शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

इचलकरंजीचा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे

By admin | Updated: January 5, 2016 01:06 IST

काळम्मावाडीसाठी शासनाचा खोडा : वारणेसाठी आवाडे यांचा आग्रह; पंचगंगा नदी शुद्ध करण्याची नागरिक मंचची भूमिका

इचलकरंजी : काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी योजना इचलकरंजी नगरपालिकेस पेलणार नाही, असे सांगत राज्य शासनाने शहरवासीयांच्या पिण्याच्या पाण्यात खोडा घातला. तर वारणा नदीतून नळ योजना राबविण्याची मागणी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली आहे. मात्र, ‘पंचगंगा शुद्ध करा, नवीन योजना नको’, असे म्हणत अ‍ॅड. धैर्यशील सुतार व नागरिक मंच यांनी उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याने येथील पाण्याचा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. सद्य:स्थितीस इचलकरंजी शहराला पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या पंचगंगा व कृष्णा अशा दोन पाणी योजना आहेत. दोन्ही पाणी योजनांमधून शहराला लागणारे सुमारे ५० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी उचलले जाते. त्यापैकी वीस टक्क्यांहून अधिक पाण्याची गळती होत असल्याने सध्या दोन दिवसांतून एकवेळ शहरवासीयांना पाणी मिळते. डिसेंबर-जानेवारी महिन्यांमध्ये पंचगंगा नदी दूषित झाल्याने तेथून पाण्याचा उपसा बंद केला जातो. त्यामुळे कृष्णा नळ पाणी योजनेवरच अवलंबून राहावे लागते. त्याचा परिणाम शहरवासीयांना तीन दिवसांतून एक वेळ पाणी मिळण्यात होतो. पंचगंगा दूषित झाल्यामुळे आणि प्रत्येकवर्षी सुमारे सहा महिने फक्त कृष्णा नदीतील पाण्यावर अवलंबून राहावे लागते. सुमारे १८ वर्षांपूर्वी कार्यान्वित झालेल्या कृष्णा नळ योजनेच्या दाबनलिकेला वारंवार गळती लागते. आणि शहरवासीयांना प्रत्येक उन्हाळ्यामध्ये कमालीच्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. म्हणून वारणा नदीतून पाणी उचलण्याची योजना करावी, यासाठी नगरपालिकेने सुमारे आठ वर्षांपूर्वी ठराव केला. वारणा नदीतून पाणी आणण्याच्या योजनेचे सर्वेक्षण झाले. या योजनेला ५५ कोटी रुपये खर्च येणार होता; पण सर्वेक्षणानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पालिकेत सत्ताबदल झाला आणि ही योजना मागे पडली. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर यांनी काळम्मावाडी धरणातून थेट नळाद्वारे पाणी आणण्याची योजना राबवावी, असा आग्रह धरला. या योजनेला शंभर टक्के अनुदान मिळवू, अशी भूमिका त्यांनी घेतली. मात्र, सध्याच्या भाजपप्रणित सरकारने काळम्मावाडी योजना इचलकरंजी नगरपालिकेस पेलणारी नाही. या योजनेसाठी येणाऱ्या एकूण ५६५ कोटी रुपये खर्चाच्या २५ टक्के हिस्सा नगरपालिकेस भरणे अशक्य आहे, असे सांगून इचलकरंजी पालिकेस पर्यायी योजना सुचविण्यास सांगितले. या पार्श्वभूमीवर सुळकूड येथून दूधगंगा नदीचे पाणी आणणे, हा पर्याय समोर आला. मात्र, आता त्याला फाटा देऊन वारणेतून पाणी आणणारी योजना राबवावी, अशी भूमिका हाळवणकर यांनी घेतली आहे, असे आवाडे यांनी सांगितले. अशा पार्श्वभूमीवर अ‍ॅड. धैर्यशील सुतार व नागरिक मंच यांनी पत्रकार परिषद घेऊन इचलकरंजीस नवीन योजना नको. पंचगंगा शुद्ध करा, अशी भूमिका मांडली आहे. त्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात दाद मागण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे इचलकरंजीचे पिण्याचे पाणी आता पेटण्याची शक्यता निर्माण झाली असून, नगरपालिकेच्यावतीने कोणती भूमिका घेतली जाते, याची उत्सुकता नागरिकांना लागून राहिली आहे. (प्रतिनिधी) पॅटर्न बदलण्याचे प्रयत्न करावेत ४आमदार सतेज पाटील विधान परिषद निवडणूक काळात इचलकरंजीला आले असताना ते म्हणाले होते, कॉँग्रेसचे सरकार असताना पालिकांना आवश्यक असलेल्या विकास योजनांचा खर्च केंद्र सरकार ८० टक्के, राज्य शासन दहा टक्के व नगरपालिका दहा टक्के अशा हिश्श्याने राबविण्याचे धोरण घेतले होते. त्यातील दहा टक्के हिश्श्यांची रक्कम नगरपालिका पेलवणार होती; पण आता सरकारने ५०:२५:२५ अशा हिस्सेवारीची अमृत योजना जारी केली आहे.