शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

अंतराची अट रद्द झाल्यास पहिला कारखाना आपलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी ३० आॅगस्टपासून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.उदगाव येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही, तर शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचतील. शेतकºयांच्या मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा ३० आॅगस्टपासून जम्मू-काश्मीर येथून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगून सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे व स्वाभिमानीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी यावेळी केले.यावेळी महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि. प. सदस्य पद्माराणी पाटील, मन्सूर मुल्लाणी, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, राजगोंडा पाटील, भगवान काटे, बंडू पाटील, सुवर्णा अपराज, वैशाली पाटील, सुरेश कांबळे, कल्पना मस्के, शैलेश आडके, शांताराम पाटील, प्रकाश बंडगर, शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सदाभाऊंचा निर्णय समितीच घेईलमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा निर्णय समितीच घेईल. मंत्री खोत यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत, तर शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला लढायचे आहे. भाजप सत्तेत मी फक्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मला कोणत्याच मंत्रिमंडळावर जायचे नाही. शेतकरी बिल्ल्यावर प्रतिष्ठा ठेवून आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या, असा चेंडू खा. शेट्टींनी सदाभाऊंच्याकडे टोलविला. त्यांचा निर्णय समितीच घेईल, असे खा. शेट्टी यांनी सूचित केले.सदाभाऊविना सभाखासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केल्यापासून ‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक मेळाव्याला खोत उपस्थित असायचे. त्यांचे रांगडे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असत. मात्र, रविवारी झालेली सभा सदाभाऊ खोत यांच्याविनाच पार पडली.