शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश

By admin | Updated: May 6, 2017 00:36 IST

संजय मोहिते : वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य; ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहन अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राध्यान्य राहील. वाढत्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करून एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल, असे मत नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मोहिते यांनी नुकतीच पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहिते यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावून येथील रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. वाहतूक समस्येसंबंधी स्थानिक लोकांशी चर्चा करून उपाययोजना राबविल्या जातील. वाहतुकीच्या प्रश्नावर काम करीत असताना एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल. नागरिकांशी संवाद साधून काम केले जाईल. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. माझे बालपण कोल्हापुरात गेल्याने येथील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. वाहतूक पोलिस खाकीचा कणावाहतूक पोलिस हा खाकीचा कणा आहे. चार भिंतींच्या आत कोण कसा तपास करतो हे दिसून येत नाही; परंतु रस्त्यावर नागरिकांना अडवून वाहतूक शाखेचा पोलिस पैसे घेत असेल तर थेट पोलिस अधीक्षकांची बदनामी आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचा कारभार पारदर्शक बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही मोहिते यांनी सांगितले. बंद सिग्नल सुरू करणारशहरात चोवीस वाहतूक सिग्नल आहेत. त्यापैकी चार नादुरुस्त आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असलेला गंगावेस येथील सिग्नल सुरू केला आहे. या चौकातील अतिक्रमण हटवून सुस्थितीत सिग्नल सुरू केल्याने या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. राजारामपुरी माऊली पुतळा चौकात सिग्नल सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिग्नल सुरू करून एकेरी मार्ग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.