शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

इचलकरंजीत शिवसेनेचा मोर्चा

By admin | Updated: June 19, 2016 01:13 IST

प्रशासनाचा शंखध्वनीने निषेध : डेंग्यू मृतांच्या नातेवाइकांना तीन लाख देण्याची मागणी

इचलकरंजी : नगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. डेंग्यूचा फैलाव वाढत आहे. डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना नगरपालिका प्रशासनाने प्रत्येकी तीन लाख रुपये द्यावेत, यासह नागरी सुविधांच्या मागण्यांसाठी शनिवारी इचलकरंजी शहर शिवसेनेच्यावतीने पालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालिकेच्या प्रवेशद्वारात आणि नगराध्यक्षांच्या दालनात शंखध्वनी करण्यात आला. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. डेंग्यूमुळे तिघांचा मृत्यू झाला असून, त्याला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेच्यावतीने करण्यात आला. मोर्चाच्या सुरुवातीला प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली पालिकेत आल्यानंतर प्रवेशद्वारात निषेधाच्या घोषणा देत प्रशासनाच्या नावाने शंखध्वनी करण्यात आला. त्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख धनाजी मोरे, मलकारी लवटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत महादेव गौड आणि आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. नगराध्यक्षा बिरंजे यांनी, मृतांच्या वारसांना अनुदानसंदर्भात पालिकेने ठराव करून तो शासनाकडे पाठविला आहे, त्याचबरोबर पालिकेच्या माध्यमातून काय मदत करता येईल, यासंदर्भात पालिकेत सभेत निर्णय करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनात सयाजी चव्हाण, महेश बोहरा, आप्पासो पाटील, राजू आलासे, आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)