शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरा वर्षे वडाप मुक्तीतून कोथळीचा आदर्श

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

विकासासाठी एकजूट : दर अर्ध्या तासाला गावाला एस.टी., कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नात भर

संदीप बावचे - जयसिंगपूर -एखादी गोष्ट मनात आणली की ती तडीस नेऊन पूर्ण करायची, गाव विकासासाठी एकजूट दाखवायची. शिरोळ तालुक्यातील अशीच कोथळी या गावाने एकी दाखवून वडापमुक्त गाव म्हणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. गेली अकरा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. दर अर्ध्या तासाला एस.टी. बसची फेरी असल्यामुळे गावकऱ्यांचा प्रवास सुखकर बनला आहे. कृष्णा-वारणा संगमाच्या काठावर शिरोळ तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे गाव म्हणून कोथळीची ओळख आहे. टोमॅटो उत्पादनात एकेकाळी दबदबा असलेल्या गावाने तंटामुक्त पुरस्कार, स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. लोक सहभागातून अक्षयप्रकाश योजनाही राबवून आदर्शवत असे काम केले. याच गावाने सन २००४ पासून वडापमुक्त गावची गुढी उभारली. अनेक वर्षांपासून वेळेत एस.टी. न येणे, खासगी वाहनांची गर्दी यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने खासगी वाहतुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही वाहतूक बंद करण्यास भाग पाडले. कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी.च्या जादा फेऱ्या सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यावेळचे सरपंच धनगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडापमुक्तीचा हा संकल्प पूर्ण झाला. कोथळी-जयसिंगपूर-कोथळी अशी दर अर्ध्या तासाला सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत एस.टी. बससेवा सुरू झाली. कुरुंदवाड आगाराने गावासाठी दोन एस.टी. बसेस दिल्या. सकाळी लवकर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी एक मुक्कामी एस.टी.सुद्धा सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात गावागावांत खासगी वाहतूक सुरू असताना कोथळीकरांनी आदर्श निर्माण करून एकजुटीचे दर्शन दिले आहे. प्रवाशांना चांगली सेवा मिळत आहेच शिवाय शासनाला एसटीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूलदेखील मिळू लागला आहे. मध्यंतरीच्या काळात चालक व वाहक यांची कारणे सांगून एस.टी.च्या फेऱ्या कमी करण्याचा प्रकार सुरू झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व तटामुक्तसमितीने हा प्रकार हाणून पाडला. जयसिंगपूर एस.टी. बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून एस.टी.बसची सेवा सुरळीत केली. यामुळे ग्रामस्थांचा या यत्रणेवर अंकुश किती आहे, हे समजून येते. एकूणच या एकजुटीच्या वडापमुक्त गाव संकल्पनेप्रमाणेच ग्रामस्थांनी सर्वच क्षेत्रांत विकासाच्या दृष्टिकोणातून एकजूट कायमपणे ठेवावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.कोथळी गावाने नेहमीच आदर्शवत काम केले आहे. स्वच्छता अभियान असो, तंटामुक्त अभियान असो गावकऱ्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. गेली अकरा वर्षे या संकल्पामध्ये सातत्य ठेवले आहे, हे विशेष. - धनगोंडा पाटील, माजी सरपंच गावाने घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. कुरुंदवाड आगाराच्या सहकार्याने ही संकल्पना गावामध्ये चांगल्याप्रकारे सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचा प्रवास अल्पदरात व सुखकर बनला आहे. - बेबीजहिरा तांबोळी, सरपंचएस.टी.च्या सर्वाधिक फेऱ्या असणारे तालुक्यातील कोथळी हे एकमेव गाव आहे. यामुळे प्राधान्याने या गावासाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.एस.टी. आगाराच्या उत्पन्नातही भर पडली आहे. - एम. बी. भंडारे, आगारप्रमुखविनाफलक थांबाजयसिंगपूर येथील एसटी स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस कोथळीला जाण्यासाठी एस.टी. बसथांबा करण्यात आला आहे. मात्र, या थांब्यासमोर विनापरवाना वाहन पार्किंग केली जात असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या ठिकाणी कोथळी बसथांबा असा फलकही नाही. याकडे कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.