शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
जनसुरक्षा विधेयकाला कडाडून विरोध का केला नाही, हायकमांडची नोटीस? काँग्रेस नेते म्हणाले...
3
Patna Hospital Firing: रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ
4
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
5
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
6
हिंदू बनून फसवलं, सौदीत विकण्याचा डाव, धर्म बदलला नाही म्हणून गँगरेप; पीडितेने सांगितला थरारक प्रसंग
7
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
8
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
9
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
10
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
12
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
13
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
14
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
15
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
16
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
17
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
18
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
19
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
20
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!

एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश

By admin | Updated: May 6, 2017 00:36 IST

संजय मोहिते : वाहतुकीला शिस्त लावण्यास प्राधान्य; ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. वाहन अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राध्यान्य राहील. वाढत्या अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करून एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल, असे मत नूतन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मोहिते यांनी नुकतीच पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर ‘लोकमत’च्या शहर कार्यालयास शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मोहिते यांनी ‘लोकमत’ परिवाराशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यात सर्वत्र वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोल्हापूरच्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावून येथील रस्ते सुरक्षित बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहील. वाहतूक समस्येसंबंधी स्थानिक लोकांशी चर्चा करून उपाययोजना राबविल्या जातील. वाहतुकीच्या प्रश्नावर काम करीत असताना एक जीव वाचला तर ते माझ्या कामाचे यश असेल. नागरिकांशी संवाद साधून काम केले जाईल. पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. माझे बालपण कोल्हापुरात गेल्याने येथील राजकीय, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्याचा आपला प्रयत्न राहील. त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. वाहतूक पोलिस खाकीचा कणावाहतूक पोलिस हा खाकीचा कणा आहे. चार भिंतींच्या आत कोण कसा तपास करतो हे दिसून येत नाही; परंतु रस्त्यावर नागरिकांना अडवून वाहतूक शाखेचा पोलिस पैसे घेत असेल तर थेट पोलिस अधीक्षकांची बदनामी आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांचा कारभार पारदर्शक बनविण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही मोहिते यांनी सांगितले. बंद सिग्नल सुरू करणारशहरात चोवीस वाहतूक सिग्नल आहेत. त्यापैकी चार नादुरुस्त आहेत. गेल्या सात-आठ वर्षांपासून बंद असलेला गंगावेस येथील सिग्नल सुरू केला आहे. या चौकातील अतिक्रमण हटवून सुस्थितीत सिग्नल सुरू केल्याने या मार्गावर होणारी वाहतूक कोंडी दूर झाली आहे. राजारामपुरी माऊली पुतळा चौकात सिग्नल सुरू करण्यात येणार आहे. शहरातील सर्व सिग्नल सुरू करून एकेरी मार्ग वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.