शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गरजूंना मोबाईल देण्याचा विचार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:13 IST

उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना ...

उत्तूर : कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आला नाही तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचा शासन विचार करीत आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती उदय पवार होते.

मुश्रीफ म्हणाले, कोरोनामुळे शाळा बंद आहेत. मात्र, शिक्षण चालू आहे. प्राथमिक शाळेतील मुलेही कोरोनामुळे शाळेत जाऊ शकली नाहीत. कोरोना संसर्ग वाढला तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गरजू विद्यार्थ्यांना मोबाईल देण्याचे नियोजन आहे. शिक्षकांनी प्रभावीपणे अध्यापन करण्यासाठी प्रयत्न करावेत.

मुश्रीफ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात झाला.

अध्यक्ष धनाजी रावण यांनी स्वागत केले. वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, सभापती पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास महादेव पाटील, रावसाहेब देसाई, रवींद्र पाटील, शिरीष देसाई, संतोष गुरव आदींसह संचालक व सभासद उपस्थित होते.

----------------------

फोटो ओळी : उत्तूर (ता. आजरा) येथे विघ्नहर्ता पतसंस्थेच्या गुणगौरव कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी धनाजी रावण, काशिनाथ तेली, वसंतराव धुरे आदी उपस्थित होते.

क्रमांक : २७१२२०२०-गड-०१