शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आघाडी झाल्यास राष्ट्रवादी वेटिंगवर, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमिलन झाल्यास शिवसेनेपुढे आव्हान- करवीर विधानसभा मतदारसंघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:08 IST

कोपार्डे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालिंगा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झालेल्या विचारमंथनात जेथे राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला तेथील कार्यकर्त्यांवरच अन्याय होत असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मान्य केले.

कोपार्डे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालिंगा येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात झालेल्या विचारमंथनात जेथे राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला तेथील कार्यकर्त्यांवरच अन्याय होत असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. तो दूर केला जाईल असे आश्वासन देताना आगामी विधानसभेत युती झाल्यास मोठा अडसर निर्माण होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, गेली पंधरा वर्षे कार्यकर्ते जसे अधांतरी होते व सोयीने शिवसेना किंवा काँग्रेसला मदत करीत होते, तशीच परिस्थिती युतीनंतर निर्माण होणार आहे हे स्पष्ट आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासमोर कार्यकर्त्यांना व्यथा मांडण्याचे व्यासपीठ निर्माण करून दिले. या मेळाव्याला कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे आले आणि अजून तालुक्यात राष्ट्रवादी शिल्लक असल्याची प्रचिती आली. येथे ज्या मोजक्या कार्यकर्त्यांना पक्षातील स्थान व युतीमुळे इतर पक्षांनी केलेली कार्यकर्त्यांची गोची याचा पाढाच वाचला. तालुक्यात ज्या राष्ट्रवादी पक्षाचा जन्म स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या घरी झाला, त्याच तालुक्यातील कार्यकर्ते कुठल्याच सत्तेच्या व्यासपीठावर दिसत नसल्याने खानविलकर यांनी सर्वसामान्यांचा पक्ष अशी निर्माण केलेली ओळख आता पुसली जात आहे.

तरीही कार्यकर्ते स्वाभिमानाने पक्षाशी एकनिष्ठ आहेत. मात्र, ही व्यथा मधुकर जांभळे व तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मांडल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील यांची भाषणे झाली आणि पुन्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोरकेच राहणार अशी चर्चा सुरू झाली. यावेळी ज्येष्ठ नेत्यांच्या भाषणात आगामी विधानसभा निवडणुकीत जर युती झाली तरी येथील कार्यकर्त्यांचा सन्मान करू आणि युती नाही झाली तर राष्ट्रवादीचा उमेदवार हेमधुकर जांभळे असतील असे बोलून, ही जागा युती झाल्यास काँग्रेसच्या पारड्यात पडणार याला मूक संमती दिली.कार्यकर्ते पोरकेच राहणारसध्याचे राजकीय वातावरण पाहता विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाची युती अटळ आहे. यामुळे दहा विधानसभा मतदारसंघांत सहा काँग्रेस व चार राष्ट्रवादीला हा २००९ चा फॉर्म्युला पुढे येणार हे निश्चित असून, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्या करवीर विधानसभा उमेदवारीला कोणच आव्हान देऊ शकत नाही हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची गरज नाही. यामुळे करवीरमधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पोरकेच राहणार अशी चर्चा मात्र कार्यकर्त्यांत रंगत आहे.