शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

इचलकरंजीत कर तफावतीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरालगत असलेल्या कबनूर (ता. हातकणंगले) या गावात उरुसावेळी लावण्यात येणारी खेळणी व विविध प्रकारच्या स्टॉलपासून ग्रामपंचायतीला साडेसतरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असतानाच इचलकरंजीत मात्र गणेश फेस्टिव्हलमध्ये खेळणी व स्टॉलमधून नगरपालिकेला अवघे दोन लाख रुपयांचेच उत्पन्न मिळत असल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. कबनूर उरूस आणि इचलकरंजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरालगत असलेल्या कबनूर (ता. हातकणंगले) या गावात उरुसावेळी लावण्यात येणारी खेळणी व विविध प्रकारच्या स्टॉलपासून ग्रामपंचायतीला साडेसतरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असतानाच इचलकरंजीत मात्र गणेश फेस्टिव्हलमध्ये खेळणी व स्टॉलमधून नगरपालिकेला अवघे दोन लाख रुपयांचेच उत्पन्न मिळत असल्याबद्दल नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. कबनूर उरूस आणि इचलकरंजी फेस्टिव्हल याचीच चर्चा गेलेदोन दिवस नगरपालिका वर्तुळात आहे.कबनूर (ता. हातकणंगले) येथे गुढीपाडव्याच्या सणादरम्यान आठवड्याभराचा उरूस असतो. उरूसावेळी विविध प्रकारची खेळणी, वस्तू आणि खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलही उभारले जातात. अशा या खेळणी व स्टॉलमधून आठवड्याभरात साडेसतरा लाख रुपयांहून अधिक बाजार कराचे उत्पन्न कबनूर ग्रामपंचायतीला मिळते.इचलकरंजीतील गणेश चतुर्थीच्या सणावेळी दहा दिवसांचा गणेश फेस्टिव्हल श्रीमंत घोरपडे नाट्यगृहामध्ये साजरा होतो. त्यावेळी श्रीमंत घोरपडे चौक ते सुंदर बाग या दरम्यान विविध प्रकारची खेळणी आणि खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विकणारे स्टॉल उभारले जातात. अशा दहा दिवसांसाठी श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकातील जागा बाजार कराच्या वसुलीसाठी लिलाव पद्धतीने ठेका दिला जातो. अशा प्रकारचा ठेका इचलकरंजी नगरपालिकेने लिलावामध्ये अवघ्या दोन लाख रुपयांना दिला. कबनूर छोटेसे गाव. याउलट इचलकरंजी मोठे शहर. या दोन्हीही गावांमध्ये भरविण्यात आलेले उरूस आणि फेस्टिव्हल यांच्या बाजार कराच्या वसुलीत तब्बल पंधरा लाखांची तफावत पाहता याचीच उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. लिलाव पद्धतीने ठेका देण्याऐवजी नगरपालिकेच्या यंत्रणेमार्फत फेस्टिव्हलमधील खेळणी व स्टॉलधारकाकडून बाजार कराची वसुली व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.१५०० किलोची बिर्याणी आणि ठेका ‘मॅनेज’नगरपालिकेमध्ये फेस्टिव्हलबाबत झालेल्या लिलाव प्रक्रियेच्या वेळी प्रक्रियेचा सोपस्कार पूर्ण करून तिघेजण सहभागी झाले होते. मात्र, या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पाचजणांना सोपस्कार पूर्ण करता आले नाही. नगरपालिकेच्या यंत्रणेने लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येऊ नये म्हणून या पाचजणांना लिलाव प्रक्रियेपासून दूर ठेवले. याचाच अर्थ फेस्टिव्हलबाबतचा बाजार कराचा ठेका ‘मॅनेज’ करण्यात आला होता, असा आरोप त्यावेळी करत असतानाच जिल्हाधिकाºयांपर्यंत तक्रार करण्याची भाषा प्रक्रियेपासून दूर राहिलेल्या अर्जदारांनी केली होती. मात्र, संबंधित नंतर ‘मॅनेज’ झाल्याची चर्चा आहे, तर १५०० किलो तांदूळ मसाले भातासाठी घेऊन हा ठेका ‘मॅनेज’ केल्याचेही बोलले जात आहे.