शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होताना दिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे♦नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे,♦वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे,♦न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे,♦नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होतानादिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने मंजुरी दिलेला शहर वाहतूक आराखडा प्रशासनाकडून यंदा राबविण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलेली तारीख बदलण्यात आली. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. दुसºयांदा अंमलबजावणीची तारीख जाहीर करताना कोणताही गाजावाजा न करता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा उडू लागला. आराखड्यातील योजनेनुसार बस वाहतूक वगळता अन्य कोणतीच शिस्त लागल्याचे अद्याप दिसत नाही.सम-विषम तारखांना पार्किंग हा प्रकार शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याने त्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणच्या दुकानदारांना तशा सूचना देऊन वाहन लावण्यासाठी येणाºया नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे, न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची बंदी, याबाबतही अवजड वाहनाने माल मागविणाºया संबंधित दुकानदारांना सूचना करणे, अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, खासगी वाहतुकीसाठी मुख्य मार्गावर तासन्तास थांबून राहणाºया ट्रॅव्हर्ल्स् कार्यालयांना नोटीस देऊनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे, अशी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक शाखेसह शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील पोलिसांना सोबत घेऊन चार-पाच दिवस सलग सूचना, कारवाई करीत नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे बनले आहे; अन्यथा हा प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक आराखडा कागदोपत्रीच राहील आणि शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तशीच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.