शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: April 21, 2016 00:57 IST

टाळे ठोकले : जलअभियंता धारेवर, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कोंडले

इचलकरंजी : चार महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या कारणावरून मुरदुंडे मळा व कलानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला बुधवारी टाळे ठोकले. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनातील चर्चेवेळी संतप्त नागरिकांनी जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना धारेवर धरले. दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.प्रभाग क्रमांक १२ मधील मुरदुंडे मळा, गल्ली नं. १ परिसरात चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. तर कलानगर भागात दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; पण परिस्थिती तशीच आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे; पण चूक कोठे , हेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजत नाही. संतप्त नागरिकांनी पालिकेवर नगरसेवक महादैव गौड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोंडून घालून दरवाजाला टाळे ठोकले. सर्वांनी पाणीपुरवठा विभागाच्या दारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमारे १५ मिनिटांच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांना बोलविले. तेथे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अजितमामा जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, जलअभियंता ए. एन. जकीनकर उपस्थित होते. महादेव गौड यांनी परिस्थितीची माहिती देत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी बंद तरी असतात किंवा दोन दिवसांत काम करतो, अशी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी जकीनकर यांना चांगलेच धारेवर धरले, यामुळे दालनात गोंधळ निर्माण झाला . अखेर चर्चेअंती दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सुरेश भुते, हणमंत वाळवेकर, शशिकांत राक्षे, जितेंद्र जानवेकर, वसंत तोडकर, विद्याधर पवार, पंडित वाळवेकर, सुभाष बंडगर, दीपक बंडगर, राजू पवार, शारदा डंबाळ, मंगल भंडारे, शोभा तेजम, विद्या पवार, वैशाली मांगलेकर, ज्योती डांगरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्तपाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने एका भागात मुबलक पाणी, तर एका भागात पाणीच येत नाही. शिवाय भागातील कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कामासंदर्भात चौकशी करता आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त झाले.