शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

समाधानी नसल्यास ‘सीबीएसई’च्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:22 IST

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ...

पूर्व नियोजनानुसार सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा दि. ४ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दहावीच्या परीक्षा रद्द करून या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय सीबीएसईने बुधवारी जाहीर केला. या विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेश देताना त्यांचे दहावीमध्ये झालेल्या अंतर्गत परीक्षांतील गुणांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे. त्याद्वारे त्यांना गुण, श्रेणी देण्यात येईल. त्याबाबत समाधानी नसणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देऊन आणखी चांगले गुण मिळविण्याची संधी मिळणार आहे.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीबाबत बोर्डाने घेतलेला निर्णय योग्य आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता. त्यामुळे शाळा पातळीवर परीक्षा घेण्याचा एक पर्याय होता. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे टॅलेंट सिद्ध करायचे होते. ९५ ते १०० टक्के गुण मिळवायचे होते. त्यांना मात्र, फटका बसला आहे.

-डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.

दहावीच्या परीक्षा व्हायला हव्या होत्या; पण वाढत्या कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय योग्य वाटतो. नव्या शैक्षणिक धोरणात या दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करावा. त्यामुळे कोरोनामुळे प्रमोटेड हा शिक्का बसणार नाही.

-तेजस्विनी मोहिते, पालक, रुईकर कॉलनी.

चौकट

दहावीप्रमाणे बारावीचा निर्णय व्हावा

दहावीप्रमाणे बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत निर्णय व्हावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावयाची त्यांची परीक्षा घेण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पेठवडगाव येथील बारावीचा विद्यार्थी स्वराज्य घोसाळकर याने व्यक्त केली.

जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

सीबीएसईच्या दहावीच्या शाळा : २८

विद्यार्थी संख्या : ३८००

बारावीच्या शाळा : १०

विद्यार्थी संख्या : ५५०

चौकट

दहावीच्या अंतर्गत परीक्षा

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या आतापर्यंत शाळेत दोन चाचण्या, एक सहामाही आणि दोन पूर्व परीक्षा झाल्या आहेत. त्यातील गुणांच्या आधारे अंतिम मूल्यमापन करून त्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.