शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

जमिनी उपलब्ध नसतील, तर एकरी पंचवीस लाख द्या

By admin | Updated: March 16, 2015 00:25 IST

धरणग्रस्तांचे प्रश्न : गणपत सोनवणे यांची मागणी

नवे पारगाव : चांदोली धरणामुळे विस्थापित झालेल्या चांदोली प्रकल्पग्रस्तांना तत्काळ जमिनी वाटप करा. जर प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यासाठी सरकारकडे जमिनी उपलब्ध नसतील, तर एकरी पंचवीस लाख रुपये द्या, अशी मागणी वारणा प्रकल्प धरणग्रस्त एकीकरण समितीचे सचिव गणपत सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केली.चांदोली धरण व अभयारण्यामुळे बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या मांडण्यासाठी वाठार (ता. हातकणंगले) येथे आयोजित पत्रकार परिषदेत गणपत सोनवणे बोलत होते.ते म्हणाले, चांदोली प्रकल्पामुळे पुनर्वसन झालेल्या सात गावांतील ८७९ कुटुंबांपैकी फक्त २०८ कुटुंबांना जमिनी मिळाल्या आहेत. ६७१ कुटुंबांना अद्याप जमिनी मिळालेल्या नाहीत. जमिनी उपलब्ध होणार नसतील, तर आजच्या बाजारभावाप्रमाणे लाभार्थ्यांना एकरी पंचवीस लाख रुपये द्यावेत. प्रत्येक लाभार्थ्याला दहा हजार घरबांधणी विशेष अनुदान व उदरनिर्वाह भत्ता ४०० रुपयांऐवजी दोन हजार रुपये मिळावेत, प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना वर्ग ३ व ४च्या पदावर शासकीय सेवेत प्रथम प्राधान्याने नोकरी मिळावी, प्रकल्पग्रस्तांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी मोफत स्टॉल द्यावेत, नोकरी न दिल्यास दरमहा दोन हजार रुपये बेकारभत्ता मंजूर करावा, चांदोली व्याघ्र प्रकल्पाच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली असून, सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी १४ विकासकांकडून निविदा स्वीकारल्या आहेत. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे.या परिषदेकरिता धरणग्रस्त एकीकरण समितीचे शामराव कोठारी, काशिनाथ सोनवणे, दादू सोनवणे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)