शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

दखल न घेतल्यास सरकार कोसळेल

By admin | Updated: September 25, 2016 01:28 IST

मराठा मोर्चांबाबत राणेंचा इशारा : ‘हर हर महादेव‘ म्हणून चाल करण्याची मराठ्यांवर वेळ

कोल्हापूर : राज्यात दहा-पंधरा लाखांचे मराठ्यांचे मोर्चे निघत असतानाही जर दखल घेतली नाही, तर राज्य सरकार कोसळेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला. सरकार बदलण्याची ताकद या मोर्चांमध्ये आहे असे सांगून, आता ‘हर हर महादेव’ म्हणून चाल करण्याची वेळ मराठ्यांवर आली आहे, असेही ते म्हणाले. येथील राजाराम कॉलेजचे प्राचार्य कै. डॉ. बाळकृष्ण यांच्या ‘शिवाजी द ग्रेट’ या इंद्रजित सावंत यांनी संपादित केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी राणे यांच्या हस्ते येथील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये झाले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आरक्षणाबाबत सरकारनेच आता ठोस भूमिका घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. राणे म्हणाले, घटनेच्या १५/४ आणि १६/४ या कलमांनुसार सामाजिक आणि आर्थिक मागास समाजाला आरक्षण देता येते. याचा आधार घेऊन आमच्या सरकारने अन्य कोणाचेही आरक्षण काढून न घेता तमिळनाडूच्या धर्तीवर ५२ टक्क्यांवर आरक्षण मागितले होते. मात्र, न्यायालयात यामध्ये त्रुटी निघाल्या. आम्ही १८ लाख जणांचे सर्वेक्षण करून जो अहवाल मांडला, त्यातील ठळक मुद्दे मांडून हे आरक्षण न्यायालयात टिकविता (पान १ वरून) येईल. ते या सरकारने करण्याची गरज आहे. आतापर्यंत मनोहर जोशी आणि सध्याचे सोडले तर जे मुख्यमंत्री झाले त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली. मी मराठा जातीत जन्माला आलो, त्यामुळेच आताचे हे मोर्चे पाहून मला समाधान वाटते, आनंद वाटतो. (प्रतिनिधी)