इचलकरंजी : मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, या काळात कामगार, शेतकरी व सामान्य जनतेसाठी मोदी सरकारने कोणतीही भरीव कामगिरी केलेली नाही. शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्याचा आरोप करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
कामगार कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यापेक्षा हे कायदे कामगारविरोधी आहेत. यामुळे मोदी व भाजपला प्रचंड आर्थिक फायदा होत आहे. गेल्या सात वर्षात इंधन, गॅस व औषधांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. लॉकडाऊनमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. याबाबत मोदी सरकारने कोणत्याही मदतीची घोषणा केली नाही. लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारची असताना राज्यावर सोपविण्यात आली. या प्रश्नावर मोदी सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्याने निषेध करण्यात आला. यावेळी दत्ता माने, भरमा कांबळे, सदा मलाबादे, शिवगोंडा खोत व कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो ओळी
३००५२०२१-आयसीएच-०३
इचलकरंजीत माकपकडून मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.