शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत संघर्षाची चिन्हे

By admin | Updated: May 28, 2015 00:58 IST

स्वच्छतेचा प्रश्न : कामगार संघटनांचा ‘खो’; बचतीचे धोरण बारगळण्याची शक्यता

 इचलकरंजी : बचतीच्या धोरणाचा स्वीकार करून येत्या १ जूनपासून शहरातील दहा वॉर्डात साफसफाई व कचरा उठावाचे काम नगरपालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्याला कामगार संघटनांनीसुद्धा संमती दर्शविली, पण आता जादा कामाचे कारण सांगत काही कामगार संघटना या उपक्रमाला ‘खो’ घालण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे स्वच्छता प्रश्नावरून पदाधिकारी व कामगार संघटनांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.दरम्यान, शनिवारी ३० मे रोजी होणाऱ्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर हा विषय ठेवला असून, या विषयावर सभेमध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. शहरातील एकूण २५ प्रशासकीय वॉर्डांपैकी सध्या १४ वॉर्डांमध्ये खासगी मक्तेदारामार्फत साफसफाई व कचरा उठावाचे काम केले जाते. यासाठी वर्षाला सुमारे ७ कोटी रुपयांचा बोजा पालिकेवर पडत आहे. यातून बचतीचा मार्ग काढण्याच्या उद्देशाने नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी पालिकेचे पाच कोटी रुपये कसे वाचतील, या संदर्भात विस्तृत आराखडा तयार केला होता. त्यावर चर्चा होऊन संमतीही मिळाली.पालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता चार दिवसांपूर्वी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी प्रमुख मंडळी व नगरसेवकांची बैठक घेऊन साफसफाई व कचरा उठावाचे काम पालिका कर्मचाऱ्यांमार्फतच करण्याचा निर्णय घेतला. विविध कामगार संघटनांच्या पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी संमती दर्शविली. त्यानुसार १ जूनपासून हा उपक्रम हाती घेण्यात येणार होता. संमतीनंतरही काही संघटनांचा विरोधकाही संघटनांनी या उपक्रमाला विरोध दर्शविण्यास सुरुवात केली असून, त्यासाठी जादा कामाचे कारण पुढे केले जात आहे. मुळातच शासकीय नियमानुसार कामापेक्षाही कमी प्रमाणात काम स्वच्छता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या उपक्रमातून पालिकेची पाच कोटी रुपयांची बचत होणार आहे, पण संमतीनंतर आता काही संघटना त्याला विरोध करू लागल्याने या मागचे नेमके कारण काय, असा सवाल केला जात आहे.