शहरं
Join us  
Trending Stories
1
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
2
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
3
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
4
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
5
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
6
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
7
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
8
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
9
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
10
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
11
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
12
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
13
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
14
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
15
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
16
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
17
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
18
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
19
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
20
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होताना दिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे♦नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे,♦वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे,♦न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे,♦नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होतानादिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने मंजुरी दिलेला शहर वाहतूक आराखडा प्रशासनाकडून यंदा राबविण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलेली तारीख बदलण्यात आली. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. दुसºयांदा अंमलबजावणीची तारीख जाहीर करताना कोणताही गाजावाजा न करता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा उडू लागला. आराखड्यातील योजनेनुसार बस वाहतूक वगळता अन्य कोणतीच शिस्त लागल्याचे अद्याप दिसत नाही.सम-विषम तारखांना पार्किंग हा प्रकार शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याने त्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणच्या दुकानदारांना तशा सूचना देऊन वाहन लावण्यासाठी येणाºया नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे, न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची बंदी, याबाबतही अवजड वाहनाने माल मागविणाºया संबंधित दुकानदारांना सूचना करणे, अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, खासगी वाहतुकीसाठी मुख्य मार्गावर तासन्तास थांबून राहणाºया ट्रॅव्हर्ल्स् कार्यालयांना नोटीस देऊनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे, अशी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक शाखेसह शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील पोलिसांना सोबत घेऊन चार-पाच दिवस सलग सूचना, कारवाई करीत नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे बनले आहे; अन्यथा हा प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक आराखडा कागदोपत्रीच राहील आणि शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तशीच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.