शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

समाधानी नसल्यास ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ...

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने बुधवारी जाहीर केला. या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देताना त्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याद्वारे त्यांना गुण, श्रेणी देण्यात येईल. त्याबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन आणखी चांगले गुण मिळविण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीबाबत बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता. त्यामुळे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा एक पर्याय होता. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे टॅलेंट सिद्ध करायचे होते. ९५ ते १०० टक्के गुण मिळवायचे होते. त्यांना मात्र, फटका बसला आहे.

-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

दहावीच्या परीक्षा व्हायला हव्या होत्या; पण वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य वाटतो. नव्या शैक्षणिक धोरणात या दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. त्यामुळे कोरोनामुळे प्रमोटेड हा शिक्का बसणार नाही.

-तेजस्विनी मोहिते, पालक, रुईकर कॉलनी.

चौकट

दहावीप्रमाणे बारावीचा निर्णय व्हावा

दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पेठवडगाव येथील बारावीचा विद्यार्थी स्वराज्य घोसाळकर याने व्यक्त केली.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

सीबीएसईच्या दहावीच्या शाळा : २८

विद्यार्थी संख्या : ३८००

बारावीच्या शाळा : १०

विद्यार्थी संख्या : ५५०

चौकट

दहावीच्या अंतर्गत परीक्षा

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या आहेत. त्यातील गुणांच्या आधारे अंतिम मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.