायचे, अडचणी समजावून घ्यायच्या, त्यांना मदत करायची. लोकसभेपर्यंत १२ वेळा, तर विधानसभेपर्यंत १८ वेळा तुम्ही त्या घरात जाणार असल्याने आपोआपच आपुलकी निर्माण होऊन त्याचे रूपांतर मतदानात होईल. हेच काम उत्तर प्रदेश व कर्नाटकात केल्याने यश मिळाल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.पाच-सहा महिन्यांत बºयाच घडामोडी‘उत्तर’ची तयारी नेटाने सुरू केली असून रोज एका नगरसेवकाला बोलावून घेऊन स्वतंत्र चर्चा करतो. पाच-सहा महिन्यांत कोण कुठे जाऊन बसणार आहे, हे मला चांगले माहिती आहे. त्यामुळे निवडणूक अधिक सोपी होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.पास झालेल्यांचे अभिनंदनबूथ कार्यकर्त्यांनी घराघरांपर्यंत जाऊन संपर्क मोहीम राबविण्याचा मंत्र देऊन पाटील म्हणाले, दहावी-बारावीचे निकाल लागले की पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करा, नापास झालेल्यांच्या घरी जाऊन त्यांचे सांत्वन करा.