शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

अकरा वर्षे वडाप मुक्तीतून कोथळीचा आदर्श

By admin | Updated: April 30, 2015 00:30 IST

विकासासाठी एकजूट : दर अर्ध्या तासाला गावाला एस.टी., कुरुंदवाड आगाराच्या उत्पन्नात भर

संदीप बावचे - जयसिंगपूर -एखादी गोष्ट मनात आणली की ती तडीस नेऊन पूर्ण करायची, गाव विकासासाठी एकजूट दाखवायची. शिरोळ तालुक्यातील अशीच कोथळी या गावाने एकी दाखवून वडापमुक्त गाव म्हणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे. गेली अकरा वर्षे हा उपक्रम राबविला जात आहे. दर अर्ध्या तासाला एस.टी. बसची फेरी असल्यामुळे गावकऱ्यांचा प्रवास सुखकर बनला आहे. कृष्णा-वारणा संगमाच्या काठावर शिरोळ तालुक्याच्या उत्तरेकडील शेवटचे गाव म्हणून कोथळीची ओळख आहे. टोमॅटो उत्पादनात एकेकाळी दबदबा असलेल्या गावाने तंटामुक्त पुरस्कार, स्वच्छता अभियानाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. लोक सहभागातून अक्षयप्रकाश योजनाही राबवून आदर्शवत असे काम केले. याच गावाने सन २००४ पासून वडापमुक्त गावची गुढी उभारली. अनेक वर्षांपासून वेळेत एस.टी. न येणे, खासगी वाहनांची गर्दी यामुळे ग्रामस्थांनी एकजुटीने खासगी वाहतुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेऊन पोलीस ठाण्याला निवेदन देऊन ही वाहतूक बंद करण्यास भाग पाडले. कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांना निवेदन देऊन एस.टी.च्या जादा फेऱ्या सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यावेळचे सरपंच धनगोंडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली वडापमुक्तीचा हा संकल्प पूर्ण झाला. कोथळी-जयसिंगपूर-कोथळी अशी दर अर्ध्या तासाला सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत एस.टी. बससेवा सुरू झाली. कुरुंदवाड आगाराने गावासाठी दोन एस.टी. बसेस दिल्या. सकाळी लवकर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी एक मुक्कामी एस.टी.सुद्धा सुरू ठेवली आहे. जिल्ह्यात गावागावांत खासगी वाहतूक सुरू असताना कोथळीकरांनी आदर्श निर्माण करून एकजुटीचे दर्शन दिले आहे. प्रवाशांना चांगली सेवा मिळत आहेच शिवाय शासनाला एसटीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा महसूलदेखील मिळू लागला आहे. मध्यंतरीच्या काळात चालक व वाहक यांची कारणे सांगून एस.टी.च्या फेऱ्या कमी करण्याचा प्रकार सुरू झाला होता. मात्र, ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व तटामुक्तसमितीने हा प्रकार हाणून पाडला. जयसिंगपूर एस.टी. बसस्थानकात ठिय्या आंदोलन करून एस.टी.बसची सेवा सुरळीत केली. यामुळे ग्रामस्थांचा या यत्रणेवर अंकुश किती आहे, हे समजून येते. एकूणच या एकजुटीच्या वडापमुक्त गाव संकल्पनेप्रमाणेच ग्रामस्थांनी सर्वच क्षेत्रांत विकासाच्या दृष्टिकोणातून एकजूट कायमपणे ठेवावी, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.कोथळी गावाने नेहमीच आदर्शवत काम केले आहे. स्वच्छता अभियान असो, तंटामुक्त अभियान असो गावकऱ्यांचा नेहमीच प्रतिसाद मिळतो. गेली अकरा वर्षे या संकल्पामध्ये सातत्य ठेवले आहे, हे विशेष. - धनगोंडा पाटील, माजी सरपंच गावाने घेतलेला निर्णय आदर्शवत आहे. कुरुंदवाड आगाराच्या सहकार्याने ही संकल्पना गावामध्ये चांगल्याप्रकारे सुरू आहे. यामुळे ग्रामस्थांचा प्रवास अल्पदरात व सुखकर बनला आहे. - बेबीजहिरा तांबोळी, सरपंचएस.टी.च्या सर्वाधिक फेऱ्या असणारे तालुक्यातील कोथळी हे एकमेव गाव आहे. यामुळे प्राधान्याने या गावासाठी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.एस.टी. आगाराच्या उत्पन्नातही भर पडली आहे. - एम. बी. भंडारे, आगारप्रमुखविनाफलक थांबाजयसिंगपूर येथील एसटी स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजूस कोथळीला जाण्यासाठी एस.टी. बसथांबा करण्यात आला आहे. मात्र, या थांब्यासमोर विनापरवाना वाहन पार्किंग केली जात असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय या ठिकाणी कोथळी बसथांबा असा फलकही नाही. याकडे कुरुंदवाड एस.टी. आगार प्रमुखांनी लक्ष देण्याची गरज आहे.