शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

इचलकरंजीत वाहतूक आराखड्याचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होताना दिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे♦नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे,♦वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे,♦न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे,♦नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : शहरातील प्रायोगिक तत्त्वावर एक महिन्यासाठी लागू करण्यात आलेल्या वाहतूक विकास आराखड्याचा बोजवारा उडाला आहे. प्रशासन, वाहतूक शाखा व नागरिक यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडत असून, अद्याप नागरिकांकडून हरकती व सूचनाही दाखल होतानादिसत नाहीत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी यामध्ये वेळीच लक्ष घालून सक्षमपणाने वाहतूक आराखडा राबवावा, अशी मागणी होत आहे.चार वर्षांपूर्वी नगरपालिकेने मंजुरी दिलेला शहर वाहतूक आराखडा प्रशासनाकडून यंदा राबविण्यास परवानगी मिळाली. सुरुवातीलाच जाहीर करण्यात आलेली तारीख बदलण्यात आली. त्यामुळे नागरिकांत संभ्रमावस्था निर्माण झाली. दुसºयांदा अंमलबजावणीची तारीख जाहीर करताना कोणताही गाजावाजा न करता अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, नागरिकांना सक्षमपणाने याबाबत माहितीच मिळाली नसल्याने त्याचा बोजवारा उडू लागला. आराखड्यातील योजनेनुसार बस वाहतूक वगळता अन्य कोणतीच शिस्त लागल्याचे अद्याप दिसत नाही.सम-विषम तारखांना पार्किंग हा प्रकार शहरात पहिल्यांदाच सुरू करण्यात आला असल्याने त्याविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. संबंधित ठिकाणच्या दुकानदारांना तशा सूचना देऊन वाहन लावण्यासाठी येणाºया नागरिकांना सम-विषम पार्किंगबाबत सांगायला लावणे, न ऐकल्यास कडक अंमलबजावणी करणे, नवीन पार्किंग व्यवस्था, तसेच शहरातील मुख्य मार्गावरील अवजड वाहनांची बंदी, याबाबतही अवजड वाहनाने माल मागविणाºया संबंधित दुकानदारांना सूचना करणे, अंमलबजावणी करण्यास भाग पाडणे, खासगी वाहतुकीसाठी मुख्य मार्गावर तासन्तास थांबून राहणाºया ट्रॅव्हर्ल्स् कार्यालयांना नोटीस देऊनही ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करणे, अशी ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.वाहतूक शाखेसह शहरातील तीनही पोलीस ठाण्यांतील पोलिसांना सोबत घेऊन चार-पाच दिवस सलग सूचना, कारवाई करीत नागरिकांना शिस्त लावणे गरजेचे बनले आहे; अन्यथा हा प्रायोगिक तत्त्वावरील वाहतूक आराखडा कागदोपत्रीच राहील आणि शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था तशीच राहील, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी होत आहे.