शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: April 21, 2016 00:57 IST

टाळे ठोकले : जलअभियंता धारेवर, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कोंडले

इचलकरंजी : चार महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या कारणावरून मुरदुंडे मळा व कलानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला बुधवारी टाळे ठोकले. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनातील चर्चेवेळी संतप्त नागरिकांनी जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना धारेवर धरले. दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.प्रभाग क्रमांक १२ मधील मुरदुंडे मळा, गल्ली नं. १ परिसरात चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. तर कलानगर भागात दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; पण परिस्थिती तशीच आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे; पण चूक कोठे , हेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजत नाही. संतप्त नागरिकांनी पालिकेवर नगरसेवक महादैव गौड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोंडून घालून दरवाजाला टाळे ठोकले. सर्वांनी पाणीपुरवठा विभागाच्या दारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमारे १५ मिनिटांच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांना बोलविले. तेथे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अजितमामा जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, जलअभियंता ए. एन. जकीनकर उपस्थित होते. महादेव गौड यांनी परिस्थितीची माहिती देत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी बंद तरी असतात किंवा दोन दिवसांत काम करतो, अशी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी जकीनकर यांना चांगलेच धारेवर धरले, यामुळे दालनात गोंधळ निर्माण झाला . अखेर चर्चेअंती दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सुरेश भुते, हणमंत वाळवेकर, शशिकांत राक्षे, जितेंद्र जानवेकर, वसंत तोडकर, विद्याधर पवार, पंडित वाळवेकर, सुभाष बंडगर, दीपक बंडगर, राजू पवार, शारदा डंबाळ, मंगल भंडारे, शोभा तेजम, विद्या पवार, वैशाली मांगलेकर, ज्योती डांगरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्तपाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने एका भागात मुबलक पाणी, तर एका भागात पाणीच येत नाही. शिवाय भागातील कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कामासंदर्भात चौकशी करता आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त झाले.