शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला मिळालेला नोबेल पुरस्कार मी ट्रम्प यांना समर्पित करते', मारिया कोरिना मचाडो यांचं विधान   
2
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना नो एंट्री, तालिबानी फर्मानविरोधात संताप  
3
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी फडणवीसांची तुलना नथुरामसी केल्याने भाजपा संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर
4
'भोसले घराण्यामुळे शिवरायांची प्रेरणा रुजली, म्हणूनच नागपुरच्या मातीतून संघाचा जन्म झाला', सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान
5
पांड्याच्या प्रेमाचा स्वॅग! क्रिकेटरनं शेअर केली 'त्या' ब्युटीसोबतची रोमँटिक फोटो स्टोरी
6
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
7
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सांगितली आठवण
8
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
9
NZ W vs BAN W: अखेर वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडनं भोपळा फोडला! बांगलादेशचा १०० धावांनी उडवला धुव्वा
10
केबिनमध्ये बोलावलं अन्...; दारूच्या नशेत डॉक्टराचे नात्यातील महिलेसोबत संतापजनक कृत्य
11
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
12
‘मला तुझ्याकडे बोलावून घे’, विरहाने व्याकूळ झालेल्या शेफाली जरीवालाच्या पतीची भावूक पोस्ट, चाहते चिंतित  
13
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
14
आरोग्य सचिवांच्या दौऱ्यापूर्वीच दहा डॉक्टरांचे राजीनामास्त्र, सावंतवाडीतील आरोग्य क्षेत्रात खळबळ
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

नागचिन्हाविना अपूर्णच राहिली मूर्ती

By admin | Updated: September 25, 2015 00:25 IST

अंबाबाई मूर्ती पुनर्प्रतिष्ठापना त्रिशताब्दी वर्ष उद्यापासून

कोल्हापूर : आद्यशक्ती आणि साडेतीन शक्तिपीठांतील देवता करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्ती पुनर्प्रतिष्ठानेच्या त्रिशताब्दी वर्षाला उद्या, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. ही बाब प्रत्येक भाविकासाठी आनंददायी असली तरी नागचिन्हाविना अपूर्णावस्थेत आणि बदललेल्या रूपातील मूर्तीचे पूजन करावे लागणार, ही अत्यंत क्लेशकारक बाब आहे.करवीरनिवासिनी अंबाबाईचे हे मंदिर अस्तित्वात असल्याचे दाखले नवव्या शतकापासून मिळत असले तरी त्यापूर्वीपासून येथे हे मंदिर आहे. शालिवाहन, यादवकालीन, अगदी आदिलशाही काळातील विविध राजांनी या देवीची आराधना केल्याचे पुरावे आहेत. प्रत्येक राजवटीच्या काळातील सुधारणांनी आजचे हे मंदिर आकाराला आले आहे. करवीरनिवासिनी श्री अंबाबाई ही महाकाली, सरस्वती आणि लक्ष्मी या तीन स्त्री देवतांसह ब्रह्मांडाची निर्मिती केलेल्या आदिशक्तीचे स्वरूप आहे. १२ व्या शतकातील यादवराजांचा प्रधान हेमाद्री याने लिहिलेल्या ‘चतुर्वर्गचिंतामणी’ ग्रंथात या मूर्तीचे वर्णन ‘क्षेत्रे कोल्हापूंद अन्ये’ म्हणजे करवीर क्षेत्रातील महालक्ष्मी अन्य क्षेत्रांहून वेगळी असल्याचे मान्य केले आहे. तिचे मूळ स्वरूप आदिशक्ती, जगन्मातेचे आहे. ती शैव व वैष्णव या दोन्ही पंथांमधील नाही, तर शाक्त सांप्रदायातील देवता आहे. अंबाबाईची सध्याची मूर्ती ही ११ व्या शतकातील असल्याचे मूर्ती अभ्यासक सांगतात. सन १७०० च्या काळात मंदिरावर होणाऱ्या आक्रमणांपासून मूर्ती वाचविण्यासाठी ती एका पुजाऱ्याच्या घरात सुरक्षित ठेवण्यात आली. त्यानंतर ती कित्येक दिवस त्या पुजाऱ्याकडेच होती. माझी मूर्ती पुजाऱ्यांच्या घरी आहे. तिथून मला पुन्हा मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात यावे, असा दृष्टान्त नरहरभट सावगावकर यांना झाल्यानंतर त्यांनी ही गोष्ट महाराणी ताराराणी यांचे सुपुत्र शंभुराजे छत्रपती यांना पन्हाळ्यावर जाऊन सांगितली. त्यांनी सरदार हिंदुराव घोरपडे यांना मूर्तीच्या प्रतिष्ठापनेची आज्ञा केली. त्यानुसार अश्विन शुद्ध दशमी शके १६३७ राज्याभिषेक शक ५०, दिनांक २६ सप्टेंबर १७१५ रोजी तिची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना झाली. या सगळ्या घटनाक्रमांचा उल्लेख ग. ह. खरे यांच्या महाराष्ट्रातील ४ दैवत (१९५८), मूर्तिविज्ञान (१९३९, १९५५), करवीर सरदारांच्या कैफियती (१९७१) या ग्रंथांमध्ये आहे. त्यानुसार २६ सप्टेंबर २०१५ पासून अंबाबाई मूर्तीच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या त्रिशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. (प्रतिनिधी)निष्क्रियता आणि ठरवून दिरंगाईत्रिशताब्दी वर्ष सुरू होण्यापूर्वी अंबाबाई मूर्तीचे नैसर्गिकरीत्या संवर्धन झाले असले तरी मूर्तीवर नागचिन्ह नसल्याने ती आजही अपूर्णावस्थेतच आहे. ज्या देवीची देशभरातील भाविक आराधना करतात, त्याच देवीची मूर्ती अर्धवट स्थितीत ठेवून या त्रिशताब्दी वर्षाला सुरुवात करण्यामागे श्रीपूजकांनी ठरवून केलेली दिरंगाई कारणीभूत आहे; तर जिल्हाधिकाऱ्यांनीही हे प्रकरण फारसे गांभीर्याने न घेता चालढकल केली.