शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

अंतराची अट रद्द झाल्यास पहिला कारखाना आपलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शासनाने दोन साखर कारखान्यांतील अंतराची अट रद्द केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पहिला साखर कारखाना उभारेल. राज्यात कारखान्यामध्ये होत असलेल्या काटामारीमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे ज्या गावात ग्रामपंचायत जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर वजनकाटा उभारणार आहे. शेतकºयांना कर्जमाफी मिळावी या ‘स्वाभिमानी’च्या रेट्यामुळे शासनाने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, त्याचा लाभ शेतकºयांना झाला नाही. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने शेतकºयांचा सात-बारा कोरा करावा, या मागणीसाठी ३० आॅगस्टपासून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.उदगाव येथे रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात खा. शेट्टी बोलत होते. ते पुढे म्हणाले, अच्छे दिनची स्वप्ने दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने शेतकºयांचा सात-बारा कोरा केला नाही, तर शेतकरी तुम्हाला खुर्चीवरून खाली खेचतील. शेतकºयांच्या मालाला हमीभाव व कर्जमाफी देऊन शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत, अन्यथा ३० आॅगस्टपासून जम्मू-काश्मीर येथून देशव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगून सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे यावे व स्वाभिमानीचा झेंडा फडकवावा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी यावेळी केले.यावेळी महिला बालकल्याण सभापती शुभांगी शिंदे, जि. प. सदस्य पद्माराणी पाटील, मन्सूर मुल्लाणी, माजी जि. प. सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद साखरपे, रामचंद्र फुलारे, आदिनाथ हेमगिरे, राजगोंडा पाटील, भगवान काटे, बंडू पाटील, सुवर्णा अपराज, वैशाली पाटील, सुरेश कांबळे, कल्पना मस्के, शैलेश आडके, शांताराम पाटील, प्रकाश बंडगर, शिवाजी कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.सदाभाऊंचा निर्णय समितीच घेईलमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाईचा निर्णय समितीच घेईल. मंत्री खोत यांच्याशी वैयक्तिक मतभेद नाहीत, तर शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला लढायचे आहे. भाजप सत्तेत मी फक्त शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी गेलो आहे. त्यामुळे मला कोणत्याच मंत्रिमंडळावर जायचे नाही. शेतकरी बिल्ल्यावर प्रतिष्ठा ठेवून आपल्याबरोबर आहेत, त्यामुळे विचार करून निर्णय घ्या, असा चेंडू खा. शेट्टींनी सदाभाऊंच्याकडे टोलविला. त्यांचा निर्णय समितीच घेईल, असे खा. शेट्टी यांनी सूचित केले.सदाभाऊविना सभाखासदार शेट्टी यांनी स्वाभिमानी संघटनेची स्थापना केल्यापासून ‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक मेळाव्याला खोत उपस्थित असायचे. त्यांचे रांगडे भाषण ऐकण्यासाठी शेतकरी आवर्जून येत असत. मात्र, रविवारी झालेली सभा सदाभाऊ खोत यांच्याविनाच पार पडली.