शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
4
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
5
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
6
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
7
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
8
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
9
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
10
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
11
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
12
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
13
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
14
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
15
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
16
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
17
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
18
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
19
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
20
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी

अंतराची अट रद्द झाल्यास पहिला कारखाना आपलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी ३० आॅगस्टपासून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.उदगाव येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही, तर शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचतील. शेतकºयांच्या मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा ३० आॅगस्टपासून जम्मू-काश्मीर येथून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगून सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे व स्वाभिमानीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी यावेळी केले.यावेळी महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि. प. सदस्य पद्माराणी पाटील, मन्सूर मुल्लाणी, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, राजगोंडा पाटील, भगवान काटे, बंडू पाटील, सुवर्णा अपराज, वैशाली पाटील, सुरेश कांबळे, कल्पना मस्के, शैलेश आडके, शांताराम पाटील, प्रकाश बंडगर, शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सदाभाऊंचा निर्णय समितीच घेईलमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा निर्णय समितीच घेईल. मंत्री खोत यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत, तर शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला लढायचे आहे. भाजप सत्तेत मी फक्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मला कोणत्याच मंत्रिमंडळावर जायचे नाही. शेतकरी बिल्ल्यावर प्रतिष्ठा ठेवून आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या, असा चेंडू खा. शेट्टींनी सदाभाऊंच्याकडे टोलविला. त्यांचा निर्णय समितीच घेईल, असे खा. शेट्टी यांनी सूचित केले.सदाभाऊविना सभाखासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केल्यापासून ‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक मेळाव्याला खोत उपस्थित असायचे. त्यांचे रांगडे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असत. मात्र, रविवारी झालेली सभा सदाभाऊ खोत यांच्याविनाच पार पडली.