शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होताना दिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे♦नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे,♦वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे,♦न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे,♦नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होतानादिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने मंजुरी दिलेला शहर वाहतूक आराखडा प्रशासनाकडून यंदा राबविण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलेली तारीख बदलण्यात आली. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. दुसºयांदा अंमलबजावणीची तारीख जाहीर करताना कोणताही गाजावाजा न करता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा उडू लागला. आराखड्यातील योजनेनुसार बस वाहतूक वगळता अन्य कोणतीच शिस्त लागल्याचे अद्याप दिसत नाही.सम-विषम तारखांना पार्किंग हा प्रकार शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याने त्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणच्या दुकानदारांना तशा सूचना देऊन वाहन लावण्यासाठी येणाºया नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे, न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची बंदी, याबाबतही अवजड वाहनाने माल मागविणाºया संबंधित दुकानदारांना सूचना करणे, अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, खासगी वाहतुकीसाठी मुख्य मार्गावर तासन्तास थांबून राहणाºया ट्रॅव्हर्ल्स् कार्यालयांना नोटीस देऊनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे, अशी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक शाखेसह शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील पोलिसांना सोबत घेऊन चार-पाच दिवस सलग सूचना, कारवाई करीत नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे बनले आहे; अन्यथा हा प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक आराखडा कागदोपत्रीच राहील आणि शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तशीच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.