शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

इचलकरंजीत हाळवणकर यांच्या ई-माहिती, तक्रार केंद्राचे उद्घाटन

By admin | Updated: December 26, 2014 00:46 IST

राज्यातील पहिला उपक्रम : तक्रारी मिस कॉलद्वारे करण्याचे आवाहन

इचलकरंजी : येथील विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आपल्या तक्रारी व सूचना थेट आमदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-माहिती व तक्रार केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला असून, त्याचे उद्घाटन आमदार हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास रानडे होते. या योजनेचा मतदारसंघातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हाळवणकर यांनी केले.ई-माहिती व तक्रार केंद्रात आपली तक्रार किंवा माहिती नोंदविण्यासाठी नागरिकांनी ०४०७१०१५१५५ या क्रमांकावर मिस कॉल करावयाचा आहे. त्यानंतर या प्रणालीद्वारे आपणास एसएमएस प्राप्त होईल. त्यानंतर त्या एसएमएसमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर आपल्या शहर-गावाचे नाव, आपले नाव, पत्ता व थोडक्यात तक्रार पाठवायची आहे. त्यानंतर आमदार कार्यालयातून संबंधित तक्रारदारास दूरध्वनीद्वारे विचारणा केली जाईल आणि त्यानुसार तक्रार निवारण करून त्यानंतर पुन्हा एसएमएसद्वारे तक्रारदारास त्यांच्या तक्रारीसंदर्भातील पूर्ततेची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या तक्रारी आॅनलाईन सोडवून घ्याव्यात, असे आवाहन हाळवणकर यांनी केले आहे.कार्यकर्त्यांनी या योजनेबाबत नागरिकांना माहिती देऊन त्यांच्या तक्रारी, अडचणी व सूचना समजावून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आवश्यक ती सर्व मदत आमदार कार्यालयामार्फत केली जाणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत, आदी निवडणुकांमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या संपर्कात राहून लोकाभिमुख कामे करावीत. तसेच आठवड्यातून एक दिवस एक ते दोन तास स्वच्छता अभियानासाठी देऊन आपल्या परिसरात स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहनही हाळवणकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमास हिंदुराव शेळके, धोंडिराम जावळे, गोपाल जासू, प्रवीण खामकर, शहाजी भोसले, मदन झोरे, आदींसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, बुथ प्रतिनिधी, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)