शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दखल न घेतल्यास सरकार कोसळेल

By admin | Updated: September 25, 2016 01:28 IST

मराठा मोर्चांबाबत राणेंचा इशारा : ‘हर हर महादेव‘ म्हणून चाल करण्याची मराठ्यांवर वेळ

कोल्हापूर : राज्यात दहा-पंधरा लाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघत असतानाही जर दखल घेतली नाही, तर राज्य सरकार कोसळेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. सरकार बदलण्याची ताकद या मोर्चांमध्ये आहे असे सांगून, आता ‘हर हर महादेव’ म्हणून चाल करण्याची वेळ मराठ्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले. येथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य कै. डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी राणे यांच्या हस्ते येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षणाबाबत सरकारनेच आता ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राणे म्हणाले, घटनेच्या १५/४ आणि १६/४ या कलमांनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास समाजाला आरक्षण देता येते. याचा आधार घेऊन आमच्या सरकारने अन्य कोणाचेही आरक्षण काढून न घेता तमिळनाडूच्या धर्तीवर ५२ टक्क्यांवर आरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयात यामध्ये त्रुटी निघाल्या. आम्ही १८ लाख जणांचे सर्वेक्षण करून जो अहवाल मांडला, त्यातील ठळक मुद्दे मांडून हे आरक्षण न्यायालयात टिकविता (पान १ वरून) येईल. ते या सरकारने करण्याची गरज आहे. आतापर्यंत मनोहर जोशी आणि सध्याचे सोडले तर जे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. मी मराठा जातीत जन्माला आलो, त्यामुळेच आताचे हे मोर्चे पाहून मला समाधान वाटते, आनंद वाटतो. (प्रतिनिधी)