शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने वाढीव भरपाई दिली नाही तर बळिराजाशी गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क / खोची : महापुराने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या बाबतीत सरकारने एकटे पाडले आहे. जनमताच्या दबावाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क / खोची : महापुराने जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईच्या बाबतीत सरकारने एकटे पाडले आहे. जनमताच्या दबावाने सरकार निर्णय बदलते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन ताकद दाखवावी. सरकारने वाढीव भरीव नुकसान भरपाई दिली नाही तर गाठ बळिराजाशी आहे, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला.

पूरग्रस्तांच्या न्याय्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या पूरग्रस्तांच्या आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी खोची येथे वारणाकाठच्या १७ गावांतील शेतकऱ्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वडगाव बाजार समितीचे संचालक एम. के. चव्हाण होते.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, प्रतिगुंठा उसाला १३५, इतर खरीब पिकांना ६८ रुपयांची नुकसान भरपाई ही अत्यंत तोकडी आहे. खराब झालेल्या पिकाच्या शेतीची स्वच्छता करण्यासाठी याच्या दुप्पट खर्च येणार आहे. नुकसान भरपाईसंदर्भातील निर्णय नाही बदलला तर महागात पडेल. शेतकऱ्यांनी हातातील काम सोडून २३ तारखेच्या मोर्चात सहभागी होऊन आपली संघटित शक्ती दाखवावी.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, सरचिटणीस शिवाजी पाटील, सरपंच जगदीश पाटील, संदीप कारंडे, अप्पासाहेब एडके, प्रकाश पाटील, रामचंद्र मगदूम, अमरसिंह पाटील, सुरेश शिर्के, सुनील देसाई, संपतराव पवार, अण्णासो मगदूम, बाबूराव बाबर, राजकुमार मगदूम, दिनकर घाडगे, दादासो पाटील, अक्षय देसाई, महावीर चौगुले, आदी उपस्थित होते.

चौकट- १) भाजपने सोयाबीनचे दर कमी केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेले नाही. त्यांच्याबरोबर मी जाण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील सत्ताधारी यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत तर त्यांच्या छाताडावर बसून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. मी शेतकऱ्यांचा आहे. त्यांच्यासोबतच कायम राहणार आहे, असे शेट्टी म्हणाले.

फोटो ओळी-

खोची येथे वारणाकाठच्या शेतकऱ्यांच्या बैठकीत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संदीप कारंडे, जगदीश पाटील, शिवाजी पाटील, रामचंद्र मगदूम, वैभव कांबळे उपस्थित होते. (छाया-आयुब मुल्ला)

१७ खोची राजू शेट्टी