शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

स्त्री-पुरुषांच्या कप्पेबंद संकल्पना बदलायला हव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:48 IST

स्त्रियांवर होणाºया अत्याचाराचे मूळ शोधले तर त्यामागे पुरुषसत्ताक मानसिकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विरोधात लढायचे तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे.

स्त्रियांवर होणाºया अत्याचाराचे मूळ शोधले तर त्यामागे पुरुषसत्ताक मानसिकता असल्याचे दिसून येते. त्यामुळे या विरोधात लढायचे तर पुरुषांनी पुढाकार घेतला पाहिजे. या विचारातून सुरू झाली मेन अगेन्स्ट व्हायलन्स अ‍ॅन्ड अ‍ॅब्युस (मावा) ही संस्था. गेल्या २५ वर्षांपासून महिला, तृतीयपंथी, समलिंगी, उभयलिंगी अशा विविध विषयांवर संवेदनशील समाजमन घडविणाºया या संस्थेचे संचालक हरिष सदानी यांच्याशी साधलेला हा थेट संवाद..महिला, मुलींवरील अन्याय कमी करायचा असेल तर पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे.प्रश्न : मावा संस्थेच्या स्थापनामागील उद्दिष्ट्य काय?उत्तर : मावा ही स्त्रिया, मुलींसाठी काम करणारी देशातील पहिली अशी संस्था आहे जी संवेदनशील पुरुषांनी सुरू केली आहे. ही संस्था युवकांशी मैत्रीपूर्ण वातावरणात संवाद साधते. त्यातून त्यांची मानसिकता जाणून घेण्याची आणि अपेक्षित परिवर्तन करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविते. या युवकांनी आपल्या कुटुंबातील स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना सक्षम केले तरी संस्थेचा हेतू सफल होतो आणि आम्हाला आनंद आहे की गेल्या २५ वर्षांत आम्ही हे करू शकलो.

प्रश्न : संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्त्रियांच्या सामाजिक स्थितीबद्दल काय निष्कर्ष निघाला?उत्तर : मी स्वत: ज्या ठिकाणी वाढलो परिसरात मी भोवतीने महिलांना मारहाण, असभ्य वर्तन, शिवीगाळ या सगळ््या गोष्टी पाहिल्या आहेत. त्यातून मी अंतमुर्ख होऊन विचार करू लागलो. आपल्याकडे स्त्रिया, मुलींवरील अन्याय, कौटुंबिक छळ या गोष्टींकडे त्यांचा वैयक्तिक प्रश्न किंवा महिलांचेच प्रश्न या दृष्टिकोनातून पाहिले जाते. पुरुषाने कुटुंबातील स्त्रीला कामात मदत केली, रडला तरी ‘बाईसारखं काय वागतोस,’ अशा शब्दांत हिणविले जाते. मग बाईच्या कामाला मोल नाही का, असा प्रश्न पडतो. आता ही परिस्थिती बदलत असली तरी अजून खूप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. आता तृतीयपंथी, समलिंगी, उभयलिंगी अशा व्यक्तींचे प्रश्न नव्याने निर्माण झाले आहेत त्यांना समाजापासून दूर करण्यापेक्षा समजून घेतले पाहिजे.

प्रश्न : ‘मावा’चे काम कशा पद्धतीने चालते?उत्तर : महिला, मुलींवरील अन्याय कमी करायचा असेल तर पुरुषांची मानसिकता बदलली पाहिजे. त्याची सुरुवात म्हणून महाविद्यालयांपासून आम्ही सुरुवात केली. पुण्यातील सहा महाविद्यालयांमध्ये चर्चात्मक कार्यक्रमातून संवादक घडविले गेले. हे संवादक ज्युनिअर मुलांना प्रशिक्षण देऊ लागले. पथनाट्य, खेळ, गाणी या माध्यमातून हलके-फुलके मनोरंजन करीत युवकांची मानसिकता बदलली जाते. युवामैत्री ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यात मुलेच नव्हे, तर मुलीसुद्धा आपल्या अडचणी सांगून सल्ला विचारत होत्या. या सगळ्या नियोजनाचे काम आठ ते दहा पुरुषांची कोअर टीम करते. सध्या मुंबई युवा संवाद, जळगाव, धुळे येथे युवा तरंग, सातारा, कोल्हापूर, नागपूर, बुलढाणा येथे ‘माणूश’ नावाने हा उपक्रम चालविला जातो. ‘समभाव’ चित्रपट महोत्सव त्याचाच एक भाग आहे. संवादी गुंतवणूक असे त्याचे स्वरूप आहे. ‘पुरुष स्पंदन’ या दिवाळी अंकात पुरुष आपल्या अनुभवावर आधारित लेखन करतात. आता तर त्या स्त्रीयाही लिहू लागल्या आहेत. त्यात दरवर्षी विशेष थीमवर लेखन मागविले जाते.

प्रश्न : संस्थेच्या कामाचे फलित काय जाणवते?उत्तर : युवा मैत्री उपक्रमातून आम्ही आजवर सातशे संवादक निर्माण केलो. याची दखल हार्वर्ड युनिव्हर्सिटीनेदेखील घेतली आणि त्यांना या संवादकांमधील गुणात्मक चाचणी आणि सर्वेक्षण केले. त्यात युवकांशी तारुण्यसुलभ पद्धतीने संवाद साधला तर बदल घडतो हे दिसून आले. मुलं-मुली आपल्या कुटुंबापासून बदलाची प्रक्रिया सुरू करताहेत, या विषयावर खुलेपणाने चर्चा करीत आहेत. घरात होत असलेल्या अन्यायाविरोधात पाऊल उचलताहेत आणि नवे संवादक घडवत आहेत. बदल ही सातत्याने होणारी गोष्ट आहे आणि आम्ही ते ठेवू शकलो याचे समाधान आहे.

प्रश्न : यानिमित्ताने युवक-युवतींना काही आवाहन करू इच्छिता?उत्तर : आता मुली सक्षम झाल्या असल्या तरी मुलांमध्ये आणि पुरुषांमध्ये संकुचितपणा आणि असुरक्षिततेची भावना आहे. त्यांचा एक पाय २१ व्या शतकात, तर दुसरा पाय १७ व्या शतकात आहे. त्यांच्या मनातील स्त्रीविषयक पूर्वग्रहदूषित विचार बदलले पाहिजे. स्त्री, पुरुष अशा लिंगभेदाच्या कप्पेबंद चौकटीपलीकडे जाऊन आता व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून विचार केला गेला पाहिजे. मुलीच्या नकारापासून ते कुटुंबातल्या स्त्रीवरील लहान-मोठ्या मानसिक व शारीरिक अन्यायाविरोधात सम्यकदृष्टीने मी पुरुष म्हणून कसा वागलो पाहिजे याचा विचार केला तर प्रश्न आपोआप सुटतील.- इंदुमती गणेश