शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत पाण्यासाठी आंदोलन

By admin | Updated: April 21, 2016 00:57 IST

टाळे ठोकले : जलअभियंता धारेवर, नागरिकांनी कर्मचाऱ्यांना कोंडले

इचलकरंजी : चार महिन्यांपासून कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असून, पालिका प्रशासनाला कळवूनही त्याकडे दुर्लक्षच केले जात आहे. या कारणावरून मुरदुंडे मळा व कलानगर परिसरातील नागरिकांनी नगरसेवक महादेव गौड यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभागाला बुधवारी टाळे ठोकले. दरम्यान, नगराध्यक्षांच्या दालनातील चर्चेवेळी संतप्त नागरिकांनी जलअभियंता ए. एन. जकीनकर यांना धारेवर धरले. दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलक माघारी परतले.प्रभाग क्रमांक १२ मधील मुरदुंडे मळा, गल्ली नं. १ परिसरात चार महिन्यांपासून पाणीच येत नाही. तर कलानगर भागात दोन महिन्यांपासून अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या; पण परिस्थिती तशीच आहे. पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी खुदाई केली आहे; पण चूक कोठे , हेच अधिकारी व कर्मचाऱ्यांना समजत नाही. संतप्त नागरिकांनी पालिकेवर नगरसेवक महादैव गौड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोंडून घालून दरवाजाला टाळे ठोकले. सर्वांनी पाणीपुरवठा विभागाच्या दारात ठिय्या मारत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. सुमारे १५ मिनिटांच्या आंदोलनानंतर नगराध्यक्षांच्या दालनात सर्वांना बोलविले. तेथे नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, अजितमामा जाधव, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, जलअभियंता ए. एन. जकीनकर उपस्थित होते. महादेव गौड यांनी परिस्थितीची माहिती देत नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असून, अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दूरध्वनी बंद तरी असतात किंवा दोन दिवसांत काम करतो, अशी उत्तरे दिल्याचे सांगितले. यावेळी संतप्त नागरिकांनी जकीनकर यांना चांगलेच धारेवर धरले, यामुळे दालनात गोंधळ निर्माण झाला . अखेर चर्चेअंती दोन दिवसांत भागातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात सुरेश भुते, हणमंत वाळवेकर, शशिकांत राक्षे, जितेंद्र जानवेकर, वसंत तोडकर, विद्याधर पवार, पंडित वाळवेकर, सुभाष बंडगर, दीपक बंडगर, राजू पवार, शारदा डंबाळ, मंगल भंडारे, शोभा तेजम, विद्या पवार, वैशाली मांगलेकर, ज्योती डांगरे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्तपाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने एका भागात मुबलक पाणी, तर एका भागात पाणीच येत नाही. शिवाय भागातील कूपनलिका बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कामासंदर्भात चौकशी करता आश्वासनाशिवाय काहीच पदरी पडत नसल्याने नागरिक संतप्त झाले.