शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नागचिन्हाविना अपूर्णच राहिली मूर्ती

By admin | Updated: September 25, 2015 00:25 IST

अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना त्रिशताब्दी वर्ष उद्यापासून

कोल्हापूर : आद्यशक्ती आणि साडेतीन शक्तिपीठांतील देवता करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठानेच्या त्रिशताब्दी वर्षाला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ही बाब प्रत्येक भाविकासाठी आनंददायी असली तरी नागचिन्हाविना अपूर्णावस्थेत आणि बदललेल्या रूपातील मूर्तीचे पूजन करावे लागणार, ही अत्यंत क्लेशकारक बाब आहे.करवीरनिवासिनी अंबाबाईचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे दाखले नवव्या शतकापासून मिळत असले तरी त्यापूर्वीपासून येथे हे मंदिर आहे. शालिवाहन, यादवकालीन, अगदी आदिलशाही काळातील विविध राजांनी या देवीची आराधना केल्याचे पुरावे आहेत. प्रत्येक राजवटीच्या काळातील सुधारणांनी आजचे हे मंदिर आकाराला आले आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही महाकाली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन स्त्री देवतांसह ब्रह्मांडाची निर्मिती केलेल्या आदिशक्तीचे स्वरूप आहे. १२ व्या शतकातील यादवराजांचा प्रधान हेमाद्री याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ ग्रंथात या मूर्तीचे वर्णन ‘क्षेत्रे कोल्हापूंद अन्ये’ म्हणजे करवीर क्षेत्रातील महालक्ष्मी अन्य क्षेत्रांहून वेगळी असल्याचे मान्य केले आहे. तिचे मूळ स्वरूप आदिशक्ती, जगन्मातेचे आहे. ती शैव व वैष्णव या दोन्ही पंथांमधील नाही, तर शाक्त सांप्रदायातील देवता आहे. अंबाबाईची सध्याची मूर्ती ही ११ व्या शतकातील असल्याचे मूर्ती अभ्यासक सांगतात. सन १७०० च्या काळात मंदिरावर होणाऱ्या आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. त्यानंतर ती कित्येक दिवस त्या पुजाऱ्याकडेच होती. माझी मूर्ती पुजाऱ्यांच्या घरी आहे. तिथून मला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावे, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना झाल्यानंतर त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना पन्हाळ्यावर जाऊन सांगितली. त्यांनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७ राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी तिची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना झाली. या सगळ्या घटनाक्रमांचा उल्लेख ग. ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवत (१९५८), मूर्तिविज्ञान (१९३९, १९५५), करवीर सरदारांच्या कैफियती (१९७१) या ग्रंथांमध्ये आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर २०१५ पासून अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. (प्रतिनिधी)निष्क्रियता आणि ठरवून दिरंगाईत्रिशताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी अंबाबाई मूर्तीचे नैसर्गिकरीत्या संवर्धन झाले असले तरी मूर्तीवर नागचिन्ह नसल्याने ती आजही अपूर्णावस्थेतच आहे. ज्या देवीची देशभरातील भाविक आराधना करतात, त्याच देवीची मूर्ती अर्धवट स्थितीत ठेवून या त्रिशताब्दी वर्षाला सुरुवात करण्यामागे श्रीपूजकांनी ठरवून केलेली दिरंगाई कारणीभूत आहे; तर जिल्हाधिकाऱ्यांनीही हे प्रकरण फारसे गांभीर्याने न घेता चालढकल केली.