शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गुण समाधानकारक नसल्यास आम्ही पुन्हा बारावीची परीक्षा देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST

कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी वार्षिक परीक्षादेखील झाली ...

कोल्हापूर : बारावीच्या परीक्षेची तयारी करायची म्हणून आम्ही अकरावीला उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच कोरोनामुळे गेल्यावर्षी वार्षिक परीक्षादेखील झाली नाही. त्यामुळे आता राज्य शिक्षण मंडळाने ठरविलेल्या सूत्रानुसार बारावीचे मूल्यमापन झाल्यास आम्हाला कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. या मूल्यमापनात समाधानकारक गुण मिळाले नाही, तर पुन्हा बारावीची परीक्षा देण्याची कोल्हापुरातील विद्यार्थ्यांची मानसिकता आहे.

कोरोनामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. त्याबाबतचा निर्णय जाहीर करून महिना उलटला, तरी या इयत्तेतील मूल्यमापनाचे सूत्र ठरले नव्हते. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे ३० : ३० : ४० (दहावी : अकरावी : बारावी) हे सूत्र शनिवारी जाहीर केले. याबाबतच्या विद्यार्थी, पालकांची भावना ‘लोकमत’ने जाणून घेतल्या. त्यामध्ये दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळविले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.

चौकट

मूल्यमापनाचे सूत्र असे

दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्के गुणांचा मूल्यमापनाच्या सूत्रात समावेश आहे.

विद्यार्थी काय म्हणतात?

या मूल्यमापनाच्या सूत्रात अकरावीच्या गुणांचा विचार होणार असल्याने बारावीतील टक्केवारीवर निश्चितपणे फरक पडणार आहे. आम्हाला कमी गुण मिळण्याची भीती वाटत आहे.

-सुयोग चौगुले, केर्ली

बारावीच्या गुणांवर आमचे पुढील शैक्षणिक भवितव्य अवलंबून आहे. या मूल्यमापनात कमी गुण मिळाल्यास श्रेणीसुधार योजनेअंतर्गत मी पुन्हा परीक्षा देणार आहे.

-मयूरी दळवी, न्यू वाडदे.

पालक काय म्हणतात?

खरं तर अशा पद्धतीने गुण देणे योग्य वाटत नाही. परीक्षा होणे आवश्यक होते. पण, कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. माझ्या मुलीला समाधानकारक गुण मिळाले नाही, तर ती पुन्हा परीक्षा देईल.

-अनिल इंगळे, जवाहरनगर.

कोरोनामुळे परीक्षा रद्द केली, हे ठीक आहे. मात्र, भविष्याचा विचार करता विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये. माझी मुलगी मेरीटमधील आहे. तिला कमी गुण मिळाल्यास आम्ही पुन्हा परीक्षा देण्याचा विचार करणार आहोत.

-सविता टिपुगडे, दत्तनगर-फुलेवाडी

पॉईंटर

कोल्हापूर विभागातील बारावीतील विद्यार्थी

कला : ३४०९३

वाणिज्य : २७६७३

विज्ञान : ५००७६

एमसीव्हीसी : ५८४१

टेक्निकल : ६८