शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

विचार, भूमिकेवर निवडणुका व्हायच्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:04 IST

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही ...

माझ्या विद्यार्थिदशेपासून १९५२ नंतर मी राजकारणामध्ये सक्रिय आहे. सदाशिव मंडलिक, व्ही. बी. पोवार, अशोक पोवार हे माझ्यासोबतचे कार्यकर्ते. आम्ही सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचे काम करीत होतो. नंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला.मात्र, त्यावेळी पक्षाची भूमिका आणि उमेदवाराचे वैयक्तिक चारित्र्य, विचार यांचा विचार करून उमेदवारी दिली जात असे आणि मतदानही होत असे. आता परिस्थिती बदलली आहे. गुणवान माणसापेक्षा धनवान माणसाला उमेदवारीची संधी अधिक असल्याचे चित्र पाहावयास मिळते.कॉँग्रेसमध्ये एकदा का उमेदवारी पक्षाने निश्चित केली की, मग जिल्हा पातळीवर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक व्हायची. त्यावेळी नेते पक्षाशी आणि कार्यकर्ते नेत्याशी एकनिष्ठ होते. त्यामुळे या बैठकीत एकदा प्रचाराचे नियोजन ठरले की, तालुका पातळीवरील नेते त्याची जबाबदारी घ्यायचे. उमेदवार आणि आम्ही प्रमुख कार्यकर्ते प्रचाराला जायचो. मोठ्या गावांतून प्रचार फेऱ्या निघायच्या. सभा व्हायच्या. कार्यकर्त्यांच्याच घरी जेवणाची सोय केली जायची; कारण हॉटेल्स, खानावळी मोजक्या असायच्या आणि मुळात रोख पैसे जवळ फार नसायचेच. अनेक वेळा आम्ही घरच्या भाकरी बांधून प्रचाराला गेलो आहोत. बैलगाडीतून प्रचाराला गेलो आहोत. मुळात कार्यकर्त्यांना जनतेमध्ये सन्मान होता. बºयापैकी प्रचार जीपमधून व्हायचा. अ‍ॅम्बॅसडर गाडीमध्ये बसायला मिळणे भाग्याचे वाटत असे.शंकरराव माने, व्ही. टी. पाटील, भाऊसाहेब महागावकर, शंकरराव डिगे यांच्यापासून ते उदयसिंगराव गायकवाड यांच्यापर्यंतच्या अनेक निवडणुकींत मी सक्रिय होतो. मात्र, २००० नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकांचे स्वरूपच पालटून गेले आहे.वैयक्तिक उमेदवार कसा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, यापेक्षा राष्ट्रीय नेतृत्वाच्या लाटेवर विजयी होण्याचे दिवस आता आले आहेत. ‘ढाबा संस्कृती’ आता बळावली आहे. त्या कालावधीत आम्ही यशवंतराव चव्हाण, केशवराव जेधे, शंकरराव मोरे, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांची प्रभावी भाषणे ऐकण्याची संधी आम्हांला मिळाली. या नेत्यांच्या भाषणांमध्ये अजिबात वैयक्तिक टीका नसायची. पक्षाच्या ध्येयधोरणावरच टीकाटिप्पणी केली जायची. त्यामुळे एका विधायक वातावरणामध्ये निवडणुका व्हायच्या. ही परिस्थिती आता राहिलेली नाही, याचे वैषम्य वाटते.दादासाहेब जगताप